शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

आराखड्याबाबत उदासीनता

By admin | Updated: July 23, 2016 01:58 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक गावात पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक गावात पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामस्थांचा अपेक्षीत सहभाग नसल्याने सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचा उद्देश फारसा यशस्वी होताना दिसत नाही. तालुक्यात १० पंचायत समिती गण असून, प्रत्येक गणासाठी एक प्रभारी अधिकारी, प्रवीण प्रशिक्षक यांना यशदामार्फत प्रशिक्षण दिले आहे. त्यांची जिल्हा परिषदेमार्फत कामासाठी निवड करण्यात आली. दि. ४ जुलैपासून कार्यक्रम सुरू केला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन-चार दिवस कार्यक्रम राबवण्यात येत आहे.‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी नीलेश काळे यांनी केले आहे.तालुक्यात १०४ ग्रामपंचायती असून, त्यांपैकी २१ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे. उर्वरित ग्रामपंचायतीत ही योजना पुढील काळात होणार आहे. याकरिता ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमात काही गावे वगळता बहुतांश गावांत ग्रामस्थांचा सहभाग अतिशय कमी होता. शासकीय अधिकारी या योजनेसाठी खूप मेहनत घेताना दिसत आहेत. परंतु त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे ग्रामस्थांच्या हिताचे आहे. परंतु ते होताना दिसत नाही.योजनेची माहिती कार्यशाळेद्वारे प्रथम सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आदींना देण्यात आली. नंतर आराखडा करण्याचे काम सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत स्वनिधी, १४ व्या वित्त आयोगाचा निधी यामधुन ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करुन तो ग्रामसभेत मंजुर करायचा आहे. महिला सभा, वॉर्डसभा, युवक व युवती सभा, मासिक सभा घेऊन यांची मते आजमावून आराखडा तयार करायचा आहे. ग्रामस्थांनी यात सहभागी होणे गरजेचे आहे. उर्वरित गावात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाल्यास परिपूर्ण विकास आराखडा करता येईल. (वार्ताहर)>विविध उपक्रम : ग्रामस्थांशी चर्चाआराखड्यात वित्त आयोगाचा २५ टक्के, मानवी निर्देशांक (शिक्षण,आरोग्य,उपजिविका) १० टक्के, महिला-बालकल्याण व अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारीनुसार खर्च करणे बंधनकारक आहे. योजनेत प्रभारी अधिकारी व प्रवीण प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत गावातून मशालफेरी काढण्यात येते. चर्चासत्रात ग्रामपंचायतीची बलस्थाने, कुमकुवत घटना, संधी, धोके यांचे विश्लेषण होते, सामाजिक नकाशा, २०११ जनगणना, ग्रामपंचायत निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांची पाहणी, शिवारफेरी,पेयजल, स्वच्छता आदीची माहिती घेऊन चर्चेद्वारे आराखडा तयार करण्यात येतो.