शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

धुळे - ४०० गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण?

By admin | Updated: August 22, 2016 19:46 IST

शहरातील मनपा मालकीच्या ३९ व्यापारी संकुलातील एकूण ८८५ गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण झाल्याची शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २२  : शहरातील मनपा मालकीच्या ३९ व्यापारी संकुलातील एकूण ८८५ गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण झाल्याची शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे़ तर दुसरीकडे गाळ्यांचे भाडे, हस्तांतरण फीकडेही दुर्लक्ष झाल्याने मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, एवढेच नव्हे तर बाजार शुल्क वसुलीदेखील गेल्या वर्षभरापासून रखडली आहे़. 

विनापरवानगी हस्तांतरणमनपाने १३ जानेवारी २०१६ ला झालेल्या महासभेत गाळे हस्तांतरण फीमध्ये पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तसा ठरावही करण्यात आला़ मात्र मनपाच्या एकूण गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण होऊनही मनपाकडे हस्तांतरणासाठी एकही प्रस्ताव आलेला नाही़ प्रस्तावच आलेले नसल्याने उत्पन्नही मिळालेले नाही़ त्यामुळे मनपाच्या गाळ्यांचे सर्रास हस्तांतरण केले जात असूनही मनपा प्रशासन अंधारात आहे़ शिवाय कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणीदेखील सोडले जात आहे़.

पाचपट होते आकारणीमनपाने महासभेच्या ठरावानुसार रेडिरेकनर दरानुसार गाळ्यांची भाडे आकारणी सुरू केली आहे़ नवीन दरानुसार गाळेधारकांना भाडे आकारणी करून बिले वितरित करण्यात आली आहेत़ पूर्वी ९०० ते ७२०० पर्यंत असलेले दुकान भाडे रेडिरेकनर दरामुळे थेट २० हजार ७० हजारांवर पोहचले आहे़ एवढे भाडे असताना मनपा प्रशासन गाळा हस्तांतरासाठी दुकानाच्या वार्षिक भाड्याच्या पाचपट रक्कम आकारणी करत असल्याने कुणीही मनपाकडे हस्तांतरणाची परवानगी घेण्यासाठी धजावत नाही़ काही गाळेधारकांनी हस्तांतरणासाठी परवानगी घेण्याचा प्रयत्नही केला; मात्र मनपाची हस्तांतरण फी आकारणी पाहून त्यांनीही माघार घेतली आहे़.

करार संपले, दुप्पट आकारणी!मनपाने करारावर दिलेल्या गाळ्यांपैकी ज्या गाळ्यांची मुदत संपली आहे, त्यांना दुप्पट कर आकारणी केली जाते़ पाचकंदील मार्केट परिसरातील बहुतांश गाळ्यांचे करार संपले असल्याने त्यांना वार्षिक दुकान भाडेदेखील दुप्पट आकारले जाते़ जवळपास १०४ गाळेधारकांना दुप्पट आकारणी केली जाते़ पाचकंदील मार्केटमधील बहुतांश गाळे मूळ मालकांनी हस्तांतरित केले आहेत़ तर अनेक मूळ मालक मृत होऊन बरेच वर्ष उलटल्यानंतरही मनपाकडून मूळ मालकांच्याच नावे आकारणी केली जाते़

अशीही एक समस्या!मनपाकडून ज्या मूळ मालकांनी गाळे घेतले, त्यांनी परस्पर त्या गाळ्यांचे हस्तांतरण केले. मात्र मनपा वसुली विभागाने मालमत्ता करवसुली करताना ज्याने हस्तांतरणातून दुकान घेतले, त्याच्या नावानेच वसुली केली आहे. त्यामुळे चक्क मूळ मालकांचेच नाव बदलले असल्याचीही दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे़ प्रचंड घोळ असलेल्या या विषयात लक्ष घातल्यास मनपाला दरवर्षी पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते़

कारवाईचे ‘राजकारण’पाचकंदील मार्केटप्रश्नी मनपा प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्या विषयाचे राजकारण करण्यात आले़ या ठिकाणी प्रत्येक विषयात राजकारण केले जात असल्याने काही विषय न काढलेलेच बरे, अशी भूमिका अखेर आयुक्त घेताना दिसतात़ मात्र हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे़ शिवाय मनपाचे नुकसान होत असल्याने त्याचा सर्वसामान्य जनतेलाही अप्रत्यक्षपणे फटका बसत आहे़ त्यामुळे मनपाने सर्वांना विश्वासात घेऊन हे विषय हाताळणे आवश्यक असून ठोस कारवाई गरजेची आहे़