शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

‘हेरिटेज’ म्हणून कवटाळू नका

By admin | Updated: June 17, 2016 03:00 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ वांद्रे-कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला काही वकिलांनी विरोध केल्याने उच्च न्यायालयाने वकिलांनाच खडसावले. उच्च न्यायालयाची इमारत हेरिटेज

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ वांद्रे-कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला काही वकिलांनी विरोध केल्याने उच्च न्यायालयाने वकिलांनाच खडसावले. उच्च न्यायालयाची इमारत हेरिटेज आहे म्हणून कवटाळत बसू नका. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. पक्षकारांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे, हे लक्षात घ्या. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे वकिलांनी यात खोडा घालू नये, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने वकिलांना खडसावले. फोर्ट येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या हेरिटेज इमारतीची जागा कामकाजासाठी अपुरी असल्याने लवकरात लवकर उच्च न्यायालयाचा कारभार वांद्रे- कुर्ला संकुलनात स्थलांतरीत करण्यात यावा, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेल्या अहमद अब्दी यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. गुरुवारच्या सुनावणीत अ‍ॅड. आर. जयकर यांनी मध्यस्थी अर्ज करत उच्च न्यायालयाचा कारभार वांद्रे - कुर्ला संकुलात स्थालंतरीत करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली.ही इमारत पुरातन वास्तू असल्याने या इमारतीला वेगळादर्जा लाभला आहे. तसेच यापरिसरात अनेक वकिलांची कार्यालये आहेत. तसेच वकिलांना व पक्षकारांना हे ठिकाण सोयीचे आहे. त्यामुळे येथील कामकाज वांद्रे- कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद मध्यस्थीच्यावतीने ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी केला.त्यावर खंडपीठाने नाराजी दर्शवली. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ३० जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) विचार बदलण्याची वेळ आली आहे- ‘बरीच वर्ष पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकार उच्च न्यायालयासाठी बीकेसीत (वांद्रे - कुर्ला संकुल) भूखंड देण्यास तयार झाले आहे. आता यामध्ये वकिलांनी खोडा घालू नये. उच्च न्यायालयाचा कारभार दिवसेंदिवस वाढत आहे. ही जागा (फोर्ट येथील इमारत) कमी पडत आहे. पक्षकारांना बसण्यासाठी जागा नाही. तसेच पिण्याचे पाणी, शौचालये इत्यादी सुविधा अपुऱ्या पडत आहे. आमच्या चेंबर्सची जागाही कमी करण्यात येत आहे. कर्मचारी याचिकांच्या ढिगाखाली काम करत आहेत. जागेअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. वकिलांनी केवळ त्यांची सोय बघू नये. उच्च न्यायालयाची इमारत आणि वकिलांचे विचार बदलण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने वकिलांना खडसावले.