शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प नको - उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 4, 2017 18:49 IST

निवडणूकीत जाती, धर्माच्या आधारावर मत मागू नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिला. त्याचप्रमाणे निवडणूकीच्या तोंडावर बजेटमधून..

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 4 -  निवणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प जाहीर झाल्यास सत्ताधारी पक्ष त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी व्यक्त केले आहे. "सत्ताधारी पक्षही निवडणुकीत सहभागी होत असतो. त्यामुळे  निवडणुकीदरम्यान बजेटमधून आकर्षक घोषणा केल्या जातात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये, अशी मागणी उद्धव यांनी केली. 
आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज रंगशारदा येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्यासाठी उत्सूक असलेल्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नोटाबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्यांवरून आक्रमक भूमिका मांडली. 
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की, "शिवसेना काय बोलते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.  मी जे काही करेन ते बोलून करणार, न बोलून काही करणार नाही. आपण कुठे नेऊन महाराष्ट्र ठेवला बघायची गरज आहे आणि मला बोलू न देणारा जन्माला यायचा आहे." 
नरेंद्र मोदी यांच्यावरही उद्धव यांनी जोरदार शरसंधान केले, "मोदींनी जाहीर केलेल्या काही योजना जुन्याच आहेत. हिंदू धर्माच्या नावावर मत मागत नाही, पण हिंदू धर्माच रक्षण करण्याची गरज पडली तर आम्ही मागे हटणार नाही.  हिंदुत्व कधीही सोडणार नाही."
यावर्षी फेब्रुवारीच्या एक तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. त्यावरही उद्धवनी वाग्बाण सोडले. "सत्ताधारी पक्षही निवडणुकीत सहभागी होत असतो. त्यामुळे  निवडणुकीदरम्यान बजेटमधून आकर्षक घोषणा केल्या जातात. त्यामुळे विरोधी पक्षांना फटका बसू शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नये," त्यासाठी राष्ट्रपतींकडे विशेषाधिकार असतील तर त्यांनी ते वापरावेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.