शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शहरवासीयांची भाज्यांसाठी वणवण

By admin | Updated: July 20, 2016 01:40 IST

सुरुवातीला आडत्यांनी बंद पुकारला. नंतर व्यापाऱ्यांनी त्यात मंडई बंद ठेवण्याचा सोमवारी तिसरा दिवस उजाडला.

पिंपरी : सुरुवातीला आडत्यांनी बंद पुकारला. नंतर व्यापाऱ्यांनी त्यात मंडई बंद ठेवण्याचा सोमवारी तिसरा दिवस उजाडला. भाजी, तरकारी ही प्रत्येक कुटुंबाची रोजची गरज आहे. पालेभाज्या मिळाल्या नाहीत, तरी कोथिंबीर, आले आणि मिरची या रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यावश्यक बाबी मिळत नसल्याने गृहिणींची तारांबळ होत आहे. घराजवळ हातगाडीवर भाजी विक्रीस येणाऱ्याकडे कांदे मिळाले, तर मिरची मिळत नाही. मिरची मिळाली, तर कोथिंबिरीचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या परिसरात जाऊन हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्याचा शोध घ्यावा लागतो. ही परिस्थिती शहरात सध्या विविध भागात दिसून येत आहे. राज्य शासनाने शेतमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर व मावळ तालुक्यातील विविध व्यापारी संघटनांनी १७ जुलैपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. शेतमालावरील ६ ते १० टक्के दलाली शेतकऱ्यांकडून न घेण्याचा आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुण्यानंतर पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, कृष्णानगर, तळेगाव, लोणावळा व कामशेत मंडईतील विविध संघटनांनी शासनाचा निषेध नोंदवला. मंडई बेमुदत बंद ठेवून अांदोलन सुरू केले. सलग तीन दिवस मंडई बंद असल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. रविवारी बहुतेकांना सुटी असते. त्या दिवशी आठवडाभर पुरेल इतकी भाजी खरेदी केली जाते. परंतु रविवारीच मंडई बंद होती. आंदोलनाचा पहिला दिवस सर्वच मंडईमध्ये शुकशुकाट होता. नेहमीप्रमाणे भाजी खरेदी करणे शक्य झाले नाही. घराजवळ परिसरात भाजीवाल्याचा आवाज कानी पडताच त्याचा शोध घेऊन त्याच्याकडे उपलब्ध असेल ते खरेदी करणे अनेकांनी पसंत केले. मुलांना शाळेचा डबा देताना, भाजी काय द्यायची इथपासून ते दुपारी, सायंकाळी भाजी काय करायची हा प्रश्न एरवीसुद्धा गृहिणींना भेडसावत असतो. आता मंडई बंद असल्याने पालेभाज्या मिळेना झाल्यात. त्यामुळे भाजी काय करायची हा प्रश्न त्यांच्यासाठी आणखी गंभीर बनला आहे. हॉटेल, खाणावळवाल्यांचीही मोठी गैरसोय झाली आहे. (प्रतिनिधी)सोसायट्या फेरीवाल्यांच्या शोधातफेरीवाल्यांना प्रवेश नाही, असा मोठा फलक लावणाऱ्या सोसायट्यांमधील रहिवासीसुद्धा घराबाहेर पडून फेरीवाल्यांचा शोध घेताना दिसून येत आहेत. कोणाचाही ओरडण्याचा आवाज आल्यास भाजीविक्रेता आहे, असे समजून तीन मजले खाली उतरून येण्यापर्यंत रहिवाशांची मानसिकता बदलली आहे. एरवी फेरीवाल्यांना मज्जाव करणारे फेरीवाल्याचा शोध घेत असल्याचे उलट परिस्थितीचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.