शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

बौद्ध विवाह पद्धतीचा मसुदा तयार; शासनमान्यतेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:03 IST

राज्यात स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा असावा, यासाठी बौद्ध विवाह पद्धतीचा मसुदा तयार करण्यात आला असून, तो राज्य शासनाकडे सादर केला आहे. या कायद्याची मुहूर्तमेढ नागपूर येथील दीक्षाभूमीतून व्हावी, असे प्रांजळ मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी.एच. थूल यांनी येथे व्यक्त केले.

- गणेश वासनिक

अमरावती : राज्यात स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा असावा, यासाठी बौद्ध विवाह पद्धतीचा मसुदा तयार करण्यात आला असून, तो राज्य शासनाकडे सादर केला आहे. या कायद्याची मुहूर्तमेढ नागपूर येथील दीक्षाभूमीतून व्हावी, असे प्रांजळ मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य सी.एच. थूल यांनी येथे व्यक्त केले.सी.एच. थूल हे अमरावती येथे गुरुवारी एससी, एसटी आयोगाच्या विभागीय सुनावणीसाठी आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची तत्कालीन समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पुढाकाराने सन २००७ साली पायाभरणी करण्यात आली. पूरक मसुदा तयार करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती गठित झाली. तिचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. सन २००७ ते २०११ या कार्यकाळात समितीने ६० ते ६५ बैठकी घेतल्या. समाजातील विविध स्तरावरील अभ्यासक, कार्यकर्ते, धम्मगुरू, विधिज्ञ, मान्यवरांची मते जाणून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ साली जेथून बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्याच नागपूरच्या दीक्षाभूमीतून बौद्ध विवाह कायद्यासंदर्भात हालचाली व्हाव्यात, असे अध्यक्ष या नात्याने माझा आग्रह होता. त्याला सर्वमान्य ठरविले गेले. मसुदा तयार करण्यात काही अवधी लागला. तथापि, नव्या बौद्ध विवाह कायद्याचा प्रारूप मसुदा शासनाकडे सादर करण्यासाठी १० फेब्रुवारी २०१८ रोजी दीक्षाभूमी येथे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आता हा प्रारूप मसुदा बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाने समाजघटकापर्यंत पोहचवून, त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रारूप मसुद्यात काही आक्षेप, सूचना असल्यास, तशा नोंदी करून घेतल्या जातील. सामाजिक न्याय विभागाकडून स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याचा प्रारूप मसुदा वेबसाइटवर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शासन ठरवेल त्या मुदतीत नागरिकांची मते, आक्षेप, हरकती जाणून घेतल्यानंतर सुधारित मसुदा तयार केला जाईल. पावसाळी वा हिवाळी अधिवेशनात नव्या बौद्ध विवाह पद्धतीचा मसुद्याला मान्यता देऊन त्याचे कायद्यात रूपांतर होईल. बौद्धांच्या दृष्टीने सर्व घडामोडी या नागपुरात झाल्या असल्याने नवा कायदादेखील नागपूर येथेच मंजूर व्हावा, असे मत त्यांनी नोंदविले.

देश-विदेशात मिळेल सन्मान देश-विदेशात बौद्ध धम्म असताना, राज्यात मात्र स्वतंत्र बौद्ध विवाह कायदा नसल्याने आजही बौद्ध विवाह पद्धत ही घटनेच्या कलम ७ प्रमाणे हिंदू धर्मानुसार गणली जाते. त्यामुळे बौद्ध विवाह पद्धतीला मान्यता मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी मसुदा तयार करण्यात येत आहे. शासनाने कायद्याला मान्यता दिल्यानंतरच पुढचा प्रवास सुरू होईल. एकदा हा कायदा मंजूर झाला की, देश-विदेशात बौद्धांना सन्मान मिळेल, असा ठाम विश्वास सी.एच. थूल यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Amravatiअमरावती