शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

...तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही - नारायण भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 05:11 IST

विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी अशीच सुरू राहिली तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे

मुंबई : विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी अशीच सुरू राहिली तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक डॉ. नारायण भोसले यांनी बुधवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात व्याख्यानात व्यक्त केले. इतिहास संशोधन मंडळातर्फे बुधवारी ‘राणीची बाग काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी भोसले बोलत होते. या वेळी इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष दत्ता पवार उपस्थित होते. मनुष्य स्वत:च्या फायद्यासाठी निसर्गाचे अतोनात नुकसान करत आहे, याचे दुष्परिणाम सारे जग अनुभवत आहे. हेच एक दिवस जगाच्या विनाशाचे कारण बनणार आहे. भोसले यांनी मोगल काळापासून देशभरात उभारण्यात आलेल्या बागांविषयीची माहिती दिली. मोगल, ब्रिटिशांनी बागा का आणि कशा उभारल्या याविषयी इत्थंभूत माहिती देताना ते म्हणाले की, ब्रिटिशांचे वास्तव्य भारतात असताना त्यांनी देशाचा सखोल अभ्यास केला. देशाचे हवामान, वन्यजीव, माती, लोकसंख्या, संस्कृती, खाद्यसंस्कृती, आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुरूप देशात वास्तू उभारल्या. त्यात बागांचाही मोठा वाटा होता. (प्रतिनिधी)पेंग्विनची काळजी घेण्यास प्रशासन असमर्थस्वातंत्र्यानंतर भारताने मात्र देशाचा अभ्यास परिपूर्ण केला नाही त्यामुळेच राणीबागेत परदेशातून आणलेल्या पेंग्विनची काळजी घेण्यास प्रशासन असमर्थ ठरले. ३५ अंशाहून अधिक तापमान असलेल्या मुंबईत पेंग्विनची योग्य काळजी घेतली असती तर पेंग्विनवर मृत्यू ओढावला नसता, अशी खंत भोसले यांनी व्यक्त केली.राणीची ‘बाग’ उत्कृष्ट प्रयोगशाळाराणीची बाग ही केवळ बाग नसून तेथील वनस्पती उद्यान ही एक प्रयोगशाळा आहे. यात ८५३ जातीच्या वनस्पती, २८६ प्रकारचे मोठे वृक्ष आहेत. दररोज ३ हजारांहून अधिक नागरिक राणीबागेला भेट देतात. या वनस्पतींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन भोसले यांनी केले.मुंबईची परिस्थिती बिकट जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगभरातील ९० टक्के लोक हे निसर्गाच्या असुंतलनामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्यांनी त्रस्त आहेत. अहवालानुसार दर एक हजार माणसांमागे तीन एकर जमीन हिरवी असायला हवी तरच मानवी आरोग्य चांगले राहील. मात्र मुंबईत एक हजार माणसांमागे फक्त ०.००३ एवढीच जमीन हिरवी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.