शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोण व डॉग स्कॉडलाही हल्लेखोर अस्वलाचा गुंगारा

By admin | Updated: October 9, 2016 13:17 IST

ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये हल्ला करून तिघांना ठार करणाऱ्या अस्वलाचा शोध सध्या वनविभागाच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू आहे.

५० जणांचे पथक शोधात : आतापर्यंत तिघांना केले ठारविवेक चांदूरकरबुलडाणा, दि. ९ : ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये हल्ला करून तिघांना ठार करणाऱ्या अस्वलाचा शोध सध्या वनविभागाच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. याकरिता राज्यातील प्राविण्यप्राप्त डॉग स्कॉड बोलाविण्यात आले असून,ड्रोणचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही अस्वल या पथकाच्या निदर्शनास पडले नाही. तीन जण अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाल्याने एकीकडे नागरिकांचा दबाव वाढत आहे तर दुसरीकडे अस्वल निदर्शनास येत नाही आहे.    डोंगर खंडाळा गावाजवळ अस्वलाने एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरूवारी घडली. यासह चिखली तालुक्यातील डोंगरशेवली गावातही अस्वलानेहल्ला करून एका शेतकऱ्याला ठार केले. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारयांनी अस्वलाला ठार करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानंतर वनविभागाच्या चमुने अस्वलाचा शोध घेतला. मात्र त्यांना अस्वल निदर्शनास पडले नाही. त्यानंतर पुन्हा अस्वलाने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याने आता बुलडाणा, अमरावती व अकोला येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या अस्वलाचा शोध घेत आहेत. याकरिता वनविभागाकडे असलेल्या प्राविण्यप्राप्त डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे. स्कॉडमधील कुत्र्याने अस्वलाचा माग घेतला असून, कोणत्या दिशेने अस्वल आल्याचे दाखविले. गत तीन दिवसांपासून आता जवळपास ५० जणांची चमू या अस्वलाचा शोध घेत आहे. अनेक अस्वलांमुळे पथक संभ्रमात या जंगलात ४० पेक्षा जास्त अस्वल आहेत. त्यामुळे हल्लेखोर अस्वल कोणते आहे, याचा शोध घेणे वन विभागाच्या पथकाला कठीण होत आहे. अस्वलाला ठार केल्यानंतर हेच हल्लेखोर अस्वल असल्याचे वनविभागाला सिद्ध करावे लागणारआहे.  दुसरीकडे सध्या अस्वलांचा प्रजननाचा काळ सुरू आहे. त्यामुळेही अस्वली एकत्र येत आहेत.