शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

शहरवासीयांची भाज्यांसाठी वणवण

By admin | Updated: July 20, 2016 01:40 IST

सुरुवातीला आडत्यांनी बंद पुकारला. नंतर व्यापाऱ्यांनी त्यात मंडई बंद ठेवण्याचा सोमवारी तिसरा दिवस उजाडला.

पिंपरी : सुरुवातीला आडत्यांनी बंद पुकारला. नंतर व्यापाऱ्यांनी त्यात मंडई बंद ठेवण्याचा सोमवारी तिसरा दिवस उजाडला. भाजी, तरकारी ही प्रत्येक कुटुंबाची रोजची गरज आहे. पालेभाज्या मिळाल्या नाहीत, तरी कोथिंबीर, आले आणि मिरची या रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यावश्यक बाबी मिळत नसल्याने गृहिणींची तारांबळ होत आहे. घराजवळ हातगाडीवर भाजी विक्रीस येणाऱ्याकडे कांदे मिळाले, तर मिरची मिळत नाही. मिरची मिळाली, तर कोथिंबिरीचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या परिसरात जाऊन हातगाडीवर भाजी विक्री करणाऱ्याचा शोध घ्यावा लागतो. ही परिस्थिती शहरात सध्या विविध भागात दिसून येत आहे. राज्य शासनाने शेतमाल नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर व मावळ तालुक्यातील विविध व्यापारी संघटनांनी १७ जुलैपासून बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. शेतमालावरील ६ ते १० टक्के दलाली शेतकऱ्यांकडून न घेण्याचा आणि शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पुण्यानंतर पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, कृष्णानगर, तळेगाव, लोणावळा व कामशेत मंडईतील विविध संघटनांनी शासनाचा निषेध नोंदवला. मंडई बेमुदत बंद ठेवून अांदोलन सुरू केले. सलग तीन दिवस मंडई बंद असल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. रविवारी बहुतेकांना सुटी असते. त्या दिवशी आठवडाभर पुरेल इतकी भाजी खरेदी केली जाते. परंतु रविवारीच मंडई बंद होती. आंदोलनाचा पहिला दिवस सर्वच मंडईमध्ये शुकशुकाट होता. नेहमीप्रमाणे भाजी खरेदी करणे शक्य झाले नाही. घराजवळ परिसरात भाजीवाल्याचा आवाज कानी पडताच त्याचा शोध घेऊन त्याच्याकडे उपलब्ध असेल ते खरेदी करणे अनेकांनी पसंत केले. मुलांना शाळेचा डबा देताना, भाजी काय द्यायची इथपासून ते दुपारी, सायंकाळी भाजी काय करायची हा प्रश्न एरवीसुद्धा गृहिणींना भेडसावत असतो. आता मंडई बंद असल्याने पालेभाज्या मिळेना झाल्यात. त्यामुळे भाजी काय करायची हा प्रश्न त्यांच्यासाठी आणखी गंभीर बनला आहे. हॉटेल, खाणावळवाल्यांचीही मोठी गैरसोय झाली आहे. (प्रतिनिधी)सोसायट्या फेरीवाल्यांच्या शोधातफेरीवाल्यांना प्रवेश नाही, असा मोठा फलक लावणाऱ्या सोसायट्यांमधील रहिवासीसुद्धा घराबाहेर पडून फेरीवाल्यांचा शोध घेताना दिसून येत आहेत. कोणाचाही ओरडण्याचा आवाज आल्यास भाजीविक्रेता आहे, असे समजून तीन मजले खाली उतरून येण्यापर्यंत रहिवाशांची मानसिकता बदलली आहे. एरवी फेरीवाल्यांना मज्जाव करणारे फेरीवाल्याचा शोध घेत असल्याचे उलट परिस्थितीचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.