शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

यंदा ‘डेंग्यू’ रुग्णांची संख्या दुप्पट !

By admin | Updated: November 6, 2014 22:01 IST

तब्बल ४१ रुग्ण : गेल्या वर्षापेक्षा संख्या वाढली; आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना

नितीन काळेल - सातारा राज्यात सर्वत्रच डेंग्यूने थैमान घातले असून, याबद्दल सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला सातारा जिल्हाही अपवाद राहिलेला नाही. मागील वर्षापेक्षा जिल्ह्यात यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. त्यांच्या वतीने विविध उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ४१ रुग्ण आहेत. मागील एक महिन्यापासून सर्वत्रच डेंग्यूबद्दल चर्चा आहे. डेंग्यूमुळे राज्यात अनेकांना जीव गमवावाही लागला आहे. यामध्ये काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे शासनालाही जाग आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळीवर डेंग्यूबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य पथकाच्या वतीने लोकांना आरोग्यविषयक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.काही वर्षांपूर्वी शहराच्या ठिकाणी आढळणारे डेंग्यूचे रुग्ण आता ग्रामीण भागातही आढळत असल्याने आरोग्य विभागाच्या काळजीचा हा विषय झाला आहे. याला कारण म्हणजे ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात बांधकामे होताना दिसून येत आहेत. त्यामुळे विविध बांधकामाच्या ठिकाणी पाणीसाठा करण्यात येत आहे. हे पाणी अनेक दिवस तसेच ठेवण्यात येत आहे. त्याचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे अशा पाण्यात डेंग्यूच्या डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता यंदा रुग्णांची संख्या निश्चितपणे वाढल्याचे दिसून येत आहे. मागीलवर्षी जानेवारी ते आॅक्टोबरअखेर जिल्ह्यात २५ डेंग्यूचे रुग्ण होते. यंदा त्यामध्ये मोठी वाढ प्रथमच झाल्याचे दिसून येत आहे. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४१ रुग्ण डेंग्यूचे आढळून आलेले आहेत. रुग्णांचा हा आकडा निश्चितच चिंतेचे वातावरण निर्माण करणारा आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. कऱ्हाड तालुक्यात तब्बल १३ रुग्ण आहेत. जिल्ह्यात आढळून आलेल्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. त्यांच्या जीविताला कोणताही धोका नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४१ रुग्ण आढळून आलेले आहेत. मागीलवर्षी ही संख्या २५ इतकी होती. आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळीवर जागृती सुरू आहे. त्याला निश्चितपणे यश येत आहे. जिल्ह्यात लवकरच डेंग्यू आटोक्यात येईल. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. - डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्ह्यात डेंग्यूचा एकादा संशयित आढळून आल्यास त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात येतात. त्या रक्ताची तपासणी येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात केली जाते. त्यानंतरच संबंधितांना डेंग्यू झाला आहे की नाही, हे निश्चित करण्यात येते. इडिस इजिप्तीचे डास प्रामुख्याने शहरी भागात आढळतात. तसेच आता ते ग्रामीण भागातही आढळून येत आहेत. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे त्यांना ओळखायला सोपे जाते.वाहनांचे टायर, मडकी, पाण्याच्या टाक्या आदींमध्ये साचलेल्या पाण्यात इडिस इजिप्तीची पैदास मोठ्या प्रमाणात होते.घराशेजारील पाण्याची डबकी तत्काळ मुजविणे. परिसराची स्वच्छता राखणे महत्त्वाचे असते. अनेक दिवस साचून राहिलल्या पाण्याचा निचरा केल्याने डासांची पैदास होत नाही.‘त्या’ मृत्यूबद्दल अद्याप अनिश्चितता...जिल्ह्यात डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरी संबंधितांचा मृत्यू डेंग्यूमुळेच झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयित म्हणून संबंधिताचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे गृहित धरण्यात आलेले आहे. अद्याप तसे जाहीर झालेले नाही, असे सांगण्यात आले.परिसर स्वच्छतेला प्राधान्यजिल्ह्यात डेंग्यूबाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी घराबरोबच परिसराची स्वच्छता करण्यास प्रारंभ केला आहे. नागरिकांनी डबक्यात तसेच नाल्यात बऱ्याच दिवसांपासून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यास सुरूवात केली आहे. घरातील पाण्याने भरलेली भांडीदेखील रिकामी केली आहेत. आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकही संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढे सरसावले आहेत.जिल्हा रुग्णालयात पाच जणांवर उपचारजिल्ह्यात आत्तापर्यंत डेंग्यूचे ४१ रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही रुग्ण आजारातून बरेही झाले आहेत. सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या डेंग्यूच्या पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.