शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

भगवानगडावर ‘हक्क’ सांगू नये

By admin | Updated: September 30, 2016 02:15 IST

भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही हे आपण गत डिसेंबरलाच जाहीर केलेले आहे. राजकीय भाष्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची

अहमदनगर : भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही हे आपण गत डिसेंबरलाच जाहीर केलेले आहे. राजकीय भाष्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची निर्मिती केली आहे. त्यामुळे कुणीही भगवानगडासारख्या धार्मिक स्थळांवर राजकीय वारसा हक्क सांगू नये. हा गड भाविकांचा होता तो भाविकांचाच राहू द्या, असे आवाहन गडाचे महंत ह.भ. प. डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. ‘भगवान गड कुणाचा?’ असे भाष्य आज ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. यासंदर्भात नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याला गडाच्या ट्रस्टींनी विरोध केल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र, यात काहीही राजकारण नाही अथवा कुणीही नेता यापाठीमागे नाही. पंकजा मुंडे यांनी गतवर्षी गोपीनाथ गड काढला. त्या गडाच्या उद्घाटन समारंभातच ‘भगवानगड हा यापुढे केवळ भक्तीचा गड राहील तर राजकारण गोपीनाथ गडावरुन चालेल’, असे आपण जाहीर केले होते. त्यानंतर जानेवारीत भगवानगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमातही ‘भगवानगडावर यापुढे किर्तनकारांशिवाय कुणीही बोलणार नाही’,हे स्पष्ट केले आहे. सर्व समाजाने त्यावेळी या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. पंकजा यांनी दसऱ्याला गडावर जरुर यावे. मात्र त्यांना येथे भाषण करता येणार नाही, एवढेच आमचे म्हणणे आहे. भगवानबाबांची ही गादी सर्वांनी जपावी. पंकजा यांना भाषण करावयाचेच असेल तर ते गडाच्या पायथ्याशी करावे. त्यांना आमचा पाठिंबा राहील. भाषणासाठी हट्ट करुन कुणीही आपल्या नेत्याला लहान करु नये. मराठा समाजाने काहीही न बोलता मूकमोर्चे काढत एकजूट दाखवली. त्यामुळे भाषणावरुन समाजात भांडणे नकोत, असे शास्त्री म्हणाले. ( प्रतिनिधी)