शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ६५१ विक्रमी अर्ज दाखल

By admin | Updated: February 6, 2017 23:46 IST

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ : पं. स.च्या १०० जागांसाठी ४२३ जणांची उमेदवारी

जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ : पं. स.च्या १०० जागांसाठी ४२३ जणांची उमेदवारीसिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सहाव्या व शेवटच्या दिवशी अनुक्रमे १७९ व ३४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या ५० जागांसाठी २२८ उमेदवारांनी नामनिर्देशन तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४२३ उमेदवाराांक्ष नामनिर्देशन दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण दाखल अर्जांची संख्या ६५१ झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १३ फेब्रुवारी रोजी असून यावेळी किती उमेदवार निवडणूक लढविणार हे निश्चित होणार आहे. इच्छुकांना पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने नेत्यांची आज डोकेदुखी वाढली आहे. २१ फेब्रुवारी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी १२५८ उमेदवारांनी केली होती आॅनलाईन नोंदणी जि. प. व प. स.साठी इच्छुक १२५८ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. यात जिल्हा परिषदेसाठी ४८२ तर पंचायत समितीसाठी ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यात जि. प.साठी ४८२ तर पं. स.साठी ७७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात मात्र ६५१ उमेदवारांनी ६ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल केले आहेत. सोमवारी दाखल झालेले अर्ज सोमवारी वैभववाडी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १२ तर पंचायत समितीसाठी २0 अर्ज दाखल झाले. कणकवली तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २५ तर पंचायत समितीसाठी ४५ अर्ज दाखल झाले. मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २३ तर पंचायत समितीसाठी ४९ अर्ज दाखल झाले. सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ३१ तर पंचायत समितीसाठी ६३ अर्ज दाखल झाले. दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १0 तर पंचायत समितीसाठी २६ अर्ज दाखल झाले. देवगड तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १२ तर पंचायत समितीसाठी २७ अर्ज दाखल झाले. कुडाळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी ४१ तर पंचायत समितीसाठी ६७ अर्ज दाखल झाले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी २५ तर पंचायत समितीसाठी ५४ अर्ज दाखल झाले आहेत. १३ मे रोजी चित्र स्पष्ट होणार जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २२८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. तर पंचायत समित्यांच्या १०० जागांसाठी ४२३ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली ैआहेत. असे असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १३ फेब्रुवारी आहे. त्यामुळे कीती उमेदवार निवडणूक रिंंगणातून माघार घेणार व किती उमेदवार निवडणूक लढविणार हे चित्र १३ रोजीच स्पष्ट होणार आहे.