शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

पराभवाचा वाटेकरी व्हायची इच्छा नाही - राणे

By admin | Updated: July 21, 2014 16:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २१-  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसने महाराष्ट्रात अपेक्षीत उपाययोजना केलेल्या नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे. सध्या फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले आहे. 
सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'ना'राजी नाम्याची कारणे दिले. काँग्रेसने सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. पण नऊ वर्ष वाट बघूनही मला मुख्यमंत्रीपद दिले नाही. माझ्यासोबत आलेल्यांना पक्षाने न्याय दिला नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. 
लोकसभेतील पराभवानंतर राज्यात काँग्रेसने काही पावले उचलायला हवी होती. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपाययोजना राबवणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने अद्याप तसे झालेले नाही असे राणेंनी सांगितले. जनतेसंबंधीचे निर्णय वेळेवर घेतले जात नाही, निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत दोष असून त्यांचा प्रशासनावर वचक नाही अशा आरोपांच्या फैरीच त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दिशेने झाडल्या. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय नाही. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असते. आगामी विधानसभा निवडणुकीतील या पराभवाच्या सामूहिक जबाबदारीतील घटक होण्याची इच्छा नसल्याने मी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी नमूद केले. 
आज संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांनी माझा राजीनामा स्वीकारल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करीन असे राणेंनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याविषयी सोनिया गांधींशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे राणेंना सांगितले आहे. भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी विचारले असता राणे म्हणाले,  मी भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा अथवा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय सध्या तरी घेतलेला नाही.