शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

प्रेमविवाह करणार्‍या मुलीला संपत्तीचा वाटा नाकारला!

By admin | Updated: May 20, 2014 21:30 IST

पित्याने लिहून घेतले प्रतिज्ञापत्र

अकोला: आपल्या मर्जीने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करणार्‍या मुलीला पित्याच्या संपत्तीतील काही वाट्यावर हक्क सांगता येणार नाही, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र एका पित्याने मुलीकडून लिहून घेतल्याची घटना नुकतीच खदान पोलिस ठाण्यात घडली. या घटनेची पोलिस ठाण्यात चांगलीच चर्चा रंगली होती. कौलखेड भागात राहणार्‍या एक २४ वर्षीय युवतीचे परिसरातील २८ वर्षीय युवकासोबत सूत जुळले. दोघांनी सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. अनेक महिन्यांपासून प्रेमप्रकरण चांगलेच रंगात आले. दोघांनी लग्न करण्याचा मनोदय एकमेकांशी बोलून दाखवला; परंतु दोघांनाही आपल्या लग्नाला कुटुंबीयांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने पळून जाऊन लग्न केलेले बरे. लग्न केल्यानंतर कुटुंबीयांचा विरोध कमी होईल, या विचाराने युवती युवकासोबत पळून गेली. मुलगी घरी परतली नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या पित्याने नातेवाइकांसह मुलीच्या मैत्रिणींकडे चौकशी केली; परंतु मुलगी आढळून न आल्याने पित्याने खदान पोलिस ठाण्यात येऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. आठ दिवसानंतर पळून गेलेली युवती प्रियकरासोबत खदान पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिसांना आम्ही लग्न केल्याचे सांगत सर्व कागदपत्रे दाखविली. पोलिसांनी पित्याला मुलगी परत आल्याची सूचना दिली. मुलीचा पिता लगेच खदान पोलिस ठाण्यात हजर झाले. मुलीने त्यांना लग्न केल्याची माहिती दिली. पित्याने झाले गेले ते विसरून जा आणि घरी परत ये, असे सांगितले; परंतु मुलगी ऐकायला तयार नव्हती. पित्याने पुन्हा समजूत घालण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मुलगी तिच्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहून पित्याचे डोके फिरले. आजपासून तू आम्हाला मेली. आमच्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही असे सांगत, माझ्या वडिलोपार्जित संपत्तीमधील एक दमडीदेखील मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. मुलीनेसुद्धा तुमच्या संपत्तीची मला गरज नसल्याचे पित्याला ठणकावून सांगितल्यावर पित्याचे पित्त आणखीनच खवळले. त्याने ठाण्याबाहेर जाऊन एक प्रतिज्ञापत्र लिहून आणले. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्वखुशीने पित्याच्या संपत्तीवरील हक्क सोडत आहे. माझ्या लग्नानंतर पित्याच्या संपत्तीशी माझा कोणताही वाटा राहणार नसल्याचे लिहिले. पित्याने मुलीला प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितल्यावर मुलीनेसुद्धा क्षणाचाही विचार न करता प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली. पिताही प्रतिज्ञापत्र घेऊन पोलिस ठाण्याच्या बाहेर पडले. या सर्व घटनेने पोलिस कर्मचारीही चक्रावून गेले होते. या घटनेची पोलिस कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.