शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कृषी विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार

By admin | Updated: October 18, 2015 02:21 IST

गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन

नागपूर : गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करून ते राज्य सरकारला सादर केले जाईल. राज्य सरकारने या डॉक्युमेंटचा आधार घेऊन काही योजना अमलात आणल्या तर शेतकऱ्यांना मदत होईल, असा विश्वास केंदीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. या वेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अ‍ॅग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, रणजित देशमुख, खा. कृपाल तुमाने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश बंग, आ. सुनील केदार, अ‍ॅग्रोव्हिजनचे सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर यांच्यासह आमदार व मान्यवर उपस्थित होते.गडकरी म्हणाले, कृषी क्षेत्रात बदल घडवायचा असेल तर पुढील २५ वर्षांचा विचार केला पाहिजे. शेतीत, जोडधंद्यात यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांसमोर मांडल्या पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे आरोग्य तपासयला हवे. यासाठी आमदारांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सॉईल हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. डाळींचे भाव २०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळींच्या उत्पदनाकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे. यावर पाच हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. मागेल त्याला काम दिले जाईल. पण कामात बेईमानी केली तर जेलमध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. विदेशात बायो प्लास्टिकची मोठी मागणी आहे. उसाचे चिपाड,मका आदी पिकांपासून बायो प्लास्टिक तयार केले जाते. शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला तर एकट्या विदर्भात ५० हजार कोटींचे बायो प्लास्टिक तयार होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. येत्या काळात शेतकऱ्यांचे मोठे गट तयार करून त्यांना फूलशेतीचे प्रशिक्षण दिले जाईल. येथीलफुले विदेशात पाठविली जातील. यासाठी लवकरच नागपूर बाजार समितीला जागा उपलब्ध करूनदिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ताडोबात इलेक्ट्रिक बॅटरीवरील गाड्याताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. मात्र, प्रदूषण व आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून एका दिवशी मर्यादित गाड्या जंगलात सोडल्या जातात. यामुळे विदेशी पर्यटकांनाही जंगल सफारीची बुकिंग मिळणे कठीण झाले आहे. येत्या काळात ताडोब्यात इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे ध्वनी व वायु प्रदूषणाचा प्रश्न सुटेल व पर्यायाने जंगलात सोडणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.