शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दुष्काळ पडणार नसल्याची हमी देता का ?

By admin | Updated: March 17, 2017 23:38 IST

मुश्रीफ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल : शेतकऱ्यांची दिशाभूल बंद करा

कोल्हापूर : राज्यात दुष्काळ पडणार नाही, गारपीट-अतिवृष्टी होणार नाही, याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असतील, तर आत्महत्या करणार नसल्याची हमी शेतकरी देण्यास तयार आहेत. सावकारांची कर्जमाफी करणाऱ्यांना शेतकऱ्यांची दु:खे दिसत नाहीत, बालिश वक्तव्ये करून मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल बंद करावी, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची खात्री विरोधक देणार का? या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत मुश्रीफ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. एकूण पीक कर्जापैकी ८५ टक्केवाटप जिल्हा मध्यवर्ती बॅँका करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची थकबाकी ही जिल्हा बॅँकेतच राहणार आहे. त्यामुळे अडचणीतील बॅँका वाचविण्यासाठी विरोधक कर्जमाफीची मागणी करीत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप चुकीचा आहे. खासगी सावकारांना हातभार लावणारे सरकार सहकारी बॅँकांबाबत दुजाभाव करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील निवडणुकीत कर्जमाफीची ग्वाही दिली. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्हाला अडीच वर्षांपूर्वीच पाठबळ दिले. त्यांच्याकडून आत्महत्या करणार नसल्याची खात्री का मागता? शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची खात्री मागणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री असतील. अशी हमी मागणाऱ्यांनी पहिल्यांदा दुष्काळाची हमी द्यावी, असेही मुश्रीफ म्हणाले.कर्जमाफीच द्यायची नसेल तर बदनामी तरी करू नकाराज्य सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफीच द्यायची नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री असे वक्तव्य करीत आहेत. कर्जमाफी द्यायची नसली तरी किमान सहकाराला बदनाम तरी करू नये, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले.