शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

कृषी विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार

By admin | Updated: October 18, 2015 02:21 IST

गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन

नागपूर : गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करून ते राज्य सरकारला सादर केले जाईल. राज्य सरकारने या डॉक्युमेंटचा आधार घेऊन काही योजना अमलात आणल्या तर शेतकऱ्यांना मदत होईल, असा विश्वास केंदीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अ‍ॅग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, रणजित देशमुख, खा. कृपाल तुमाने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश बंग, आ. सुनील केदार, अ‍ॅग्रोव्हिजनचे सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर यांच्यासह आमदार व मान्यवर उपस्थित होते.गडकरी म्हणाले, कृषी क्षेत्रात बदल घडवायचा असेल तर पुढील २५ वर्षांचा विचार केला पाहिजे. शेतीत, जोडधंद्यात यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांसमोर मांडल्या पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे आरोग्य तपासयला हवे. यासाठी आमदारांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. डाळींचे भाव २०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळींच्या उत्पदनाकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे. यावर पाच हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. मागेल त्याला काम दिले जाईल. पण कामात बेईमानी केली तर जेलमध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विदेशात बायो प्लास्टिकची मोठी मागणी आहे. उसाचे चिपाड,मका आदी पिकांपासून बायो प्लास्टिक तयार केले जाते. शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला तर एकट्या विदर्भात ५० हजार कोटींचे बायो प्लास्टिक तयार होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. येत्या काळात शेतकऱ्यांचे मोठे गट तयार करून त्यांना फूलशेतीचे प्रशिक्षण दिले जाईल. येथीलफुले विदेशात पाठविली जातील. यासाठी लवकरच नागपूर बाजार समितीला जागा उपलब्ध करूनदिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ताडोबात इलेक्ट्रिक बॅटरीवरील गाड्याताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, प्रदूषण व आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून एका दिवशी मर्यादित गाड्या जंगलात सोडल्या जातात. यामुळे विदेशी पर्यटकांनाही जंगल सफारीची बुकिंग मिळणे कठीण झाले आहे. येत्या काळात ताडोब्यात इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे ध्वनी व वायु प्रदूषणाचा प्रश्न सुटेल व पर्यायाने जंगलात सोडणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.