शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दुष्काळ कायमचा संपवा!

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

मोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास

विधिमंडळ अधिवेशन: दोन दिवसाच्या गोंधळानंतर चर्चेला सुरुवातअतुल कुलकर्णी - नागपूरमोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास ६० ते ६५ सदस्यांनी दिवसभराच्या भाषणात दुष्काळाचे विदारक चित्र सभागृहासमोर मांडले. दुष्काळ कायमचा संपवा, त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करा, अशा आग्रही मागण्या नव्याने आलेल्या सदस्यांनी केल्या. त्यांचे हे रूप पाहून सभागृहातील ज्येष्ठांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. एरवी सायंकाळनंतर रिकाम्या बाकांसमोरील चर्चा पाहण्याची सवय लागलेल्या सभागृहाच्या भिंतीदेखील भरलेले सभागृह पाहून अचंबित झाल्या असतील!अर्धे सदस्य पहिल्यांदा निवडून आलेले. त्यांच्या मनाचा अचूक वेध दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी आपल्या भाषणातून घेतला. नवीन आलेले सदस्य अपेक्षेने येथे आले आहेत. येताना शेतकऱ्यांच्या भावना विधानसभेत मांडू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वस्त करून आले आहेत. आम्हीदेखील पहिल्यांदा सभागृहात आलो तेव्हा हेच केले होते. मात्र दुसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा आमच्या पदरी निराशा आहे. आम्ही दोन्ही बाजूचे सभागृह पाहिले आहे. सत्ताधारी आज विरोधक आहेत आणि विरोधक आज सत्ताधारी आहेत. दोघांच्या बसण्याच्या जागा बदलल्या आहेत पण त्या जागांवरून जे बोलले जात होते त्यात काहीच बदल झालेला नाही... एवढी वर्षे आम्ही बोलत आहोत, येथे येतो, चर्चा करतो, मागण्या मांडतो, पण पदरात काहीच पडत नाही... शेतकऱ्यांसाठी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघेल की नाही... अशा शब्दात बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अर्जुन खोतकर यासारख्या अनेकांनी नेमके जखमेवर बोट ठेवले तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बाके वाजवून याचे स्वागतच केले. बागलणच्या आ. दीपिका चव्हाण या नव्याने आलेल्या महिला सदस्यांनी आपले लिखीत भाषण वाचले पण त्यामागचा भाव हाच होता.