शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

जळगावात खंडणीसाठी डॉक्टर पुत्राचे अपहरण

By admin | Updated: January 4, 2017 07:12 IST

अमळनेरमध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या एका डॉक्टरच्या मुलाला सहा तासानंतर अपहरणकर्त्यांनी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 04 - अमळनेरमध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या एका डॉक्टरच्या मुलाला सहा तासानंतर अपहरणकर्त्यांनी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अमळनेरमधील डॉ. निखील बहुगुणे यांचा मुलगा पार्थ मंगळवारी (दि.03) सायंकाळी शिकवणीसाठी गेला असता त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनी डॉ. बहुगुणे यांना मोबाईद्वारे संपर्क साधला आणि त्यांनी तुमचा मुलगा पार्थ आमच्या ताब्यात असून 50 लाखांची रोकड घेऊन पारोळा रस्त्यावर एकटेच येण्यास सांगितले. 
दरम्यान, रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास डॉ. बहुगुणे यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकरांशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर सुपेकरांनी साडे नऊ वाजता अमळनेर पोलिसांना अलर्ट केले. अपहरणकर्त्यांचे कॉल डिटेल्स घेऊन घेत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे समांतर तपास दिला. 
रात्री साडे अकरा वाजता गलवाडे रस्त्यावर डॉ. बहुगुणेंना अपहरणकर्त्यांनी बोलावले असता ते खासगी गाडीने चालकासह गलवाडे रस्त्यावर गेले. मात्र, त्यावेळी त्याठिकाणी अपहरणकर्ते आलेच नाहीत. दरम्यान, अमळेनर पोलिसांनी शहराला साध्या वाहन आणि साध्या वेशात घेराव घातला. त्यावेळी अमळगाव येथील पुलावर पार्थला एकट्यालाच सोडून अपहरणकर्त्यांनी पळ काढला. त्यानंतर पहाटे अडिच वाजता पार्थला घरी आणण्यात आले. घरी आल्यानंतर अपहरण करणारे चौघे असल्याची माहिती पार्थने दिली. पार्थ हा सेंट मेरी विद्यालयात सातव्या वर्गातील विद्यार्थी आहे.
 
सराईत आरोपीची झडती...
- या घटनेनंतर खून आणि दरोड्यातील गुन्ह्यातील सराईत आरोपी अशोक नवघरे याच्या घराची अमळनेर पोलिसांनी झडती घेतली. सुरत जेलमधून सुटीवर आलेला नवघरे आढळून आला नाही. त्यामुळे तपास काहीतास त्याच्या शोधाभोवतीच फिरला.त्यानंतर त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले होते.
 
बहुगुणेंच्या घरी गर्दी...
- पार्थ घरी येताच अमळनेरकरांना घटना समजली. त्यानंतर नातेवाइकांसह शिक्षक आणि पालकांनी गर्दी केली. दरम्यान, पोलिसांचे एक पथक अपहरणकर्त्यांच्या दिशेने रवाना झाले आहे. तर शेजारच्या धुळे जिल्हा पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच, अपहरणकर्त्यें मध्यप्रदेशाकडे पळण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सिमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.  
 
हा गुन्हा गंभीर असून पार्थला सुखरुपपणे सोडविणे आव्हानात्मक होते. म्हणून अतिशय गोपनीयरित्या गुन्हेगारांचा पिच्छा पुरविला. पोलिसांचा समांतर तपास पाहून अपहरणकर्त्यांचा डाव फसला. मात्र त्यांना आम्ही नक्कीच जेरबंद करु. 
-डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक, जळगाव