शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

भूसंपादनाचा दुप्पट मोबदला

By admin | Updated: May 23, 2017 04:23 IST

महापारेषणतर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या ६६ के.व्ही. ते १२०० के.व्ही. च्या मनोऱ्यासाठी भूसंपादनाचा मोबदला रेडिरेकनर दराच्या दुप्पट दिला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापारेषणतर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या ६६ के.व्ही. ते १२०० के.व्ही. च्या मनोऱ्यासाठी भूसंपादनाचा मोबदला रेडिरेकनर दराच्या दुप्पट दिला जाणार आहे. तसेच, शेतावरून जाणाऱ्या वीज वाहिन्यांखालील (तारा) जमिनीसाठीही मोबदला दिला जाईल.राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या संबंधीच्या धोरणास मंजुरी देण्यात आल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आतापर्यंत मनोऱ्याखालील जागेच्या मूल्याच्या २५ ते ६५ टक्के एवढी नुकसान भरपाई जमिनीच्या प्रकारनुसार- कोरडवाहू, ओलीत, बागाईत, अकृषक जमिनीसाठी देण्यात येत होती. नवीन धोरणामुळे शेतकऱ्यांना मनोऱ्याने व्याप्त जमिनीच्या त्या-त्या भागातील रेडीरेकनर प्रमाणे होणाऱ्या मूल्यांकनाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे. तसेच वाहिन्यांखालील जमिनीचा मोबदला ही मिळणार आहे. सध्या वाहिन्यांच्या पट्टयाखालील जमिनीचा मोबदला देण्यात येत नव्हता.नव्या धोरणानुसार तारांखालील जागेचा मोबदला दिला जाणार आहे. शहरी भागात मोबदला देण्यासाठी अतिउच्चदाब वाहिन्यांबाबत केंद्र सरकारच्या स्तरावर समिती स्थापन करण्यात आली. मुंबई महापालिका व उपनगरीय क्षेत्रातील जमिनीचे दर जास्त असल्यामुळे सुधारीत नवीन धोरण मुंबई व उपनगरे वगळून लागू राहील. अतिउच्च दाब मनोऱ्याने व्याप्त वाहिनीच्या खालील जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल. भूमि अभिलेख उपअधिक्षक व तालुका/जिल्हा कृषी अधिकारी व पारेषण कंपनीचे प्रतिनिधी या समितीचे सदस्य राहतील.सातबारा उताऱ्यावर मोबाईल मनोऱ्याची नोंद जमिनीचा मोबदला शेतकऱ्यास मान्य नसेल तर तो जिल्हाधिकाऱ्याकडे अपिल करु शकेल.दिलेल्या मोबदल्याची नोंद सातबाराच्या उताऱ्यावर केली जाईल. मोबदल्याची रक्कम समान दोन टप्प्यात देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मोबदला मनोरा पायाभरणीनंतर व दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मनोरा उभारणीनंतर देण्यात येईल. तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात येईल. मनोरा-पायाभरणी, वाहिनी उभारताना पिकांचे व फळझाडांचे नुकसान झाल्यास दोन टप्प्यात मोबदला देण्यात येईल. ज्या जमिनीवरुन फक्त तारा गेल्या अशा ठिकाणी तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात येईल. जमिनीच्या मालकाचा बदल झाल्यास नवीन मालक पात्र ठरणार नाही.