शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

रात्री दहानंतर चौकशी नको

By admin | Updated: October 22, 2015 02:18 IST

कोठडी मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याने, किरकोळ गुन्ह्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची रात्री दहानंतर चौकशी न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने

मुंबई : कोठडी मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याने, किरकोळ गुन्ह्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची रात्री दहानंतर चौकशी न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांना दिला, तसेच पुढील सहा महिन्यांत एकही कोठडी मृत्यू होणार नाही, याची काळजी घेण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.गेल्या वर्षी दोन तरुणांचा कोठडी मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकत नाही, अशा किरकोळ गुन्ह्यासाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीची रात्री दहानंतर चौकशी करण्यात येऊ नये, असा आदेश खंडपीठाने पोलिसांना दिला.आरोपीला पोलीस स्टेशनमध्येच वकिलाचे सहाय्य हवे की नाही, याची विचारणा करावी, तसेच आरोपीला दंडाधिकाऱ्यांपुढे पहिल्यांदाच हजर केल्यानंतर त्यांनीही त्याला वकिलाचे सहाय्य हवे की नको, या विषयी विचारणा करावी, असा आदेश खंडपीठाने पोलिसांना आणि दंडाधिकाऱ्यांना दिला, तसेच कोठडी मृत्यू रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यासाठी पोलीस महासंचालकांना तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.बुधवारच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मुंबईच्या पोलीस स्टेशन्समध्ये प्रायोगिक तत्त्वावर २५ सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. यापुढे टप्प्याटप्प्याने सर्व पोलीस स्टेशन्समध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी) अ‍ॅग्नेलो वालद्रिस कोठडी मृत्यूप्रकरणअ‍ॅग्नेलो वालद्रिस याच्या कोठडी मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोपपत्र दाखल करण्यास सीबीआय दिल्ली मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्याची माहिती मुंबई सीबीआयने बुधवारी खंडपीठाला दिली.१५ एप्रिल २०१४ रोजी वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनने अ‍ॅग्नेलो आणि अन्य तीन जणांना ६० हजारांची चेन चोरल्याप्रकरणी ताब्यात घेतले. कोठडीत या तिघांचाही शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या छळामुळे त्याचा १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. 2014 जूनमध्ये त्याचे वडील लिओनार्दो वालद्रिस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावाणीवेळी खंडपीठाने मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासावर अविश्वास व्यक्त करत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.