शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

...तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही - नारायण भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2016 05:11 IST

विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी अशीच सुरू राहिली तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे

मुंबई : विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी अशीच सुरू राहिली तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक डॉ. नारायण भोसले यांनी बुधवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात व्याख्यानात व्यक्त केले. इतिहास संशोधन मंडळातर्फे बुधवारी ‘राणीची बाग काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी भोसले बोलत होते. या वेळी इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष दत्ता पवार उपस्थित होते. मनुष्य स्वत:च्या फायद्यासाठी निसर्गाचे अतोनात नुकसान करत आहे, याचे दुष्परिणाम सारे जग अनुभवत आहे. हेच एक दिवस जगाच्या विनाशाचे कारण बनणार आहे. भोसले यांनी मोगल काळापासून देशभरात उभारण्यात आलेल्या बागांविषयीची माहिती दिली. मोगल, ब्रिटिशांनी बागा का आणि कशा उभारल्या याविषयी इत्थंभूत माहिती देताना ते म्हणाले की, ब्रिटिशांचे वास्तव्य भारतात असताना त्यांनी देशाचा सखोल अभ्यास केला. देशाचे हवामान, वन्यजीव, माती, लोकसंख्या, संस्कृती, खाद्यसंस्कृती, आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुरूप देशात वास्तू उभारल्या. त्यात बागांचाही मोठा वाटा होता. (प्रतिनिधी)पेंग्विनची काळजी घेण्यास प्रशासन असमर्थस्वातंत्र्यानंतर भारताने मात्र देशाचा अभ्यास परिपूर्ण केला नाही त्यामुळेच राणीबागेत परदेशातून आणलेल्या पेंग्विनची काळजी घेण्यास प्रशासन असमर्थ ठरले. ३५ अंशाहून अधिक तापमान असलेल्या मुंबईत पेंग्विनची योग्य काळजी घेतली असती तर पेंग्विनवर मृत्यू ओढावला नसता, अशी खंत भोसले यांनी व्यक्त केली.राणीची ‘बाग’ उत्कृष्ट प्रयोगशाळाराणीची बाग ही केवळ बाग नसून तेथील वनस्पती उद्यान ही एक प्रयोगशाळा आहे. यात ८५३ जातीच्या वनस्पती, २८६ प्रकारचे मोठे वृक्ष आहेत. दररोज ३ हजारांहून अधिक नागरिक राणीबागेला भेट देतात. या वनस्पतींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन भोसले यांनी केले.मुंबईची परिस्थिती बिकट जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगभरातील ९० टक्के लोक हे निसर्गाच्या असुंतलनामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्यांनी त्रस्त आहेत. अहवालानुसार दर एक हजार माणसांमागे तीन एकर जमीन हिरवी असायला हवी तरच मानवी आरोग्य चांगले राहील. मात्र मुंबईत एक हजार माणसांमागे फक्त ०.००३ एवढीच जमीन हिरवी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.