शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

पाण्याच्या बाटलीसाठी मुलांची कोंडी करू नका

By admin | Updated: April 29, 2016 06:09 IST

पाण्याची बाटली न आणण्याचा अट्टहास धरू नका. यामुळे शाळा आणि पालकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे

मुंबई : पाण्याची बाटली न आणण्याचा अट्टहास धरू नका. यामुळे शाळा आणि पालकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे आणि या वादात मुले भरडली जातील, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शाळांना मुलांना पाण्याची बाटली न आणण्याची सक्ती करू नका, असा निर्देश गुरुवारी दिला. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाच्या समितीने शाळांना वॉटर कुलर बसवण्यात यावे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी करता येईल, अशी शिफारस केली होती. शाळांनी वॉटर कुलर बसवले असतील तरी आपल्या मुलाला शुद्ध पाणी मिळेल की नाही, याबाबत पालकांच्या मनात भीती असेल. त्यामुळे मुलांबरोबर पाण्याची बाटली असण्याची शक्यता आहे. यामुळे पालकांत आणि शाळांत वाद होईल आणि या वादात मुलांची कोंडी नको. एका रात्रीत नव्हे तर टप्प्याटप्प्याने हे बदल होतील, असे न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने म्हटले.विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे त्यांच्या वजनाच्या २० ते ३० टक्के अधिक असते. त्यामुळे त्यांना बालवयातच पाठीचे व मणक्याचे दुखणे जडते. हे ओझे कमी करण्यासाठी पुस्तके ठेवण्यासाठी लॉकर्सची सुविधा, ई-लर्निंग, टॅब व अन्य सुविधा देण्याचे आदेश शाळांना द्यावेत, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या स्वाती लोखंडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी) >शाळांची तपासणी होणारगुरुवारच्या सुनावणीत सरकारी वकील पुर्णिमा कंथारिया यांनी अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे की नाही, हे तपासण्याकरिता शाळा निरीक्षक व शालेय अधिकाऱ्यांना शाळांना भेटी द्यायला सांगितले आहे. शाळांची तपासणी केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, याचा अहवाल सरकारपुढे सादर करण्यात येईल, असेही अ‍ॅड. कंथारिया यांनी खंडपीठाला सांगितले. विद्यार्थ्यांना पुस्तके ठेवण्यासाठी लॉकर्स, टॅब, वेगवेगळ्या विषयांसाठी एकच वही, अशा अनेक उपाययोजना सरकारने अधिसूचनेत नमूद केल्या आहेत. ‘शिफारशींची विचारपूर्वक अंमलबजावणी करायला हवी, मुंबईसारख्या ठिकाणी शाळांना लॉकर्स उपलब्ध करण्यासाठी जागा मिळणे शक्य आहे का? अनुदानित शाळांना टॅब घेणे परवडणारे आहे का? राज्य सरकार त्यासाठी निधी देणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शिफारशींची अंमलबजावणी टप्प्प्याटप्प्याने होणे आवश्यक आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.तसेच शाळा निरीक्षक व शिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल पुढील सुनावणीस उच्च न्यायालयापुढेही सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २७ जून रोजी ठेवली आहे.