शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दीर्घकालीन उपायांसाठी दुष्काळ पाहणी

By admin | Updated: August 20, 2015 00:36 IST

दुष्काळावर मात करण्यासाठी स्वतंत्र आराखडा केंद्राकडून तयार करण्यात येत असून, त्यासाठी दुष्काळी भागाची पाहणी करण्यात येत असल्याचे

अहमदनगर : दुष्काळावर मात करण्यासाठी स्वतंत्र आराखडा केंद्राकडून तयार करण्यात येत असून, त्यासाठी दुष्काळी भागाची पाहणी करण्यात येत असल्याचे केंद्रीय पथकाचे प्रमुख व्ही़ रथ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले़ केंद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त व्ही़ रथ यांच्या नेतृत्वाखाली द्विसदस्यीय समिती बुधवारी नगर दौऱ्यावर आली होती़ जिल्ह्यातील पाथर्डी,पारनेर आणि नगर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ बदललेल्या हवामानाबाबत रथ यांनी चिंता व्यक्त केली़ कमी पावसामुळे जिल्ह्यातील मूग, मका, सोयाबीन, बाजरी आणि फळबागा वाया गेलेल्या आहेत़ ही स्थिती केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर देशातील काही भागातही असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यावर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहेत़ बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण घटले आहेत़ पाऊस कमी झाल्याने शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे़ दुष्काळावर मात करण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना तयार करण्यात येत आहे़ नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत जलसंधारणाच्या सर्व योजनांचा समावेश असणार आहे़ ही योजना तयार करण्यापूर्वी देशातील दुष्काळाची स्थितीची पाहणी करुन वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व राज्यांतील जिल्ह्यांची पाहणी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले़ त्यामुळे अनुदानाच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. (प्रतिनिधी)