शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

शिक्षणाचा बळी नको

By admin | Updated: July 15, 2016 03:29 IST

शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या वादात मुलाच्या शिक्षणाचा बळी नको, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने शाळेतून काढण्यात आल्याने १२ वर्षांच्या मुलाला तातडीने

मुंबई : शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या वादात मुलाच्या शिक्षणाचा बळी नको, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने शाळेतून काढण्यात आल्याने १२ वर्षांच्या मुलाला तातडीने अन्य शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला.मरिन लाइन्सच्या एचव्हीबी ग्लोबल शाळेने १२ वर्षांच्या एका मुलाला शाळेतून जबरदस्तीने काढले. त्याच्या वडिलांनी शाळेच्या अवास्तव फीबद्दल शाळा व्यवस्थापनाकडे प्रश्न केल्याने शाळेने त्या मुलालाच शाळेतून काढून टाकले. त्यामुळे मुलाच्या वडिलांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहिले. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले. मुलाच्या वडिलांनी ट्युशन फी देण्यास नकार दिल्याने मुलाला शाळेतून काढण्यात आले, अशी माहिती शाळेच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळके यांनी उच्च न्यायालयाला दिली. शाळेच्या म्हणण्यानुसार, मार्च २०१५ मध्ये मुलाला २५ हजार रुपये अ‍ॅडमिशन फी आणि ट्युशन फी म्हणून ८५ हजार रुपये घेऊन शाळेत दाखल केले. आॅगस्टमध्ये मुलाच्या पालकांना दुसऱ्या टर्मसाठी ट्युशन फी भरण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याच्या पालकांनी फी भरण्यास नकार दिला. ‘शाळेची फी आधीच भरली आहे,’ असे म्हणत मुलाच्या पालकांनी फी भरण्यास नकार दिला. तरीही शाळेने त्याला वार्षिक परीक्षेला बसू दिले आणि निकालही दिला. मात्र, शाळा सोडण्याच्या दाखल्यावर फी भरली नसल्याचा शेरा दिला,’ असे खंडपीठाला सांगितले.‘मुलाला पुन्हा त्याच शाळेत न पाठवणे, हेच त्याच्या हिताचे आहे. कारण पुन्हा हाच वाद निर्माण होईल. मुलाला अन्य शाळेत प्रवेश मिळावा, हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.’ (प्रतिनिधी)