शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आता चर्चेचाही ‘दुष्काळ’!

By admin | Updated: December 10, 2014 02:55 IST

अधिवेशनाच्या दुस:या दिवशीही विधानसभेत दुष्काळावर चर्चा होऊ शकली नाही. सुरुवातीला विरोधकांनी कामकाज थांबवून आताच चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरीत गोंधळ घातला

हिवाळी अधिवेशन : विरोधकांचा वेलमध्ये ठिय्या, कामकाज रोखले  
 नागपूर : अधिवेशनाच्या दुस:या दिवशीही विधानसभेत दुष्काळावर चर्चा होऊ शकली नाही. सुरुवातीला विरोधकांनी कामकाज थांबवून आताच चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरीत गोंधळ घातला आणि वेलमध्ये बसून ठिय्या मांडला. तर सत्ताधारी विषयपत्रिकेत दाखविलेल्या वेळेवरच चर्चा होईल, या भूमिकेवर अडून राहिले. विरोधकांच्या गदारोळामुळे सुरुवातीला तीनदा सभागृह तहकूब करण्यात आले. शेवटी अध्यक्षांनी चर्चा पुकारली असता विरोधकांनी ‘चर्चा नको, पॅकेज जाहीर करा,’ अशी घोषणाबाजी सुरू केली. परिणामी अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले. तर याच मुद्दय़ावरून विधान परिषदेचेही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
   विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कामकाज बाजूला सारून दुष्काळावर चर्चा घेण्याची मागणी केली. सोयाबीन हातून गेले, कापसाला भाव नाही, शेतकरी संकटात आहे, असे सांगून शेतक:यांच्या मदतीसाठी तातडीने पॅकेज जाहीर  करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरे पुकारली. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येत दुष्काळावर चर्चा घेण्याची मागणी करीत नारेबाजी सुरू केली.यामुळे अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज सरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारची चर्चेची तयारी असल्याचे सांगत विषय पत्रिकेत चर्चा दाखविली असल्याचे सांगितले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही विरोधकांनी शेतक:यांच्या प्रश्नावर राजकारण करू नये, असा नेम साधला. यामुळे विरोधक आणखीनच भडकले व वेलमध्ये येऊन नारेबाजी करू लागले. 
 विरोधकांकडून दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर आदींनी मोर्चा सांभाळला. चर्चेशिवाय आधी पॅकेज जाहीर करा व नंतर चर्चा घ्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली. अध्यक्षांनी प्रस्ताव नाकारल्याचे स्पष्ट करताच विरोधक नारेबाजी करीत वेलमध्ये येऊन खाली बसले. भुजबळ यांनी सत्ताधा:यांना त्यांच्या विरोधी पक्षातील कार्यकाळाची आठवण करून दिली. विरोधी पक्षात असताना खडसे तासन्तास बोलायचे आता तुम्ही ऐकून घेण्याची सहिष्णुता दाखवा, असा टोला भुजबळांनी खडसेंना लगावला. त्यावर खडसे यांनी विषय पत्रिकेत चर्चा दाखविलेली असून निश्चित वेळेवरच चर्चा होईल, असे स्पष्ट केले. यामुळे विरोधक आणखीनच संतापले व सभागृहात एकच गदारोळ केला. परिणामी अध्यक्षांनी सलग दोनदा कामकाज अध्र्या-अध्र्या तासासाठी तहकूब केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. शेवटी अध्यक्षांनी चर्चा पुकारली. सत्तापक्षातील आ. चैनसुख संचेती यांनी चर्चेची सुरुवात करीत गेल्या 15 वर्षातील नियोजनशून्य कारभारामुळे शेतकरी संकटात असल्याची टीका विरोधकांवर केली. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा ‘भाषण नको, पॅकेज हवे, अशा घोषणा देत गोंधळ घातला. शेवटी अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.  (विशेष प्रतिनिधी)
 
 
विरोधी पक्षनेतेपदासाठी आर. आर. पाटील 
1विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. विधानसभेत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या, तर परिषदेत धनंजय मुंडे यांच्या नावाची शिफारस अध्यक्ष व सभापती यांच्याकडे केल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. 
2विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 सदस्य आहेत; सोबतच 4 अपक्ष आमदारांनी पाठिंब्याचे पत्र दिल्याने पक्षाच्या सदस्यांची संख्या काँग्रेसपेक्षा अधिक आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य आहेत. 
3त्यामुळे दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केल्याची माहिती त्यांनी दिली. विधान परिषदेसंदर्भात वाद नाही. विधानसभेतील विरोधी पक्षतेत्यासंदर्भात अध्यक्ष हरिभाऊ  बागडे जो निर्णय घेतील तो मान्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
दुष्काळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी
रावते यांनी सभागृहाबाहेर केली पॅकेजची घोषणा !
च्राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटींचे पॅकेज देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सभागृहात न करता पत्रकारांशी बोलताना केली.
च्अधिवेशन चालू असताना मंत्र्यांनी सभागृहाबाहेर घोषणा करू नये, असे संकेत असतानाही रावतेंनी सभागृहाबाहेर घोषणा केल्याने उद्या विरोधकांना आणखी एक विषय मिळाला आहे. 
च्वास्तविक ही घोषणा मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्र्यांनी सभागृहात करणो अपेक्षित असताना, रावतेंनी केलेल्या घोषणोने नव्या वादाला विषय मिळाला आहे.
 
विरोधकांचा तीळपापड झालाय -खडसे
विधान भवनावर काढलेला मोर्चा फसल्यामुळे काँग्रेसचा सभागृहात खटाटोप सुरू आहे. विरोधक शेतक:यांच्या प्रश्नाचे राजकारण करू पाहात आहेत. सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव आणल्यामुळे विरोधकांचा तीळपापड झाला आहे, अशी टीका महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली. आमची एक नव्हे तर दोन दिवस चर्चेची तयारी आहे, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले. 
 
लोकसभेत सभात्याग : महाराष्ट्रातील दुष्काळ व शेतक:यांच्या आत्महत्यांबाबत राज्यातील खासदार नऊ दिवसांपासून लोकसभेत सतत प्रश्न विचारत असताना, सरकार कमालीचे संवेदनशून्य झाल्याचा आरोप करणा:या सदस्यांच्या संयमाचा बांध मंगळवारी फुटला आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे राज्यातील स्थितीवर उत्तर सुरू असताना सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.