शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

आगरी समाजाचा खासदार होऊ नये म्हणून रायगडची विभागणी

By admin | Updated: October 17, 2016 02:42 IST

समाजातील इतर घटकांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागत कामा नये.

पनवेल : समाजातील इतर घटकांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागत कामा नये. नवी मुंबई, रायगड परिसरातील स्थानिक आगरी समाजावर अन्याय होत आलेला आहे. समाजात उच्चशिक्षितांची संख्या मोठी असली तरी अनेक जण नोकरीपासून वंचित आहेत. रायगड जिल्ह्यातून आगरी समाजाचा खासदार होऊ नये, म्हणून जिल्ह्याची विभागणी तीन भागात केली गेली असल्याचा आरोप परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी पनवेल येथे केला. रविवारी पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात आगरी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. रायगडचा काही भाग मावळला जोडला तर उर्वरित भाग रत्नागिरीला जोडला गेल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अखिल आगरी समाज परिषदेच्या आजी-माजी सदस्यांसह आगरी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंडल आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे ही मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली. गेल्या २५ वर्षांत आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात काय वस्तुस्थिती आहे, ज्या ओबीसी समूहासाठी मंडल आयोग आणला गेला त्या समूहाची स्थिती काय आहे, मंडल आयोगाने ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले आहे. व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली नव्हती. फक्त शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये राखीव जागा दिल्या आहेत. संपूर्ण मंडल आयोगाची अंमलबजावणी अद्याप बाकी असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. समाज परिषदेच्या मेळाव्याला विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपाध्यक्ष दशरथ पाटील, सनदी लेखापाल जे. डी. तांडेल, दत्तात्रेय पाटील, जयवंत तांडेल, जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, बाळकृष्ण पूर्णेकर, कामगार नेते सुरेश ठाकूर, मयुरेश कोटकर, गोपाळ पाटील, के. एस. पाटील आदींसह आगरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबईत निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चाला आगरी समाजाचा पाठिंबा असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या. मात्र मोर्चाला पाठिंबा कोणी दिला होता, असा सवाल उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष व आगरी समाजाचे गोपाळ पाटील यांनी उपस्थित केला. आगरी समाजातील नेते केवळ मतांसाठी समाजाचा वापर करत असतात असा आरोप करीत समाजासाठी सर्वांनी पुढाकार घायची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.