शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

सुपुत्रांची वेगळी वाट रणजितबाबू पेचात

By admin | Updated: May 31, 2014 01:03 IST

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सुपुत्रांनी वेगवेगळे राजकीय मार्ग धरल्यामुळे रणजितबाबूंसमोर पेच निर्माण झाला आहे. पित्याला सर्व मुले सारखीच असतात. कुण्या एकाची बाजू

एक काँग्रेसी तर दुसरे भाजपवासी : कोणता झेंडा घेऊ हाती ?कमलेश वानखेडे - नागपूरकाँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सुपुत्रांनी वेगवेगळे राजकीय मार्ग  धरल्यामुळे रणजितबाबूंसमोर पेच निर्माण झाला आहे. पित्याला सर्व मुले सारखीच असतात.  कुण्या एकाची बाजू उचलून धरण्यात अडचण होते. अशाच परिस्थितीला सध्या रणजितबाबूंना  सामोरे जावे लागत आहे. त्यांचे मोठे सुपुत्र आशीष यांनी पाच वर्षांंंपूर्वीच भाजपचा भगवा खांद्यावर  घेतला आहे तर लहान सुपुत्र डॉ. अमोल हे रणजितबाबूंच्या निष्ठावानांसोबत काँग्रेसला बळ  देण्याच्या कामी लागले आहेत. यामुळे रणजितबाबू यांचे सर्मथकही ‘कनफ्युज’ झाले आहेत.   ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ असा प्रश्न त्यांना पडला आहे.     आशीष हे पुन्हा एकदा भाजपच्या तिकिटावर सावनेर किंवा पश्‍चिम नागपुरातून लढतील,  अशी शक्यता आहे. तर डॉ. अमोल हे काँग्रेसकडून रामटेकचा गड सर करण्याच्या तयारीत  आहेत. सावनेर व रामटेक या दोन्ही मतदारसंघाची सीमा एकमेकांना लागून आहे. आपली दोन  मुले, दोन वेगवेगळ्या पक्षाकडून आजूबाजूच्या मतदारसंघात रिंगणात उतरली, तर सावनेरात  आशीष यांच्या मंचावर जायचे की रामटेकात अमोल यांच्यासाठी फिरायचे, असा यक्षप्रश्न  रणजितबाबू यांच्यासमोर उभा राहणार आहे.  आशीष देशमुख यांनी गेल्यावेळी सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर  निवडणूक लढविली होती. रणजितबाबू एकीकडे काँग्रेसींसाठी ‘दिलजोडो’ अभियान राबवितात  आणि दुसरीकडे त्यांचे पुत्र आशीष हे भाजपच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरतात ही दुटप्पी  भूमिका त्यावेळी मतदारांना पटली नाही. त्यामुळे आ. सुनील केदार यांच्या विरोधात स्थानिक  पातळीवर रोष असतानाही केदार यांनी देशमुखांना पछाडले होते.  सावनेरातील  पराभवानंतर  आशीष यांनी पुढील दोन-अडीच वर्षे मतदारांशी संपर्कच तोडला होता.  नंतर मात्र अडीच वर्षांंंंनी  ते पुन्हा एकाएकी सक्रिय झाले. दुरावलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ करू लागले. यावेळी  त्यांच्या हाती विदर्भाचा झेंडा होता. नागपूर अधिवेशन काळात देशमुखांनी विदर्भासाठी उपोषण  केले. ते उपोषण राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी लिंबूपाणी पाजून सोडविले आणि आशीष यांना  राजकीय बळ मिळाले. पुढील काळात त्यांनी विदर्भाचे आंदोलन अधिक तीव्र केले. आशीष हे  सध्या भाजपच्या प्रत्येक मोठय़ा कार्यक्रमात दिसतात. सावनेर विधानसभेत पुन्हा एकदा  भाजपकडून त्यांची उमेदवारी पक्की असल्याचा दावा त्यांचे सर्मथक करीत आहेत तर काहीजण  ऐनवेळी पश्‍चिममध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असाही दावा करीत आहेत. आशिष हे भाजपच्या जेवढय़ा जवळ गेले तेवढे रणजितबाबूंच्या राजकीय पाठबळापासून दुरावत  गेल्याचे दिसते. सध्या आशिष यांचे छोटे बंधू डॉ. अमोल देशमुख हे रणजितबाबूंच्या सहवासात  दिसतात. रणजितबाबूंनी आपल्या जुन्या व निष्ठावान लोकांशी डॉ. अमोल यांच्या भेटीगाठी करून  देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत आशिष हे भाजप- शिवसेनेसाठी तर डॉ.  अमोल हे काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक यांच्यासाठी सक्रिय असल्याचे पहायला मिळाले.  रणजितबाबू यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम दरवर्षी नागपुरात व्हायचा. फार फार तर एखादवेळा  त्यांच्या गावाकडे झाला असेल. यावेळी मात्र चक्क रामटेकमध्ये वाढदिवस साजरा झाला. डॉ.  अमोल यांनी वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या जाहिराती प्रसिद्ध करीत या सोहळ्याला  नागरिकांनी येण्याचे आवाहनही केले. माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनीही कार्यक्रमाला  उपस्थिती लावली. हा सर्व घटनाक्रम पाहता डॉ. अमोल यांना रामटेकमध्ये काँग्रेसच्या  उमेदवारीसाठी प्रोजेक्ट केले जात आहे. यासाठी रणजितबाबूंचेही त्यांना भक्कम पाठबळ आहे.  त्यामुळे येत्या काळात रणजितबाबूंसमोर धर्मसंकट उभे राहील. त्यावेळी धृतराष्ट्राची नरोवा  कुंजरोवा भूमिका वठवायची की श्रीकृष्णासारखे दोघांनाही खूष ठेवायचे हे रणजितबाबूंनाच  ठरवावे लागेल.