शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या यशाच्या फुग्यात तेवढी हवा आहे का? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 25, 2017 07:57 IST

निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय हा मान्य आहे. पण या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - 'मिनी विधानसभा' अर्थात 10 महापालिका आणि २५ जिल्हा परिषदा- पंचायत समित्यांच्या लागलेल्या निकालात भाजपाला मोठे यश मिळाले असले तरी शिवसेनेने भाजपाच्या यशाबाबत प्रशचिन्ह  उपस्थित केले आहे. 'निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय हा मान्य आहे. पण या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ' सामना'च्या अग्रलेखातून विचारला आहे. भाजपचा ‘टक्का’ वाढला हे जरी खरे असले तरी ‘टोणपे’ही बऱ्यापैकी बसले आहेत, असा टोलाही उद्धव यांनी लगावला आहे. 
' विजयाचा आनंद साजरा करण्यात काही गैर नाही. मात्र त्या पक्षाने हा जो ‘आकडा’ गाठला तो केंद्र आणि राज्यात सत्तेचा ‘मटका’ त्यांच्याकडे असल्याने, हे मग मान्य व्हायला काहीच हरकत नसावी' अशी टीका उद्धव यांनी केली. ' विजय हा विजय असतो हे मान्य केले तरी तो कसा मिळाला, त्यात स्वतःचा वाटा किती आणि ‘मिसळलेला’ वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता हे जनता ठरवीत असते' असेही त्यांनी नमूद केले. 
 
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे :
> राज्यातील दहा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालाचे कवित्व अजून काही दिवस सुरूच राहील. राज्यातील एकूणच नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एकूण जागांची गोळाबेरीज सर्वाधिक वगैरे झाली. यात अमान्य करण्यासारखे काही नाही. पुन्हा त्याचा आनंद साजरा करण्यातही काही गैर नाही. मात्र त्या पक्षाने हा जो ‘आकडा’ गाठला तो केंद्र आणि राज्यात सत्तेचा ‘मटका’ त्यांच्याकडे असल्याने हेदेखील मग मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. विजय हा विजय असतो हे मान्य केले तरी तो कसा मिळाला, त्यात स्वतःचा वाटा किती आणि ‘मिसळलेला’ वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता हे जनता ठरवीत असते. 
 
> ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणाचा ‘कणा’ असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दणका बसला, भाजपची संख्यात्मक वाढ झाली हे खरेच. मात्र या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दुसरा क्रमांक शिवसेनेचाच आला आहे हे लक्षात घ्यायला हवे. विदर्भातील सहा जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले. त्यापैकी चार ठिकाणी भाजपला यश मिळाले तरी यवतमाळमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आणि अमरावतीमध्ये काँग्रेसने विजय मिळविला. प. महाराष्ट्रात भाजपचे यश हे ग्रामीण भागातील ‘शिरकाव’ अशाच स्वरूपाचे आहे. सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसला धक्का देत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. तथापि प. महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपले स्थान बऱ्यापैकी टिकवून ठेवले. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ तुलनेत घटले तरी सर्वात मोठा पक्ष तोच ठरला आहे आणि ६८ पैकी १७ जागा मिळविणारा भाजप सत्तेपासून बराच लांब राहिला आहे. 
 
> पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला जबर दणका बसला असला तरी या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये मात्र चित्र वेगळे आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. पुणे जिह्यातील पुरंदर, मुळशी, जुन्नर, खेड या तालुक्यांत शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. साताऱ्यात हेच चित्र आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद ‘त्रिशंकू’ आहे आणि तेथील सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे आहेत. नगर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीने भाजपला रोखले. तेथे शिवसेनेच्या जागा मात्र वाढल्या आहेत. भाजपचा ‘मिशन फोर्टी’चा रथ ‘फोर्टीन’मध्येच अडकला. मराठवाड्यातील आठ जिह्यांपैकी लातूर जिल्हा परिषदेत भाजपने यश मिळवले असले तरी उर्वरित सात जिह्यांत अधांतरी परिस्थिती आहे. बीड, धाराशीव आणि परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहणार आहे.
 
> भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जालन्यामध्ये सर्वाधिक जागा भाजपने मिळवल्या असल्या तरी शिवसेनेनेही १४ जागा मिळवत दुसरा ‘नंबर’ मिळवला आहे. भाजप तेथे बहुमतापासून दूरच आहे. नांदेडमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि तेथे राष्ट्रवादीसोबत ते सत्ता स्थापन करतील. बीडमधील पराभव हा फक्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठीच नाही तर भाजपसाठीही धक्कादायक आहे. हिंगोली, परभणी आणि धाराशीव जिह्यांत भाजपपेक्षा शिवसेनाच पुढे आहे. तिकडे कोकणात रत्नागिरी आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस तर रायगडमध्ये शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला यश मिळाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत तर भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही आणि इतरत्रही त्यांना एका ‘आकडी’त राहावे लागले. म्हणजेच राज्यात भाजपचा ‘टक्का’ वाढला हे जरी खरे असले तरी ‘टोणपे’ही बऱ्यापैकी बसले आहेत. राजकारण आणि सत्ताकारण यात लपवाछपवी हा नेहमीचा खेळ असल्याने वाढलेले ‘टक्के’ सांगितले जातात आणि बसलेले ‘टोणपे’ लपवले जातात इतकेच.