शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतक-यांची घुसमट होऊ देऊ नका !

By admin | Updated: October 26, 2015 01:54 IST

नाना पाटेकर यांनी प्रतकार परिषदेत नागरिकांना केले अवाहन.

बुलडाणा : शेतकर्‍यांची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्यामुळे तो नैराश्येपोटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. शेतकर्‍यांची ही घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी केले. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील १३८ शेतकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे रविवारी बुलडाणा येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पाटेकर पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असतो, आपल्याच आनंदात असतो. मात्र आता मनाच्या भींती तोडून एकमेकांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, कारण ही चळवळ लोकांनी लोकांसाठी चालविलेली चळवळ आहे. या चळवळीत मकरंद फार वर्षापासून आहे.आता या कामाला अनेकांची साथ मिळत असल्यामुळे ह्यनामह्ण च्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात काम सुरू झाले आहे. नैराश्येपोटी मृत्युला कवटाळलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाच्या संवेदना आपल्याला जाणवल्या म्हणून या चळवळीत आलो. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देऊन थांबणार नाही. त्यांच्यामध्ये जगण्याचं बळ निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. मराठवाड्यानंतर विदर्भ, खान्देशमधील आ त्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात येत आहे. पुढील टप्प्यात थेट कार्यक्रमा तून मदत न देता, नामच्या कार्यकर्त्यांंच्या माध्यमातून मदत देण्यात येईल. घरातील क र्ता पुरुष जाण्यामुळे त्या कुटुंबाला जगण्याचं बळ निर्माण करण्यासाठी छोटे व्यवसाय, उद्योग मिळवून देण्यासाठी सुध्दा काम करणार असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी अँड.विजय सावळे, अँड. दिपक पाटील आदी उपस्थित होते.