शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

जेजुरी बाजारतळावर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: May 21, 2016 01:16 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बाजारतळावर घाणीचेच साम्राज्य पसरलेले आहे.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीच्या बाजारतळावर घाणीचेच साम्राज्य पसरलेले आहे. तेथे व्यापारी व बाजारकरूंसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बाजारतळात आधुनिक सोयीसुविधांची अपेक्षा आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने कुलदैवत खंडोबाचा रविवार हा वार असल्याने दर रविवारी देवदर्शनासाठी राज्यभरातूनच नव्हे तर जेजुरी परिसरातील खेड्यातून भाविक येत असतात. त्या पार्श्वभूमीवर या अनास्थेवर टकालेला प्रकाश.रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस होता. दर रविवारी येथे आठवडे बाजार भरत होता. आता मात्र जेजुरीत रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ लागल्याने गेल्या वर्षीपासून जेजुरी नगरपालिकेने रविवारऐवजी गुरुवारचा आठवडे बाजार केला आहे. शहरातील मध्यवस्तीतील सुमारे एक एकर क्षेत्रावर हा बाजार भरतो. आज ती जागाही कमी पडू लागली आहे. बाजूलाच जिल्हा परिषदेची सुमारे दोन एकर मोकळी जागा आहे. त्या जागेत ही बाजार भरू लागला आहे. बाजाराला जागा कमी पडत असल्याने पालिकेने जिल्हा परिषदेच्या या जागेवरच नवीन विकास आराखड्यात आरक्षण टाकून आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)>वर्षाला १६ लाख रुपयांचे उत्पन्नपालिकेने बाजारतळाची जागा मोठी करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला असला तरीही येथे बाजारकरूंना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे मात्र दुर्लक्षच केलेले आहे. या बाजारतळातून पालिकेला बाजारकरापोटी वर्षाला सुमारे १६ लाख रुपयांचे मोठे उत्पन्न मिळते. मात्र त्या बदल्यात सुविधा दिल्या जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परिसरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी पालिकेने बांधलेल्या ओट्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.पावासाळळ्यामध्ये बाजार करताना शेडची सुविधा उपलब्ध नाही.४तुटक्या ओट्यावरच माल मांडून विकावा लागतो. बाजारात येणाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही की स्वछतागृहही नाही. जे आहे त्याची ही मोठी दुरवस्था असल्याने त्याचा वापरही कोणी करत नाही. बाजारात प्रवेश करण्यासाठी अरुंद रस्ते असल्याने बाजाराची वाहने तळाकडे नेणे मोठे जिकिरीचे झालेले आहे. मोकळे पटांगण असूनही लगत घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. येथे मोठे व विस्तीर्ण पटांगण असूनही योग्य नियोजन आणि सुविधा नसल्याने बाजारकरूंचे मोठे हाल होत आहेत. याकडे पालिकेने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाजारातील व्यापारी व ग्राहकांचे म्हणणे आहे. आमच्याकडून बाजारकर वसूल केला जातो. त्याच्या बदल्यात आम्हाला सुविधा मात्र मिळत नसल्याच्याच तक्रारी नागरिकांनी आहेत.