शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

लोकशाहीच्या चार स्तंभाच्या कार्यातूनच समाजाचा विकास

By admin | Updated: December 20, 2015 01:56 IST

लोकशाहीत राजकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रत्येकाजवळ स्वत:ची अशी एक सत्ता आहे.

नागपूर : लोकशाहीत राजकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रत्येकाजवळ स्वत:ची अशी एक सत्ता आहे. त्यामुळेच प्रत्येक स्तंभाच्या सत्तेने आपले कार्य समाजाच्या कल्याणासाठीच केले पाहिजे. लोकशाहीचे हे चारही स्तंभ मजबूत असतील तर समाजाचा विकास गतीने साधता येणे शक्य आहे. यात प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे; कारण प्रसारमाध्यमांचा प्रभाव इतर तीन स्तंभांवर पडतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश वैदिक, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र उपस्थित होते. कार्यक्रमात ‘आजची पत्रकारिता आणि शासन’ विषयावर वेदप्रकाश वैदिक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमतने राज्याच्या कानाकोपऱ्यात एक लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून पोहोचण्याचा प्रयत्न केला. केवळ वृत्तपत्र म्हणून न राहता लोकमतने एका सामाजिक चळवळीचे स्वरूप घेतले आणि समाजातील तळागाळातल्या माणसांच्या वेदना मांडण्याचे काम केले. त्यामुळेच हे वृत्तपत्र लोकप्रिय होऊ शकले आणि लोकांचा विश्वास जिंकू शकले. या पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे लेखन उल्लेखनीय आहे. समाजातील अखेरच्या माणसाच्या प्रश्नांकडे, वेदनेकडे लक्ष वेधण्याचे काम या विजेत्यांनी केले आहे. विरोधी पक्षाला विधानभवनात आपले म्हणणे मांडण्यासाठी वृत्तपत्र हाच महत्त्वाचा स्रोत असतो. त्यामुळेच पत्रकारिता निर्भीड आणि सत्यावर आधारित असली पाहिजे. आपण जे लिहितो आहोत त्याने समाजाचे काय भले होणार? याचा विचार पत्रकारांनी केला पाहिजे. पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी यांनी समाजाभिमुख पत्रकारिता केली. त्यांनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नावाने असलेल्या या पुरस्कारासह त्यांच्या आदर्शाचीही प्रेरणा पत्रकारांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन लोकमत मुंबईचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी तर आभार लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले यांनी मानले. (प्रतिनिधी)लोकमत हे केवळ वृत्तपत्र नाही तर उज्ज्वल परंपरा- सुरेश द्वादशीवारलोकमत हे केवळ वृत्तपत्र नाही तर एक उज्ज्वल परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी या वृत्तपत्राला लोकमत हे नाव दिले. लोकनायक बापूजी अणे यांनी लोकमत हे साप्ताहिक चालविले आणि त्यानंतर श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी ते अर्धसाप्ताहिक आणि दैनिक केले. यामागे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची, प्रबोधनाची आणि सामाजिक दायित्वाची परंपरा आहे. त्यामागे एक इतिहास आहे. या परंपरेच्यावतीने विजेत्या पत्रकारांचा सत्कार होत आहे, ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे मत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र फाऊंडेशनच्यावतीने ललित आणि वैचारिक साहित्यातील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार सुरेश द्वादशीवार यांना जाहीर झाला. यानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.