शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाचा वाटेकरी व्हायची इच्छा नाही - राणे

By admin | Updated: July 21, 2014 16:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २१-  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसने महाराष्ट्रात अपेक्षीत उपाययोजना केलेल्या नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे. सध्या फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले आहे. 
सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'ना'राजी नाम्याची कारणे दिले. काँग्रेसने सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. पण नऊ वर्ष वाट बघूनही मला मुख्यमंत्रीपद दिले नाही. माझ्यासोबत आलेल्यांना पक्षाने न्याय दिला नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. 
लोकसभेतील पराभवानंतर राज्यात काँग्रेसने काही पावले उचलायला हवी होती. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपाययोजना राबवणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने अद्याप तसे झालेले नाही असे राणेंनी सांगितले. जनतेसंबंधीचे निर्णय वेळेवर घेतले जात नाही, निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत दोष असून त्यांचा प्रशासनावर वचक नाही अशा आरोपांच्या फैरीच त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दिशेने झाडल्या. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय नाही. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असते. आगामी विधानसभा निवडणुकीतील या पराभवाच्या सामूहिक जबाबदारीतील घटक होण्याची इच्छा नसल्याने मी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी नमूद केले. 
आज संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांनी माझा राजीनामा स्वीकारल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करीन असे राणेंनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याविषयी सोनिया गांधींशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे राणेंना सांगितले आहे. भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी विचारले असता राणे म्हणाले,  मी भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा अथवा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय सध्या तरी घेतलेला नाही.