शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

दारूमुक्त महामार्गाविरोधात ‘आहार’

By admin | Updated: April 4, 2017 06:09 IST

मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिलपासून बंदीचा आसूड उगारला आहे.

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिलपासून बंदीचा आसूड उगारला आहे. त्यामुळे राज्य सरकारला सर्वाधिक महसूल देणारा हॉटेल उद्योग कोलमडू लागला आहे. परिणामी, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करून मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात तोडगा काढण्याची मागणी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे (आहार) अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.शेट्टी म्हणाले की, सर्व नियमांचे पालन करून आवश्यक परवानगी असतानाही, सर्वोच्च न्यायालयाच्या अचानक आलेल्या एका निर्णयामुळे हॉटेल उद्योग डबघाईला आला आहे. न्यायालयाच्या बंदीविरोधात राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यांनी तातडीने राष्ट्रीय आणि राज महामार्ग स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याचा तोडगा काढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देऊन हा प्रश्न निकाली काढावा. रेस्टॉरंट आणि बार उभारताना मालकांनी कर्जे घेतली आहेत. त्यामुळे तत्काळ तोडगा न काढल्यास, शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जबाजारी होऊन आत्महत्या करावी लागेल, असे सदस्यांचे म्हणणे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकबंदीसंदर्भात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) मंगळवारी, ४ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या वेळी बंदीमुळे रोजगारावर होणारे परिणाम आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राज्यातील १३ हजार ६५५ बार आणि मद्यविक्री करणारी दुकाने बंद झाली आहेत. त्यात मुंबईतील ५०० बार आणि दुकानांचा समावेश आहे.बार बंद करून केवळ रेस्टॉरंट सुरू ठेवले, तरी राज्यातील ९ हजार ९२५, तर मुंबई महानगर क्षेत्रातील २ हजार बार व रेस्टॉरंट बंद होण्याची भीती आहे.यामुळे राज्याचा सुमारे ७ हजार कोटींची महसूल बुडणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या रोजगारावर न्यायालयाच्या या बंदीमुळे गदा येणार आहे.