शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

गोडसे पुण्यतिथीविरोधात निदर्शने

By admin | Updated: November 16, 2015 03:42 IST

महात्मा गांधी यांचा हत्यारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नथुराम गोडसे व नारायण आपटे यांची पुण्यतिथी रविवारी (१५ नोव्हेंबर) पनवेलमध्ये शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आल्याने पुन्हा

पनवेल : महात्मा गांधी यांचा हत्यारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नथुराम गोडसे व नारायण आपटे यांची पुण्यतिथी रविवारी (१५ नोव्हेंबर) पनवेलमध्ये शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आल्याने पुन्हा एकदा नव्याने वादाला तोंड फुटले आहे. महाराणा प्रताप बटालीयनच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसने विरोध केला असून, कार्यक्र म स्थळी निदर्शने केली.महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने २००८ पासून नवीन पनवेलमधील पृथ्वी हॉलमध्ये नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी क्रांतिकारी शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर हे या कार्यक्र माचे आयोजक होते. या कार्यक्र मात एल.आर. बाली लिखित वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशनदेखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्र माला सनातन संस्थेचे अभय वर्तक हे उपस्थित होते. यावेळी प्रीतम कुमार त्यागी, सुरेश जाधव, स्वामी रु द्र गुप्ताचार्य, शर्मेश राठोड, महेश पवार, संतोष मोकल, चंद्रकांत राजपूत, बजरंग म्हात्रे आदींसह शेकडो संख्येने नथुराम गोडसे याचे समर्थक व महाराणा प्रताप बटालियनचे कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्र माला काँग्रेसने विरोध दर्शवत कार्यक्र मस्थळी काळे झेंडे फडकावले. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी निदर्शने करण्यात आली. हा देश गांधींचा, नाही चालणार मारेकऱ्यांचे उदात्तीकरण, नाव घेता गांधींचे उदात्तीकरण गोडसेचे, महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देत, यावेळी कार्यक्रमाला विरोध केला. (प्रतिनिधी)पुणे : गोडसे परिवारातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशनाला विवेकवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला. अशा माणसाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. गोडसेवरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित केला नव्हता; तर पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.गोडसे परिवारातर्फे रविवारी सायंकाळी नानासाहेब गोडसे यांच्या आनंदी विलास येथे अस्थिकलश दर्शन आणि चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच गोडसेवरील ‘नथुराम एक हुतात्मा संत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार होते. सामाजिक संघटना व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी या पुस्तक प्रकाशनास विरोध दर्शविला.