शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

शहरवासीयांची भाज्यांसाठी वणवण

By admin | Updated: July 20, 2016 01:40 IST

सुरुवातीला आडत्यांनी बंद पुकारला. नंतर व्यापाऱ्यांनी त्यात मंडई बंद ठेवण्याचा सोमवारी तिसरा दिवस उजाडला.

पिंपरी : सुरुवातीला आडत्यांनी बंद पुकारला. नंतर व्यापाऱ्यांनी त्यात मंडई बंद ठेवण्याचा सोमवारी तिसरा दिवस उजाडला. भाजी, तरकारी ही प्रत्येक कुटुंबाची रोजची गरज आहे. पालेभाज्या मिळाल्या नाहीत, तरी कोथिंबीर, आले आणि मिरची या रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यावश्यक बाबी मिळत नसल्याने गृहिणींची तारांबळ होत आहे. घराजवळ हातगाडीवर भाजी विक्रीस येणाऱ्याकडे कांदे मिळाले, तर मिरची मिळत नाही. मिरची मिळाली, तर कोथिंबिरीचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या परिसरात जाऊन हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्याचा शोध घ्यावा लागतो. ही परिस्थिती शहरात सध्या विविध भागात दिसून येत आहे. राज्य शासनाने शेतमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर व मावळ तालुक्यातील विविध व्यापारी संघटनांनी १७ जुलैपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. शेतमालावरील ६ ते १० टक्के दलाली शेतकऱ्यांकडून न घेण्याचा आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुण्यानंतर पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, कृष्णानगर, तळेगाव, लोणावळा व कामशेत मंडईतील विविध संघटनांनी शासनाचा निषेध नोंदवला. मंडई बेमुदत बंद ठेवून अांदोलन सुरू केले. सलग तीन दिवस मंडई बंद असल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. रविवारी बहुतेकांना सुटी असते. त्या दिवशी आठवडाभर पुरेल इतकी भाजी खरेदी केली जाते. परंतु रविवारीच मंडई बंद होती. आंदोलनाचा पहिला दिवस सर्वच मंडईमध्ये शुकशुकाट होता. नेहमीप्रमाणे भाजी खरेदी करणे शक्य झाले नाही. घराजवळ परिसरात भाजीवाल्याचा आवाज कानी पडताच त्याचा शोध घेऊन त्याच्याकडे उपलब्ध असेल ते खरेदी करणे अनेकांनी पसंत केले. मुलांना शाळेचा डबा देताना, भाजी काय द्यायची इथपासून ते दुपारी, सायंकाळी भाजी काय करायची हा प्रश्न एरवीसुद्धा गृहिणींना भेडसावत असतो. आता मंडई बंद असल्याने पालेभाज्या मिळेना झाल्यात. त्यामुळे भाजी काय करायची हा प्रश्न त्यांच्यासाठी आणखी गंभीर बनला आहे. हॉटेल, खाणावळवाल्यांचीही मोठी गैरसोय झाली आहे. (प्रतिनिधी)सोसायट्या फेरीवाल्यांच्या शोधातफेरीवाल्यांना प्रवेश नाही, असा मोठा फलक लावणाऱ्या सोसायट्यांमधील रहिवासीसुद्धा घराबाहेर पडून फेरीवाल्यांचा शोध घेताना दिसून येत आहेत. कोणाचाही ओरडण्याचा आवाज आल्यास भाजीविक्रेता आहे, असे समजून तीन मजले खाली उतरून येण्यापर्यंत रहिवाशांची मानसिकता बदलली आहे. एरवी फेरीवाल्यांना मज्जाव करणारे फेरीवाल्याचा शोध घेत असल्याचे उलट परिस्थितीचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.