शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

मृत्यूपूर्वी जमीन मिळावी एवढीच इच्छा

By admin | Updated: August 25, 2016 02:31 IST

शासनाने जमीन ताब्यात घेतली, परंतु अद्याप मोबदलाच दिलेला नाही.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शासनाने जमीन ताब्यात घेतली, परंतु अद्याप मोबदलाच दिलेला नाही. ६४ गुंठे जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी तीस वर्षे भूसंपादन व सिडको कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या, परंतु अद्याप न्याय दिलेला नाही. वडिलांचे निधन झाले, आता माझा मृत्यू होण्यापूर्वी तरी हक्काची जमीन मिळावी, असे मत ऐरोलीतील ७१ वर्षांचे प्रकल्पग्रस्त शालिग्राम गणपत कोटकर यांनी व्यक्त केले आहे. शासनाने नवी मुंबई वसविण्यासाठी ठाणे, पनवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांतील शेतकऱ्यांची सर्व जमीन संपादित केली. जमीन घेवून ४५ वर्षे झाल्यानंतरही अद्याप सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला दिलेला नाही. संघर्ष केल्याशिवाय कोणताच प्रश्न सुटलेला नाही. वाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण ताजे असताना त्याच धर्तीवर अजूनही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय मोबदल्यापासून वंचित ठेवल्याचे समोर येवू लागले आहे. यामध्येच ऐरोलीमधील शालिग्राम गणपत कोटकर व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. शासनाने ऐरोली रेल्वे स्टेशनला लागून असलेली त्यांची ३ एकर १८ गुंठे जमीन ताब्यात घेतलेली आहे. परंतु विशेष भूसंपादन अधिकारी मेट्रो सेंटर क्रमांक ३ ने कोटकर कुटुंबीयांना फक्त १ एकर ३३ गुंठे जमिनीचाच मोबदला दिलेला आहे. उर्वरित १ एकर २४ गुंठे जमिनीचा मोबदला दिलेलाच नाही. हा प्रकार जवळपास ३० वर्षांपूर्वी कोटकर यांच्या निदर्शनास आला. त्यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर शासनातर्फे सिडको असा शिक्का मारण्यात आला आहे. त्यांनी ठाणे भूसंपादन कार्यालयात जावून विचारणा केली असता तुमची १ एकर २४ गुंठे जमीन आम्ही संपादित केलेली नाही. त्याविषयी कोणतेही पुरावे आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले. तुमची जमीन सिडकोकडून ताब्यात घ्या असे सांगितले. सिडकोला याविषयी विचारणा केली असता शासनाने तुमची नावे वगळली आहेत. यामुळे पुन्हा जमीन ताब्यात घेण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडेच पाठपुरावा करा असे उत्तर देण्यात आले. विशेष भूसंपादन अधिकारी आम्ही जमीन संपादित केली नाही असे सांगतात. परंतु प्रत्यक्षात जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून शेतकऱ्यांची नावे कमी केली आहे. सिडको आमचा संपादनाशी संबंध नसल्याचे कारण देत आहे. कोटकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, तीस वर्षांत सिडको व मेट्रो सेंटरच्या कार्यालयात शेकडो हेलपाटे मारले. अधिकाऱ्यांच्या दालनांच्या बाहेर दिवसभर बसून राहिलो. परंतु कोणीच गांभीर्याने दखल घेत नाही. आमची जमीन संपादन केली असेल तर त्याचा मोबदला द्यावा व जमीन संपादित केली नसेल तर सातबारा उताऱ्यावर आमची नावे पूर्ववत करावी एवढीच मागणी आहे. वडिलांचे १९७६ ला निधन झाले. आता माझे वय ७१ झाले आहे. >भूसंपादन अधिकाऱ्यांची माहिती माहिती अधिकारातून कोटकर कुटुंबीयांनी भूसंपादन कार्यालयाकडून तपशील मागविला. यामध्ये फेरफार क्रमांक ७८६ मध्ये दाखविलेल्या ३ एकर १८ गुंठे जमिनीमधून केस क्रमांक ३१ व निवाडा क्रमांक १५६ प्रमाणे १ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली आहे. उर्वरित १ एकर २४ गुंठे क्षेत्राचा निवाडा तत्कालीन भूसंपादन अधिकारी यांनी केलेला नाही. याविषयी सिडकोचाही अभिप्राय संचिकेत आढळून येत नाही.>आम्हीही आत्महत्या करायची का? ऐरोलीतील कोटकर कुटुंबीय जमिनीच्या मोबदल्यासाठी तब्बल ३० वर्षे सिडको व भूसंपादन कार्यालयात हेलपाटे मारत आहे. या प्रकरणावर कोणीच अंतिम निर्णय घेत नाही. माहिती अधिकाराचा वापर केला तरी वेळेत माहिती दिली जात नाही. आम्ही आमची जमीन शासनाला दिली हा आमचा गुन्हा आहे का? हक्काच्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी आम्हीही आत्महत्या किंवा आत्मदहन करायचे का, असा प्रश्न पीडित कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. >शासनाने आमची ३ एकर १८ गुंठे जमीन ताब्यात घेतली आहे. परंतु मोबदला फक्त १ एकर ३३ गुंठे जमिनीचा दिला. उर्वरित १ एकर २४ गुंठे जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी तीस वर्षे पाठपुरावा करत आहे. मृत्यू होण्यापूर्वी हक्काची जमीन मिळावी एवढीच इच्छा आहे. - शालिग्राम कोटकर (७१),पीडित प्रकल्पग्रस्त, ऐरोली