शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या डेट्रॉईटला कचऱ्याचे ग्रहण

By admin | Updated: January 20, 2017 00:46 IST

औद्योगिक वसाहतीचा झालेला विकास, वाढते नागरीकरण यामुळे चाकणचा झपाट्याने विकास होत आहे.

चाकण : औद्योगिक वसाहतीचा झालेला विकास, वाढते नागरीकरण यामुळे चाकणचा झपाट्याने विकास होत आहे. भारताचे ‘डेट्रॉईट’ समजल्या जाणाऱ्या चाकणकरांना मात्र अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उद्योगनगरीत प्रवेश करताच कचऱ्याच्या ढिगांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नगर परिषदेचे कचरा व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन नसल्याने ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत. शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यामुळे चाकणकर नागरिक त्रस्त आहेत. चाकण शहर प्लॅस्टिक्मुक्त केव्हा होणार? असा सवाल नागरिकांमधून होत आहे. प्लॅस्टिक पिशव्यांवर त्वरित बंदी आणून कापडी पिशव्या वापरण्याची सक्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. कचऱ्याच्या ढिगात मोठ्या प्रमाणावर हॉटेलमधील शिळे अन्न, भाज्या, प्लॅस्टिक, केशकर्तनालायातील कापलेले केस, मोकळ्या बाटल्या, हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचारांनंतरच्या टाकाऊ वस्तू, खराब झालेल्या फळभाज्या व पालेभाज्या आदींचा समावेश असतो. या ठिकाणांहून जाताना नागरिक अक्षरश: नाकाला रुमाल लावून जातात. या कचऱ्यातून दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या ढिगातील प्लॅस्टिकच्या पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रत्येक वॉर्डातील कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेने विभागवार कचराकुंड्या ठेवून, कर्मचारी नेमून व घंटागाड्या सुरू करूनही नागरिकांना कचराकुंड्यांमध्ये अथवा घंटागाडीतच नेऊन टाकण्याची सवय लागलेली नाही. त्यातच अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या गायब असल्याने रस्तोरस्ती, गल्लीबोळांत, रस्त्याच्या कोपऱ्यावर पडलेल्या कचऱ्याचे विदारक चित्र चाकण भागात सर्रास पाहायला मिळते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.चाकणमधील काही भागात रोज हमखास उघड्यावर कचरा टाकला जातो. भाजी बाजारात तर दर शनिवारी, रविवारी, बुधवारी व गुरुवारी मोठा बाजार भरण्याच्या दिवशी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दृश्य बारमाही आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पी. के. फाउंडेशन, गणेश मंडळे, लायन्स व रोटरी क्लब यासारख्या काही स्वयंसेवी संस्था-संघटना वषार्तून एकदा स्वच्छता मोहीम राबवितात. सगळीकडील कचरा गायब होतो. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये अस्ताव्यस्त कचऱ्याची पुन्हा तीच स्थिती पाहावयास मिळते. या ठिकाणी कचऱ्याचे पडलेले ढीग प्रशासनाबरोबरच संबंधित नागरिकांच्या बेपर्वाईची साक्ष देत आहेत. यातील ओल्या कचऱ्यामुळे परिसरात डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढला. नगर परिषदेने यासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याची भूमिका परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.>सर्वच प्रभागांत कचरा व सांडपाण्याची समस्या चाकण परिसरातील सर्वच प्रभागांत स्वयंघोषित कचराकुंड्या निर्माण झाल्या आहेत. या गावातील गावांमध्ये असलेल्या घंटागाड्या म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ झाल्या आहेत. या गाड्यांचा येण्याचा नेम नसल्याने महिलांना कचरा कुठे टाकावा, असा प्रश्न पडतो. नाइलाजाने त्यांना तो परिसरातीलच मोकळ्या जागेत नेऊन टाकावा लागतो. सांडपाण्याचीही अशीच अवस्था आहे. अनेक ठिकाणी गटारांची कामे झाली नाहीत. काही ठिकाणी त्यांची दुरवस्था झाल्याने हे पाणी रस्त्यावरूनच वाहते.