शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात यंदा दुष्काळ

By admin | Updated: May 26, 2015 01:20 IST

यंदा महाराष्ट्रासह देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे.

पुणे : यंदा महाराष्ट्रासह देशात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक या भागात यंदा पाऊस कमी होईल आणि तेथे दुष्काळी स्थिती निर्माण होईल, असे भाकित ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी आज वर्तविले.टेरी पॉलिसी सेंटर या संस्थेने ‘या वर्षीच्या मॉन्सूनचा अचूक अंदाज’ या विषयावर पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या इंद्रधनुष्य या इमारतीमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.साबळे म्हणाले, की यंदा मॉन्सूनचा पाऊस कमी पडणार असून, प्रामुख्याने मध्य भारतात त्याचे प्रमाण कमी असणार आहे. यंदा जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पावसाचे मोठे खंड पडण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याचा फटका महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांना बसणार आहे. त्यामुळे त्याची गंभीरता लक्षात घेत प्रत्येक राज्याने त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.देशावरील हवेच्या दाबावरून मॉन्सूनचा मार्ग ठरत असतो. यंदा पूर्ण देशात मॉन्सूनला योग्यपद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी अनुकूल हवेचे दाब दिसून येत आहेत. त्यामुळे यंदा मॉन्सून नियोजित वेळेअगोदर देशभरात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. आत्ताची स्थिती अशी असली, तरी मॉन्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव दिसून येत आहे. प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची स्थिती वाढली, तर त्याचा विपरीत परिणाम मॉन्सूनवर होईल आणि देशातला पाऊस आणखी कमी होईल. यंदा पूर्ण मॉन्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव राहणार आहे. याचाच अर्थ यंदा जून, जुलै आणि आॅगस्ट या महिन्यांमध्ये पावसाचे खंड पडणार आहेत, हे स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले.कमी दिवसांत जास्त पाऊस होण्याचा प्रकार यंदा मोठ्याप्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे, असे सांगत साबळे म्हणाले, की राज्यातील दुष्काळी स्थिती दर वर्षी वाढत असल्याचे दिसून येत आहे. १९७४ मध्ये राज्यात ८४ तालुके आणि १२ जिल्हे दुष्काळग्रस्त होते. तर, २०१२ मध्ये यात वाढ होऊन १२३ तालुके आणि १९ जिल्हे दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार ३९ तालुक्यांची यात भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून राज्यात कमी पावसाचा पट्टा विस्तारत आहे. हवामान बदल हे यामागचे प्रमुख कारण आहे. (प्रतिनिधी)‘एल निनो’च्या प्रभावात वाढ४प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ झाली की तेथे हवेचा कमी दाब निर्माण होतो. हा दाब भारतात येणारे नैर्ऋत्य मोसमी वारे खेचतो. त्यामुळे मॉन्सूनचे बाष्पयुक्त ढग प्रशांत महासागराकडे जातात आणि भारतात पाऊस पडत नाही. या स्थितीला ‘एल निनो’ म्हणतात. सध्या प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यावरून ‘एल निनो’च्या प्रभावात वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली.गेले वर्षभर पाऊस४हवामान बदलाच्या झळा राज्याला बसत आहेत. १९७४ मध्ये राज्यात ८४ तालुके दुष्काळग्रस्त होते. ४तर २०१२ मध्ये यात वाढ होऊन १२३ तालुके दुष्काळग्रस्त झाले. गेले वर्षभर तर राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे, अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली.कमी पाण्यावर तग धरणाऱ्या पिकांचे नियोजन हवे४पाऊस कमी पडणार असल्याने त्यानुसार पिकाचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे, असे सांगत रामचंद्र साबळे म्हणाले, की राज्यात कापसाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. मात्र,त्याला खूप पाणी लागते. यंदा पाऊस कमी पडणार असल्याने कापसाऐवजी तूर, सोयाबिन, मिरची, मका, सूर्यफूल ही कमी पाण्यावर लवकर येणारी आणि शाश्वत उत्पादन देणारी पिके शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर ६५ दिवसांत येणारे घेवडा पीक घेऊन त्यानंतर लगेचच रब्बीच्या ज्वारीचे पीकही शेतकऱ्यांना घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांनी मॉन्सून आल्यानंतर ६५ मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणीच करू नये.