शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

दारूमुक्त महामार्गाविरोधात ‘आहार’

By admin | Updated: April 4, 2017 06:09 IST

मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिलपासून बंदीचा आसूड उगारला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिलपासून बंदीचा आसूड उगारला आहे. त्यामुळे राज्य सरकारला सर्वाधिक महसूल देणारा हॉटेल उद्योग कोलमडू लागला आहे. परिणामी, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तोडगा काढण्याची मागणी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे (आहार) अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.शेट्टी म्हणाले की, सर्व नियमांचे पालन करून आवश्यक परवानगी असतानाही, सर्वोच्च न्यायालयाच्या अचानक आलेल्या एका निर्णयामुळे हॉटेल उद्योग डबघाईला आला आहे. न्यायालयाच्या बंदीविरोधात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांनी तातडीने राष्ट्रीय आणि राज महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याचा तोडगा काढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देऊन हा प्रश्न निकाली काढावा. रेस्टॉरंट आणि बार उभारताना मालकांनी कर्जे घेतली आहेत. त्यामुळे तत्काळ तोडगा न काढल्यास, शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागेल, असे सदस्यांचे म्हणणे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकबंदीसंदर्भात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) मंगळवारी, ४ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या वेळी बंदीमुळे रोजगारावर होणारे परिणाम आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्यातील १३ हजार ६५५ बार आणि मद्यविक्री करणारी दुकाने बंद झाली आहेत. त्यात मुंबईतील ५०० बार आणि दुकानांचा समावेश आहे.बार बंद करून केवळ रेस्टॉरंट सुरू ठेवले, तरी राज्यातील ९ हजार ९२५, तर मुंबई महानगर क्षेत्रातील २ हजार बार व रेस्टॉरंट बंद होण्याची भीती आहे.यामुळे राज्याचा सुमारे ७ हजार कोटींची महसूल बुडणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या रोजगारावर न्यायालयाच्या या बंदीमुळे गदा येणार आहे.