शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

कृषी विभागाचा ‘आत्मा’ आॅक्सिजनवर!

By admin | Updated: September 2, 2014 01:05 IST

कृषी विभागाच्या योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचाव्या, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख पटावी, उत्पादनात वाढ व्हावी व देशातील बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, या उदात्त हेतूने गत चार

बदल्यांचा खेळ : दीड महिन्यांपासून नियुक्ती हवेतजीवन रामावत - नागपूरकृषी विभागाच्या योजना थेट शेतकऱ्यांच्या दारी पोहोचाव्या, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख पटावी, उत्पादनात वाढ व्हावी व देशातील बळीराजा सुखी-समृद्ध व्हावा, या उदात्त हेतूने गत चार वर्षांपूर्वी कृषी विभागाचे विभाजन करून, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) हा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला. परंतु सध्या नागपुरातील हा विभाग शेतकऱ्यांना समृद्ध करण्याऐवजी स्वत:च अनिश्चितेच्या चक्रव्यूहात अडकला आहे. या विभागाच्या प्रमुख तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. नलिनी भोयर यांची गत दीड महिन्यापूर्वी अचानक रोजगार हमी योजना विभागात बदली करण्यात आली. परंतु अजूनपर्यंत त्यांना येथून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. शिवाय त्यांच्या जागी कुणाची नियुक्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे गत दीड महिन्यापासून हा विभाग अक्षरश: वाऱ्यावर आहे. गत १५ जुलै रोजी डॉ. भोयर यांचा बदली आदेश जारी झाला. मात्र असे असताना, त्यांनी अजूनपर्यंत येथील खुर्ची सोडलेली नाही. शिवाय शासनाला त्यांना कार्यमुक्त करण्याची गरजही वाटली नाही. मग, त्यांच्या बदलीचा हा सर्व खेळ कशासाठी, असा सध्या सर्वत्र प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे या सर्व घडामोडींचा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होऊ लागला आहे. माहिती सूत्रानुसार डॉ. भोयर यांची ही बदली त्यांच्या इच्छेविरुद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे बदली आदेश जारी होताच, त्यांनी तो रद्द करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. परंतु त्यात त्यांना फारसे यश आले नाही. शेवटी एका ठिकाणी त्यांना बदली आदेश रद्द करण्याचे आश्वासन मिळाले. कदाचित त्यामुळेच अजूनपर्यंत त्या येथून कार्यमुक्त झाल्या नसल्याची चर्चा आहे. अलीकडे ‘आत्मा’ या विभागाला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्याशी निगडित महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात.