शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

आगरी समाजाचा खासदार होऊ नये म्हणून रायगडची विभागणी

By admin | Updated: October 17, 2016 02:42 IST

समाजातील इतर घटकांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागत कामा नये.

पनवेल : समाजातील इतर घटकांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागत कामा नये. नवी मुंबई, रायगड परिसरातील स्थानिक आगरी समाजावर अन्याय होत आलेला आहे. समाजात उच्चशिक्षितांची संख्या मोठी असली तरी अनेक जण नोकरीपासून वंचित आहेत. रायगड जिल्ह्यातून आगरी समाजाचा खासदार होऊ नये, म्हणून जिल्ह्याची विभागणी तीन भागात केली गेली असल्याचा आरोप परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी पनवेल येथे केला. रविवारी पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात आगरी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. रायगडचा काही भाग मावळला जोडला तर उर्वरित भाग रत्नागिरीला जोडला गेल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अखिल आगरी समाज परिषदेच्या आजी-माजी सदस्यांसह आगरी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंडल आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे ही मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली. गेल्या २५ वर्षांत आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात काय वस्तुस्थिती आहे, ज्या ओबीसी समूहासाठी मंडल आयोग आणला गेला त्या समूहाची स्थिती काय आहे, मंडल आयोगाने ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले आहे. व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली नव्हती. फक्त शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये राखीव जागा दिल्या आहेत. संपूर्ण मंडल आयोगाची अंमलबजावणी अद्याप बाकी असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. समाज परिषदेच्या मेळाव्याला विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष दशरथ पाटील, सनदी लेखापाल जे. डी. तांडेल, दत्तात्रेय पाटील, जयवंत तांडेल, जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, बाळकृष्ण पूर्णेकर, कामगार नेते सुरेश ठाकूर, मयुरेश कोटकर, गोपाळ पाटील, के. एस. पाटील आदींसह आगरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबईत निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चाला आगरी समाजाचा पाठिंबा असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या. मात्र मोर्चाला पाठिंबा कोणी दिला होता, असा सवाल उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष व आगरी समाजाचे गोपाळ पाटील यांनी उपस्थित केला. आगरी समाजातील नेते केवळ मतांसाठी समाजाचा वापर करत असतात असा आरोप करीत समाजासाठी सर्वांनी पुढाकार घायची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.