शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

उद्योग-व्यवसाय करणे हे आव्हानात्मकच!

By मनोज गडनीस | Updated: October 14, 2024 11:51 IST

अलीकडेच पनवेलनजीक एका उद्योजकाने पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करत कृषिपूरक व प्रक्रिया प्रकल्प विकसित केला होता. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा हा प्रकल्प होता.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी -अलीकडच्या काळात देशात उद्योजकता मोठ्या प्रमाणावर वाढीस लागत आहे, अशी चर्चा सातत्याने कानावर पडत होती. मात्र, केंद्र सरकारच्या लेबर फोर्स सर्वेक्षणातून याची नेमकी आकडेवारी पुढे आली आहे आणि ही आकडेवारी या चर्चेला पुष्टी देत आहे. या आकडेवारीनुसार देशातील तरुणांपैकी ४८ टक्के लोक हे नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहे. सरकारने लागू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेत किंवा अन्य मार्गे पण स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे. या आकडेवारीच्या निमित्ताने काही तरुणांशी चर्चा केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही आपली जिद्द आणि आवड असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचसोबत व्यवसाय करणे ही किती आव्हानात्मक आहे, याचीही जाणीव त्यांनी करून दिली.अलीकडेच पनवेलनजीक एका उद्योजकाने पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करत कृषिपूरक व प्रक्रिया प्रकल्प विकसित केला होता. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा हा प्रकल्प होता. या प्रकल्पामध्ये संबंधित उद्योजकाने १०० टक्के स्थानिकांना रोजगार दिला होता. मात्र केवळ रोजगार देऊन भागले नाही तर स्थानिक समाजकंटकांचा त्रासदेखील होऊ लागला. त्यातच सणासुदीच्या महत्त्वाच्या काळात ज्यावेळी अधिक श्रमाची गरज होती त्यावेळी बहुतांश स्थानिक कामगारांनी आम्हाला सणासुदीच्या काळात काम करता येणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी जेव्हा या उद्योजकाने बाहेरून कामगार आणले त्यावेळी स्थानिक समाजकंटकांनी त्या बाहेरच्या कामगारांना मारहाण करत प्रकल्प बंद पडण्याचा जणू चंगच बांधला. अखेरीस जेरीस येऊन संबंधित उद्योजकाने आपला प्रकल्पच तेथून गुंडाळला. यामध्ये उद्योजकाचे जेवढे नुकसान झाले तसेच स्थानिकांचा रोजगार बुडाल्यामुळे त्यांचेही झाले. मात्र, प्रश्नांना कोण आणि कसा पायबंद घालणार? या मुद्द्यांवरही भाष्य होणे गरजेचे आहे. अन्य एका उद्योजकाने सांगितले की, व्यवसायात ज्याला कम्प्लायन्स म्हणतात, अशा विविध गोष्टींची पूर्तता ऑनलाइन करण्याची सुविधा सरकारने आता उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यातही अनेकवेळा वेबसाइट बंद असणे, वेबसाइटवर मंजुरीसाठी अपलोड केलेली फाईल पुढेच न सरकवणे, ती फाईल पुढे सरकवायची असेल तर त्यासाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवणे हे करावेच लागते. ऑनलाइन प्रणाली असूनही लोकांना सरकारी कार्यालयात का जावे लागते?, याचा ‘अर्थ’ काय?, यावरही बोलणे गरजेचे आहे. जीएसटी व अन्य कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी टार्गेट पूर्ण करायचे म्हणून अनेक उद्योजकांच्या कार्यालयांवर नोटिसांचा पाऊस पाडला. उद्योजकता निर्माण करण्यासाठी सरकार कितीही योजना सादर करो, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिथे होते तिथली परिस्थिती मात्र उद्योजकाच्या संयमाचा अंत पाहणारीच आहे.

टॅग्स :businessव्यवसायGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार