शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

दुष्काळ कायमचा संपवा!

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

मोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास

विधिमंडळ अधिवेशन: दोन दिवसाच्या गोंधळानंतर चर्चेला सुरुवातअतुल कुलकर्णी - नागपूरमोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास ६० ते ६५ सदस्यांनी दिवसभराच्या भाषणात दुष्काळाचे विदारक चित्र सभागृहासमोर मांडले. दुष्काळ कायमचा संपवा, त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करा, अशा आग्रही मागण्या नव्याने आलेल्या सदस्यांनी केल्या. त्यांचे हे रूप पाहून सभागृहातील ज्येष्ठांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. एरवी सायंकाळनंतर रिकाम्या बाकांसमोरील चर्चा पाहण्याची सवय लागलेल्या सभागृहाच्या भिंतीदेखील भरलेले सभागृह पाहून अचंबित झाल्या असतील!अर्धे सदस्य पहिल्यांदा निवडून आलेले. त्यांच्या मनाचा अचूक वेध दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी आपल्या भाषणातून घेतला. नवीन आलेले सदस्य अपेक्षेने येथे आले आहेत. येताना शेतकऱ्यांच्या भावना विधानसभेत मांडू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वस्त करून आले आहेत. आम्हीदेखील पहिल्यांदा सभागृहात आलो तेव्हा हेच केले होते. मात्र दुसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा आमच्या पदरी निराशा आहे. आम्ही दोन्ही बाजूचे सभागृह पाहिले आहे. सत्ताधारी आज विरोधक आहेत आणि विरोधक आज सत्ताधारी आहेत. दोघांच्या बसण्याच्या जागा बदलल्या आहेत पण त्या जागांवरून जे बोलले जात होते त्यात काहीच बदल झालेला नाही... एवढी वर्षे आम्ही बोलत आहोत, येथे येतो, चर्चा करतो, मागण्या मांडतो, पण पदरात काहीच पडत नाही... शेतकऱ्यांसाठी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघेल की नाही... अशा शब्दात बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अर्जुन खोतकर यासारख्या अनेकांनी नेमके जखमेवर बोट ठेवले तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बाके वाजवून याचे स्वागतच केले. बागलणच्या आ. दीपिका चव्हाण या नव्याने आलेल्या महिला सदस्यांनी आपले लिखीत भाषण वाचले पण त्यामागचा भाव हाच होता.