शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

२०१९पर्यंत दुष्काळमुक्ती

By admin | Updated: November 21, 2015 02:20 IST

जलयुक्त शिवार योजनेमधून आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. त्यासाठी १४०० कोटी खर्च करून सहा लाख हेक्टर शेतीला पाणी पुरेल, अशी व्यवस्था केली आहे.

पाटण (जि. सातारा) : जलयुक्त शिवार योजनेमधून आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. त्यासाठी १४०० कोटी खर्च करून सहा लाख हेक्टर शेतीला पाणी पुरेल, अशी व्यवस्था केली आहे. २०१९पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.मरळी, दौलतनगर येथे आमदार शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी मंत्री दिवाकर रावते, गिरीश महाजन, डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सत्यजीत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आघाडी शासनाने १५ वर्षांत पश्चिम महाराष्ट्राला १३ हजार कोटी दिले आहेत. आम्ही एका वर्षात आठ हजार कोटी दिले. उसाचा प्रश्न चिघळला असून, शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली पाहिजे यासाठी कारखान्यांना २००० कोटी रुपये दिले आहेत. कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच एफआरपीचा प्रश्न सुटेल, असे सांगून ते म्हणाले, सिंचनामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. (प्रतिनिधी)जिथे पवार; तिथे घोटाळा! : राज्यात इतके घोटाळे करून ठेवले आहेत की, ‘जिथे पवार; तिथे घोटाळा’ झाला आहे. मातीचा बंधारा बांधतो म्हणायचे आणि तिथे काँक्रीट धरणे बांधली. पाणी मात्र उपलब्ध नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. शंभूराजना लवकरच लाल दिवा : शंभूराज देसाई यांना लाल दिव्याची गाडी देण्याबाबत मंत्री दिवाकर रावतेंसमवेत आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.