शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात खंडणीसाठी डॉक्टर पुत्राचे अपहरण

By admin | Updated: January 4, 2017 07:12 IST

अमळनेरमध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या एका डॉक्टरच्या मुलाला सहा तासानंतर अपहरणकर्त्यांनी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 04 - अमळनेरमध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या एका डॉक्टरच्या मुलाला सहा तासानंतर अपहरणकर्त्यांनी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अमळनेरमधील डॉ. निखील बहुगुणे यांचा मुलगा पार्थ मंगळवारी (दि.03) सायंकाळी शिकवणीसाठी गेला असता त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनी डॉ. बहुगुणे यांना मोबाईद्वारे संपर्क साधला आणि त्यांनी तुमचा मुलगा पार्थ आमच्या ताब्यात असून 50 लाखांची रोकड घेऊन पारोळा रस्त्यावर एकटेच येण्यास सांगितले. 
दरम्यान, रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास डॉ. बहुगुणे यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकरांशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर सुपेकरांनी साडे नऊ वाजता अमळनेर पोलिसांना अलर्ट केले. अपहरणकर्त्यांचे कॉल डिटेल्स घेऊन घेत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे समांतर तपास दिला. 
रात्री साडे अकरा वाजता गलवाडे रस्त्यावर डॉ. बहुगुणेंना अपहरणकर्त्यांनी बोलावले असता ते खासगी गाडीने चालकासह गलवाडे रस्त्यावर गेले. मात्र, त्यावेळी त्याठिकाणी अपहरणकर्ते आलेच नाहीत. दरम्यान, अमळेनर पोलिसांनी शहराला साध्या वाहन आणि साध्या वेशात घेराव घातला. त्यावेळी अमळगाव येथील पुलावर पार्थला एकट्यालाच सोडून अपहरणकर्त्यांनी पळ काढला. त्यानंतर पहाटे अडिच वाजता पार्थला घरी आणण्यात आले. घरी आल्यानंतर अपहरण करणारे चौघे असल्याची माहिती पार्थने दिली. पार्थ हा सेंट मेरी विद्यालयात सातव्या वर्गातील विद्यार्थी आहे.
 
सराईत आरोपीची झडती...
- या घटनेनंतर खून आणि दरोड्यातील गुन्ह्यातील सराईत आरोपी अशोक नवघरे याच्या घराची अमळनेर पोलिसांनी झडती घेतली. सुरत जेलमधून सुटीवर आलेला नवघरे आढळून आला नाही. त्यामुळे तपास काहीतास त्याच्या शोधाभोवतीच फिरला.त्यानंतर त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले होते.
 
बहुगुणेंच्या घरी गर्दी...
- पार्थ घरी येताच अमळनेरकरांना घटना समजली. त्यानंतर नातेवाइकांसह शिक्षक आणि पालकांनी गर्दी केली. दरम्यान, पोलिसांचे एक पथक अपहरणकर्त्यांच्या दिशेने रवाना झाले आहे. तर शेजारच्या धुळे जिल्हा पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच, अपहरणकर्त्यें मध्यप्रदेशाकडे पळण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सिमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.  
 
हा गुन्हा गंभीर असून पार्थला सुखरुपपणे सोडविणे आव्हानात्मक होते. म्हणून अतिशय गोपनीयरित्या गुन्हेगारांचा पिच्छा पुरविला. पोलिसांचा समांतर तपास पाहून अपहरणकर्त्यांचा डाव फसला. मात्र त्यांना आम्ही नक्कीच जेरबंद करु. 
-डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक, जळगाव