शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

भगवानगडावर ‘हक्क’ सांगू नये

By admin | Updated: September 30, 2016 02:15 IST

भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही हे आपण गत डिसेंबरलाच जाहीर केलेले आहे. राजकीय भाष्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची

अहमदनगर : भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही हे आपण गत डिसेंबरलाच जाहीर केलेले आहे. राजकीय भाष्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची निर्मिती केली आहे. त्यामुळे कुणीही भगवानगडासारख्या धार्मिक स्थळांवर राजकीय वारसा हक्क सांगू नये. हा गड भाविकांचा होता तो भाविकांचाच राहू द्या, असे आवाहन गडाचे महंत ह.भ. प. डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. ‘भगवान गड कुणाचा?’ असे भाष्य आज ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. यासंदर्भात नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याला गडाच्या ट्रस्टींनी विरोध केल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र, यात काहीही राजकारण नाही अथवा कुणीही नेता यापाठीमागे नाही. पंकजा मुंडे यांनी गतवर्षी गोपीनाथ गड काढला. त्या गडाच्या उद्घाटन समारंभातच ‘भगवानगड हा यापुढे केवळ भक्तीचा गड राहील तर राजकारण गोपीनाथ गडावरुन चालेल’, असे आपण जाहीर केले होते. त्यानंतर जानेवारीत भगवानगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमातही ‘भगवानगडावर यापुढे किर्तनकारांशिवाय कुणीही बोलणार नाही’,हे स्पष्ट केले आहे. सर्व समाजाने त्यावेळी या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. पंकजा यांनी दसऱ्याला गडावर जरुर यावे. मात्र त्यांना येथे भाषण करता येणार नाही, एवढेच आमचे म्हणणे आहे. भगवानबाबांची ही गादी सर्वांनी जपावी. पंकजा यांना भाषण करावयाचेच असेल तर ते गडाच्या पायथ्याशी करावे. त्यांना आमचा पाठिंबा राहील. भाषणासाठी हट्ट करुन कुणीही आपल्या नेत्याला लहान करु नये. मराठा समाजाने काहीही न बोलता मूकमोर्चे काढत एकजूट दाखवली. त्यामुळे भाषणावरुन समाजात भांडणे नकोत, असे शास्त्री म्हणाले. ( प्रतिनिधी)