शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

शेतक-यांची घुसमट होऊ देऊ नका !

By admin | Updated: October 26, 2015 01:54 IST

नाना पाटेकर यांनी प्रतकार परिषदेत नागरिकांना केले अवाहन.

बुलडाणा : शेतकर्‍यांची विविध कारणांमुळे घुसमट होत असल्यामुळे तो नैराश्येपोटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. शेतकर्‍यांची ही घुसमट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी केले. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील १३८ शेतकरी कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे रविवारी बुलडाणा येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पाटेकर पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असतो, आपल्याच आनंदात असतो. मात्र आता मनाच्या भींती तोडून एकमेकांच्या दु:खात सहभागी झाले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, कारण ही चळवळ लोकांनी लोकांसाठी चालविलेली चळवळ आहे. या चळवळीत मकरंद फार वर्षापासून आहे.आता या कामाला अनेकांची साथ मिळत असल्यामुळे ह्यनामह्ण च्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात काम सुरू झाले आहे. नैराश्येपोटी मृत्युला कवटाळलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबाच्या संवेदना आपल्याला जाणवल्या म्हणून या चळवळीत आलो. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देऊन थांबणार नाही. त्यांच्यामध्ये जगण्याचं बळ निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार आहे. मराठवाड्यानंतर विदर्भ, खान्देशमधील आ त्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात येत आहे. पुढील टप्प्यात थेट कार्यक्रमा तून मदत न देता, नामच्या कार्यकर्त्यांंच्या माध्यमातून मदत देण्यात येईल. घरातील क र्ता पुरुष जाण्यामुळे त्या कुटुंबाला जगण्याचं बळ निर्माण करण्यासाठी छोटे व्यवसाय, उद्योग मिळवून देण्यासाठी सुध्दा काम करणार असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी अँड.विजय सावळे, अँड. दिपक पाटील आदी उपस्थित होते.