शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून लोकशाही पायदळी

By admin | Updated: July 15, 2016 03:43 IST

सत्तेच्या लालसेपोटी मोदी सरकारने अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकारे बरखास्त करून लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली असून, राज्यघटनेचा घोर अवमान केला आहे

नांदेड : सत्तेच्या लालसेपोटी मोदी सरकारने अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकारे बरखास्त करून लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली असून, राज्यघटनेचा घोर अवमान केला आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा खा़सोनिया गांधी यांनी गुरुवारी केंद्र सरकारचा समाचार घेतला़ दिवंगत काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, तसेच स्मृतिसंग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग होते़ राज्यपालांचे सर्व निर्णय रद्द करत, सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेशात पुन्हा काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा आदेश कालच दिला होता. त्याचा उल्लेख करत सोनिया म्हणाल्या, ‘शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांनी आजवर नेहमीच संवैधानिक मूल्यांची जपवणूक केली. लोकमताचा आदर करीत सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी आयुष्य वेचले़ मात्र, आज सत्ता मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे उत्तराखंड, अरुणाचलमध्ये पाडली गेली़ मात्र, आपणा सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचा अभिमान वाटला पाहिजे़ कारण न्यायालयाने घटनेचे संरक्षण केले अन् पुन्हा लोकशाही बहाल केली़ या वेळी माजी पंतप्रधान डॉ़ मनमोहन सिंग यांनी शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करून केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली देशसेवा सदैव स्मरणात राहील़, असे सांगितले.यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माजीमंत्री पतंगराव कदम, दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, आ़भाई जगताप यांचीही समयोचित भाषणे झाली़ प्रारंभी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्त्यांसह प्रचंड संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.शिस्तप्रिय हेडमास्तरशंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करून सोनिया म्हणाल्या, संवैधानिक व्यवस्थेवर त्यांचा कायम विश्वास होता़ ते कधीही संवैधानिक मुल्यांच्या बाहेर जावून काम करण्याचा विचारही करू शकत नव्हते़ शिस्तीबद्दल तर त्यांना हेडमास्तर म्हटले जायचे़ कुठल्याही कामाची सुरुवात केली की ते यशस्वीपणे शेवटपर्यंत नेण्याचा त्यांचा ध्यास असे़ त्यामुळेच ते इंदिरा गांधींचे विश्वासपात्र राहिले़ ज्यावेळी राजीव गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले, त्यावेळी आसाम, मिझोराम, पंजाबमध्ये कडवी आव्हाने होती़ त्यावेळी चव्हाण यांनी देशात शांतता बहाल करण्यासाठी मोठे योगदान दिले़, असेही त्या म्हणाल्या.उद्योगपतींचे कर्ज माफ, शेतकरी मात्र वाऱ्यावरकेंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजपा सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण करून द्यावी लागते़, दुष्काळाबद्दल बोलावे लागते़ तत्कालीन यूपीए सरकारमध्ये शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्यासाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या, त्या आज कमजोर केल्या जात आहेत़ सहकारी बँका, सहकार क्षेत्रच मोडीत काढले जात आहे, ज्यामुळे लाखो गरजू लोकांना नुकसान सहन करावे लागत आहे़सरकारला जाब विचारूएकीकडे उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले जात आहे अन् शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे, ज्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत़ काँग्रेस हे कदापि सहन करणार नाही़ सरकारला वेळोवेळी जाब विचारू, असा इशाराही सोनिया यांनी दिला.