शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

ड्रोण व डॉग स्कॉडलाही हल्लेखोर अस्वलाचा गुंगारा

By admin | Updated: October 9, 2016 13:17 IST

ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये हल्ला करून तिघांना ठार करणाऱ्या अस्वलाचा शोध सध्या वनविभागाच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू आहे.

५० जणांचे पथक शोधात : आतापर्यंत तिघांना केले ठारविवेक चांदूरकरबुलडाणा, दि. ९ : ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये हल्ला करून तिघांना ठार करणाऱ्या अस्वलाचा शोध सध्या वनविभागाच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. याकरिता राज्यातील प्राविण्यप्राप्त डॉग स्कॉड बोलाविण्यात आले असून,ड्रोणचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही अस्वल या पथकाच्या निदर्शनास पडले नाही. तीन जण अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाल्याने एकीकडे नागरिकांचा दबाव वाढत आहे तर दुसरीकडे अस्वल निदर्शनास येत नाही आहे.    डोंगर खंडाळा गावाजवळ अस्वलाने एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरूवारी घडली. यासह चिखली तालुक्यातील डोंगरशेवली गावातही अस्वलानेहल्ला करून एका शेतकऱ्याला ठार केले. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारयांनी अस्वलाला ठार करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानंतर वनविभागाच्या चमुने अस्वलाचा शोध घेतला. मात्र त्यांना अस्वल निदर्शनास पडले नाही. त्यानंतर पुन्हा अस्वलाने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याने आता बुलडाणा, अमरावती व अकोला येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या अस्वलाचा शोध घेत आहेत. याकरिता वनविभागाकडे असलेल्या प्राविण्यप्राप्त डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे. स्कॉडमधील कुत्र्याने अस्वलाचा माग घेतला असून, कोणत्या दिशेने अस्वल आल्याचे दाखविले. गत तीन दिवसांपासून आता जवळपास ५० जणांची चमू या अस्वलाचा शोध घेत आहे. अनेक अस्वलांमुळे पथक संभ्रमात या जंगलात ४० पेक्षा जास्त अस्वल आहेत. त्यामुळे हल्लेखोर अस्वल कोणते आहे, याचा शोध घेणे वन विभागाच्या पथकाला कठीण होत आहे. अस्वलाला ठार केल्यानंतर हेच हल्लेखोर अस्वल असल्याचे वनविभागाला सिद्ध करावे लागणारआहे.  दुसरीकडे सध्या अस्वलांचा प्रजननाचा काळ सुरू आहे. त्यामुळेही अस्वली एकत्र येत आहेत.