शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

पराभवाचा वाटेकरी व्हायची इच्छा नाही - राणे

By admin | Updated: July 21, 2014 16:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २१-  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसने महाराष्ट्रात अपेक्षीत उपाययोजना केलेल्या नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे. सध्या फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले आहे. 
सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'ना'राजी नाम्याची कारणे दिले. काँग्रेसने सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. पण नऊ वर्ष वाट बघूनही मला मुख्यमंत्रीपद दिले नाही. माझ्यासोबत आलेल्यांना पक्षाने न्याय दिला नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. 
लोकसभेतील पराभवानंतर राज्यात काँग्रेसने काही पावले उचलायला हवी होती. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपाययोजना राबवणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने अद्याप तसे झालेले नाही असे राणेंनी सांगितले. जनतेसंबंधीचे निर्णय वेळेवर घेतले जात नाही, निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत दोष असून त्यांचा प्रशासनावर वचक नाही अशा आरोपांच्या फैरीच त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दिशेने झाडल्या. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय नाही. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असते. आगामी विधानसभा निवडणुकीतील या पराभवाच्या सामूहिक जबाबदारीतील घटक होण्याची इच्छा नसल्याने मी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी नमूद केले. 
आज संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांनी माझा राजीनामा स्वीकारल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करीन असे राणेंनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याविषयी सोनिया गांधींशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे राणेंना सांगितले आहे. भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी विचारले असता राणे म्हणाले,  मी भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा अथवा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय सध्या तरी घेतलेला नाही.