शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जातपडताळणीसाठी जिल्हा समित्या नेमा -हायकोर्ट

By admin | Updated: January 18, 2015 01:01 IST

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणीस सध्या विबागीय पातळीवर समित्या आहेत.

मुंबई : सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह जातीच्या दाखल्यांची पडतळणी करण्याची गरज असलेल्या सर्वच संबंधितांना लवकर न्याय मिळावा व बनावट दाखल्यांच्या आधारे नोकरी अथवा शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करता यावी यासाठी सरकारने जिल्हा पातळीवर जात पडताळणी समित्या स्थापन कराव्यात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणीस सध्या विबागीय पातळीवर समित्या आहेत. परंतु या विभागीय समित्यांकडे हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत व त्यांवर निर्णय होण्यास अनेक वर्षे लागतात. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आत्मचिंतन करावे आणि जात पडताळणीसाठी जिल्हा पातळीवर समित्या स्थापन कराव्यात, असे न्यायालयाने म्हटले.रुचिरा मनोज बेंडे (पूर्वाश्रमीच्या कु. मीना रामचंद्र सोनकुसरे) यांनी केलेली याचिका मंजूर करताना दिलेल्या निकालात न्या. नरेश पाटील व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.रुचिरा बेंडे यांनी ठाणे जिल्हा परिषदेत नोकरीस लागताना ‘हळबा-कोष्टी’ या अनुसूचित जमातीचा जन्मदाखला दिला होता. पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण नागपूर येथील जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. २००८ पासून मागणी करूनही बेंडे यांनी वैधता दाखला दिला नाही म्हणून जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना बडतर्फ केले होते. खंडपीठाने ही बडतर्फी रद्द केली व बेंडे यांच्या पडताळणी अर्जावर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला. (विशेष प्रतिनिधी)बडतर्फीचा अधिकार नाहीकोणाच्याही जातीच्या दाखल्याची पडताळणी करून वैधता दाखला देण्याचा अधिकार कायद्याने फक्त जात पडताळणी समितीलाच आहे. बनावट जात दाखल्याच्या आधारे नोकरीसह इतर लाभ रद्द करण्याची कायद्यात तरतूद असली तरी ही कारवाई जातीचा दाखला समितीने अवैध ठरवून रद्द केल्यानंतर करता येते. त्यामुळे तसा निर्णय होण्यापूर्वी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पडताळणी न झाल्याने मुळात दाखला वैध नाही, असे गृहीत धरून कर्मचाऱ्यास बडतर्फ करू शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.या सुनावणीत समितीच्या वकिलाने, ४,५०० हजार प्रकरणे प्रलंबित असल्याने या प्रकरणाच्या निकालास दीड वर्ष लागू शकेल, असे सांगितले. ते लक्षात घेऊन न्यायालयाने वरील निर्देश दिले. अर्जदार बेंडे यांच्यासाठी अ‍ॅड. आर. के. मेंदाडकर यांनी, जिल्हा परिषदेसाठी अ‍ॅड. सी. पी. यादव यांनी तर समितीसाठी अ‍ॅड. शंकर थोरात यांनी काम पाहिले.