शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

बस्त्यावर अवाजवी खर्च नको!

By admin | Updated: December 10, 2015 02:40 IST

वाढत्या महागाईत लग्न म्हणजे वधुपक्षाची परीक्षाच असते. त्यात वधुपित्याची स्थिती बेताची असल्यास कठीणच. ग्रामीण भागात मानपानाला फार महत्त्व असते.

मोताळा (जि. बुलडाणा) : वाढत्या महागाईत लग्न म्हणजे वधुपक्षाची परीक्षाच असते. त्यात वधुपित्याची स्थिती बेताची असल्यास कठीणच. ग्रामीण भागात मानपानाला फार महत्त्व असते. हे सर्व ध्यानी घेऊन लग्नाच्या बस्त्यावर केल्या जाणाऱ्या अनावश्यक खर्च टाळण्याचा अभिनव ठराव, लिहा ग्रामपंचायतीने एकमुखाने मंजूर केला आहे.लग्न समारंभात वर-वधुच्या वस्त्रांसह जवळच्या नातेवाईकांनाही मानपान दिला जातो. या मानपानात परस्परांकडून महागड्या वस्त्रांची अपेक्षा ठेवण्यात येते. हा सोहळा मनासारखा झाला नाही, तर बरेचदा संबंधांमध्ये कटुता निर्माण होते. यावर उपाय म्हणून, विवाह सोहळ्यातील हा अवाजवी खर्च न करण्याचा ठराव, लिहा बु. ग्रामपंचायतने सोमवारी मासिक सभेत मांडण्यात आला. नवनिर्वाचित सरपंच सुरेखा ईश्वर पाटील, माजी सरपंच ईश्वर पाटील, ग्रामसेवक शीतल गवई, ग्रा. पं. सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा ठराव एकमताने पारित करण्यात आला. समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाह समारंभातील ‘बस्ता’ खरेदीसाठी किमान वीस ते पंचवीस हजारांचा अतिरिक्त ताण वधुपक्षावर पडतो. या निर्णयामुळे किमान या गावातील लोकांचा हा खर्च वाचण्यास मदत होईल. या संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा निर्णयही सरपंच सुरेखा ईश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)