शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

दुष्काळ पडणार नसल्याची हमी देता का ?

By admin | Updated: March 17, 2017 23:38 IST

मुश्रीफ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल : शेतकऱ्यांची दिशाभूल बंद करा

कोल्हापूर : राज्यात दुष्काळ पडणार नाही, गारपीट-अतिवृष्टी होणार नाही, याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असतील, तर आत्महत्या करणार नसल्याची हमी शेतकरी देण्यास तयार आहेत. सावकारांची कर्जमाफी करणाऱ्यांना शेतकऱ्यांची दु:खे दिसत नाहीत, बालिश वक्तव्ये करून मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल बंद करावी, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची खात्री विरोधक देणार का? या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत मुश्रीफ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. एकूण पीक कर्जापैकी ८५ टक्केवाटप जिल्हा मध्यवर्ती बॅँका करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची थकबाकी ही जिल्हा बॅँकेतच राहणार आहे. त्यामुळे अडचणीतील बॅँका वाचविण्यासाठी विरोधक कर्जमाफीची मागणी करीत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप चुकीचा आहे. खासगी सावकारांना हातभार लावणारे सरकार सहकारी बॅँकांबाबत दुजाभाव करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील निवडणुकीत कर्जमाफीची ग्वाही दिली. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्हाला अडीच वर्षांपूर्वीच पाठबळ दिले. त्यांच्याकडून आत्महत्या करणार नसल्याची खात्री का मागता? शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची खात्री मागणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री असतील. अशी हमी मागणाऱ्यांनी पहिल्यांदा दुष्काळाची हमी द्यावी, असेही मुश्रीफ म्हणाले.कर्जमाफीच द्यायची नसेल तर बदनामी तरी करू नकाराज्य सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफीच द्यायची नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री असे वक्तव्य करीत आहेत. कर्जमाफी द्यायची नसली तरी किमान सहकाराला बदनाम तरी करू नये, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले.