शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शिक्षणाचा बळी नको

By admin | Updated: July 15, 2016 03:29 IST

शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या वादात मुलाच्या शिक्षणाचा बळी नको, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने शाळेतून काढण्यात आल्याने १२ वर्षांच्या मुलाला तातडीने

मुंबई : शाळा व्यवस्थापन आणि पालकांच्या वादात मुलाच्या शिक्षणाचा बळी नको, असे निरीक्षण नोंदवत, उच्च न्यायालयाने शाळेतून काढण्यात आल्याने १२ वर्षांच्या मुलाला तातडीने अन्य शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला.मरिन लाइन्सच्या एचव्हीबी ग्लोबल शाळेने १२ वर्षांच्या एका मुलाला शाळेतून जबरदस्तीने काढले. त्याच्या वडिलांनी शाळेच्या अवास्तव फीबद्दल शाळा व्यवस्थापनाकडे प्रश्न केल्याने शाळेने त्या मुलालाच शाळेतून काढून टाकले. त्यामुळे मुलाच्या वडिलांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहिले. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले. मुलाच्या वडिलांनी ट्युशन फी देण्यास नकार दिल्याने मुलाला शाळेतून काढण्यात आले, अशी माहिती शाळेच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळके यांनी उच्च न्यायालयाला दिली. शाळेच्या म्हणण्यानुसार, मार्च २०१५ मध्ये मुलाला २५ हजार रुपये अ‍ॅडमिशन फी आणि ट्युशन फी म्हणून ८५ हजार रुपये घेऊन शाळेत दाखल केले. आॅगस्टमध्ये मुलाच्या पालकांना दुसऱ्या टर्मसाठी ट्युशन फी भरण्यास सांगण्यात आले. मात्र, त्याच्या पालकांनी फी भरण्यास नकार दिला. ‘शाळेची फी आधीच भरली आहे,’ असे म्हणत मुलाच्या पालकांनी फी भरण्यास नकार दिला. तरीही शाळेने त्याला वार्षिक परीक्षेला बसू दिले आणि निकालही दिला. मात्र, शाळा सोडण्याच्या दाखल्यावर फी भरली नसल्याचा शेरा दिला,’ असे खंडपीठाला सांगितले.‘मुलाला पुन्हा त्याच शाळेत न पाठवणे, हेच त्याच्या हिताचे आहे. कारण पुन्हा हाच वाद निर्माण होईल. मुलाला अन्य शाळेत प्रवेश मिळावा, हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.’ (प्रतिनिधी)