शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प नको - उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 4, 2017 18:49 IST

निवडणूकीत जाती, धर्माच्या आधारावर मत मागू नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिला. त्याचप्रमाणे निवडणूकीच्या तोंडावर बजेटमधून..

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 4 -  निवणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प जाहीर झाल्यास सत्ताधारी पक्ष त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी व्यक्त केले आहे. "सत्ताधारी पक्षही निवडणुकीत सहभागी होत असतो. त्यामुळे  निवडणुकीदरम्यान बजेटमधून आकर्षक घोषणा केल्या जातात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये, अशी मागणी उद्धव यांनी केली. 
आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज रंगशारदा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्यासाठी उत्सूक असलेल्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नोटाबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्यांवरून आक्रमक भूमिका मांडली. 
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की, "शिवसेना काय बोलते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.  मी जे काही करेन ते बोलून करणार, न बोलून काही करणार नाही. आपण कुठे नेऊन महाराष्ट्र ठेवला बघायची गरज आहे आणि मला बोलू न देणारा जन्माला यायचा आहे." 
नरेंद्र मोदी यांच्यावरही उद्धव यांनी जोरदार शरसंधान केले, "मोदींनी जाहीर केलेल्या काही योजना जुन्याच आहेत. हिंदू धर्माच्या नावावर मत मागत नाही, पण हिंदू धर्माच रक्षण करण्याची गरज पडली तर आम्ही मागे हटणार नाही.  हिंदुत्व कधीही सोडणार नाही."
यावर्षी फेब्रुवारीच्या एक तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यावरही उद्धवनी वाग्बाण सोडले. "सत्ताधारी पक्षही निवडणुकीत सहभागी होत असतो. त्यामुळे  निवडणुकीदरम्यान बजेटमधून आकर्षक घोषणा केल्या जातात. त्यामुळे विरोधी पक्षांना फटका बसू शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये," त्यासाठी राष्ट्रपतींकडे विशेषाधिकार असतील तर त्यांनी ते वापरावेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.