शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

मृत्यूपूर्वी जमीन मिळावी एवढीच इच्छा

By admin | Updated: August 25, 2016 02:31 IST

शासनाने जमीन ताब्यात घेतली, परंतु अद्याप मोबदलाच दिलेला नाही.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शासनाने जमीन ताब्यात घेतली, परंतु अद्याप मोबदलाच दिलेला नाही. ६४ गुंठे जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी तीस वर्षे भूसंपादन व सिडको कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या, परंतु अद्याप न्याय दिलेला नाही. वडिलांचे निधन झाले, आता माझा मृत्यू होण्यापूर्वी तरी हक्काची जमीन मिळावी, असे मत ऐरोलीतील ७१ वर्षांचे प्रकल्पग्रस्त शालिग्राम गणपत कोटकर यांनी व्यक्त केले आहे. शासनाने नवी मुंबई वसविण्यासाठी ठाणे, पनवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांतील शेतकऱ्यांची सर्व जमीन संपादित केली. जमीन घेवून ४५ वर्षे झाल्यानंतरही अद्याप सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला दिलेला नाही. संघर्ष केल्याशिवाय कोणताच प्रश्न सुटलेला नाही. वाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण ताजे असताना त्याच धर्तीवर अजूनही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय मोबदल्यापासून वंचित ठेवल्याचे समोर येवू लागले आहे. यामध्येच ऐरोलीमधील शालिग्राम गणपत कोटकर व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. शासनाने ऐरोली रेल्वे स्टेशनला लागून असलेली त्यांची ३ एकर १८ गुंठे जमीन ताब्यात घेतलेली आहे. परंतु विशेष भूसंपादन अधिकारी मेट्रो सेंटर क्रमांक ३ ने कोटकर कुटुंबीयांना फक्त १ एकर ३३ गुंठे जमिनीचाच मोबदला दिलेला आहे. उर्वरित १ एकर २४ गुंठे जमिनीचा मोबदला दिलेलाच नाही. हा प्रकार जवळपास ३० वर्षांपूर्वी कोटकर यांच्या निदर्शनास आला. त्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर शासनातर्फे सिडको असा शिक्का मारण्यात आला आहे. त्यांनी ठाणे भूसंपादन कार्यालयात जावून विचारणा केली असता तुमची १ एकर २४ गुंठे जमीन आम्ही संपादित केलेली नाही. त्याविषयी कोणतेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले. तुमची जमीन सिडकोकडून ताब्यात घ्या असे सांगितले. सिडकोला याविषयी विचारणा केली असता शासनाने तुमची नावे वगळली आहेत. यामुळे पुन्हा जमीन ताब्यात घेण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडेच पाठपुरावा करा असे उत्तर देण्यात आले. विशेष भूसंपादन अधिकारी आम्ही जमीन संपादित केली नाही असे सांगतात. परंतु प्रत्यक्षात जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून शेतकऱ्यांची नावे कमी केली आहे. सिडको आमचा संपादनाशी संबंध नसल्याचे कारण देत आहे. कोटकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, तीस वर्षांत सिडको व मेट्रो सेंटरच्या कार्यालयात शेकडो हेलपाटे मारले. अधिकाऱ्यांच्या दालनांच्या बाहेर दिवसभर बसून राहिलो. परंतु कोणीच गांभीर्याने दखल घेत नाही. आमची जमीन संपादन केली असेल तर त्याचा मोबदला द्यावा व जमीन संपादित केली नसेल तर सातबारा उताऱ्यावर आमची नावे पूर्ववत करावी एवढीच मागणी आहे. वडिलांचे १९७६ ला निधन झाले. आता माझे वय ७१ झाले आहे. >भूसंपादन अधिकाऱ्यांची माहिती माहिती अधिकारातून कोटकर कुटुंबीयांनी भूसंपादन कार्यालयाकडून तपशील मागविला. यामध्ये फेरफार क्रमांक ७८६ मध्ये दाखविलेल्या ३ एकर १८ गुंठे जमिनीमधून केस क्रमांक ३१ व निवाडा क्रमांक १५६ प्रमाणे १ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली आहे. उर्वरित १ एकर २४ गुंठे क्षेत्राचा निवाडा तत्कालीन भूसंपादन अधिकारी यांनी केलेला नाही. याविषयी सिडकोचाही अभिप्राय संचिकेत आढळून येत नाही.>आम्हीही आत्महत्या करायची का? ऐरोलीतील कोटकर कुटुंबीय जमिनीच्या मोबदल्यासाठी तब्बल ३० वर्षे सिडको व भूसंपादन कार्यालयात हेलपाटे मारत आहे. या प्रकरणावर कोणीच अंतिम निर्णय घेत नाही. माहिती अधिकाराचा वापर केला तरी वेळेत माहिती दिली जात नाही. आम्ही आमची जमीन शासनाला दिली हा आमचा गुन्हा आहे का? हक्काच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी आम्हीही आत्महत्या किंवा आत्मदहन करायचे का, असा प्रश्न पीडित कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. >शासनाने आमची ३ एकर १८ गुंठे जमीन ताब्यात घेतली आहे. परंतु मोबदला फक्त १ एकर ३३ गुंठे जमिनीचा दिला. उर्वरित १ एकर २४ गुंठे जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी तीस वर्षे पाठपुरावा करत आहे. मृत्यू होण्यापूर्वी हक्काची जमीन मिळावी एवढीच इच्छा आहे. - शालिग्राम कोटकर (७१),पीडित प्रकल्पग्रस्त, ऐरोली