शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘हेरिटेज’ म्हणून कवटाळू नका

By admin | Updated: June 17, 2016 03:00 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ वांद्रे-कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला काही वकिलांनी विरोध केल्याने उच्च न्यायालयाने वकिलांनाच खडसावले. उच्च न्यायालयाची इमारत हेरिटेज

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ वांद्रे-कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला काही वकिलांनी विरोध केल्याने उच्च न्यायालयाने वकिलांनाच खडसावले. उच्च न्यायालयाची इमारत हेरिटेज आहे म्हणून कवटाळत बसू नका. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. पक्षकारांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे, हे लक्षात घ्या. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे वकिलांनी यात खोडा घालू नये, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने वकिलांना खडसावले. फोर्ट येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या हेरिटेज इमारतीची जागा कामकाजासाठी अपुरी असल्याने लवकरात लवकर उच्च न्यायालयाचा कारभार वांद्रे- कुर्ला संकुलनात स्थलांतरीत करण्यात यावा, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेल्या अहमद अब्दी यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. गुरुवारच्या सुनावणीत अ‍ॅड. आर. जयकर यांनी मध्यस्थी अर्ज करत उच्च न्यायालयाचा कारभार वांद्रे - कुर्ला संकुलात स्थालंतरीत करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली.ही इमारत पुरातन वास्तू असल्याने या इमारतीला वेगळादर्जा लाभला आहे. तसेच यापरिसरात अनेक वकिलांची कार्यालये आहेत. तसेच वकिलांना व पक्षकारांना हे ठिकाण सोयीचे आहे. त्यामुळे येथील कामकाज वांद्रे- कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद मध्यस्थीच्यावतीने ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी केला.त्यावर खंडपीठाने नाराजी दर्शवली. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ३० जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) विचार बदलण्याची वेळ आली आहे- ‘बरीच वर्ष पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकार उच्च न्यायालयासाठी बीकेसीत (वांद्रे - कुर्ला संकुल) भूखंड देण्यास तयार झाले आहे. आता यामध्ये वकिलांनी खोडा घालू नये. उच्च न्यायालयाचा कारभार दिवसेंदिवस वाढत आहे. ही जागा (फोर्ट येथील इमारत) कमी पडत आहे. पक्षकारांना बसण्यासाठी जागा नाही. तसेच पिण्याचे पाणी, शौचालये इत्यादी सुविधा अपुऱ्या पडत आहे. आमच्या चेंबर्सची जागाही कमी करण्यात येत आहे. कर्मचारी याचिकांच्या ढिगाखाली काम करत आहेत. जागेअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. वकिलांनी केवळ त्यांची सोय बघू नये. उच्च न्यायालयाची इमारत आणि वकिलांचे विचार बदलण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने वकिलांना खडसावले.