शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

आगरी समाजाचा खासदार होऊ नये म्हणून रायगडची विभागणी

By admin | Updated: October 17, 2016 02:42 IST

समाजातील इतर घटकांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागत कामा नये.

पनवेल : समाजातील इतर घटकांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागत कामा नये. नवी मुंबई, रायगड परिसरातील स्थानिक आगरी समाजावर अन्याय होत आलेला आहे. समाजात उच्चशिक्षितांची संख्या मोठी असली तरी अनेक जण नोकरीपासून वंचित आहेत. रायगड जिल्ह्यातून आगरी समाजाचा खासदार होऊ नये, म्हणून जिल्ह्याची विभागणी तीन भागात केली गेली असल्याचा आरोप परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी पनवेल येथे केला. रविवारी पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात आगरी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. रायगडचा काही भाग मावळला जोडला तर उर्वरित भाग रत्नागिरीला जोडला गेल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अखिल आगरी समाज परिषदेच्या आजी-माजी सदस्यांसह आगरी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंडल आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे ही मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली. गेल्या २५ वर्षांत आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात काय वस्तुस्थिती आहे, ज्या ओबीसी समूहासाठी मंडल आयोग आणला गेला त्या समूहाची स्थिती काय आहे, मंडल आयोगाने ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले आहे. व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली नव्हती. फक्त शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये राखीव जागा दिल्या आहेत. संपूर्ण मंडल आयोगाची अंमलबजावणी अद्याप बाकी असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. समाज परिषदेच्या मेळाव्याला विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष दशरथ पाटील, सनदी लेखापाल जे. डी. तांडेल, दत्तात्रेय पाटील, जयवंत तांडेल, जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, बाळकृष्ण पूर्णेकर, कामगार नेते सुरेश ठाकूर, मयुरेश कोटकर, गोपाळ पाटील, के. एस. पाटील आदींसह आगरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबईत निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चाला आगरी समाजाचा पाठिंबा असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या. मात्र मोर्चाला पाठिंबा कोणी दिला होता, असा सवाल उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष व आगरी समाजाचे गोपाळ पाटील यांनी उपस्थित केला. आगरी समाजातील नेते केवळ मतांसाठी समाजाचा वापर करत असतात असा आरोप करीत समाजासाठी सर्वांनी पुढाकार घायची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.