शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अमरावती विभागातील दुष्काळी गावांना सवलत

By admin | Updated: May 2, 2016 00:16 IST

दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील गावांसाठी दोन अतिरिक्त सवलती लागू करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील

- संतोष येलकर,  अकोला

दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील गावांसाठी दोन अतिरिक्त सवलती लागू करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त ७ हजार २३० गावांना दोन अतिरिक्त सवलतींचा लाभ मिळणार आहे.गतवर्षीच्या पावसाळ््यात अत्यल्प पाऊस झाल्याने, विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर २०१५-१६ च्या खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये शासनामार्फत दुष्काळी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त ११ हजार ८६२ गावांना जमीन महसुलात सूट, कृषी पंपांच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्फ माफ, आवश्यक तेथे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविणे आणि शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा उपाययोजना लागू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २२ एप्रिलच्या निर्णयानुसार खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या ११ हजार ८६२ गावांना अतिरिक्त दोन सवलती लागू करण्यात आल्या. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांतील गावांना अतिरिक्त दोन सवलतींचा लाभ मिळणार आहे.