शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शेततळ्याचे निकष बदलण्याची मागणी

By admin | Updated: July 29, 2016 03:32 IST

राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचे निकष, लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आदी मुद्यांवर विरोधकांनी गुरुवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. योजनेचे निकष बदलून

मुंबई : राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचे निकष, लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान आदी मुद्यांवर विरोधकांनी गुरुवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. योजनेचे निकष बदलून एक लाखापर्यंत वाढवावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तथापि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी सुस्पष्ट शब्दात उत्तर टाळल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही त्यांना फटकारले आणि जर ५० हजारात शेततळे होत नसताना अनुदानाची रक्कम सरकार का वाढवित नाही, अशी विचारणा केली.प्रश्नोत्तराच्या तासात हा विषय प्रतापराव पाटील चिखलीकर यानी उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेत भाग घेताना अजित पवार यांनी या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे निदर्शनास आणून दिले. राज्यात १ कोटी ३७ लाख शेतकरी असून त्यापैकी केवळ एक लाख ५० हजार शेतकरी अर्ज करतात म्हणजे योजना पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे स्पष्ट होते. शेततळ्यास ८० हजार रुपये खर्च येतो, प्लॅस्टीक कागदाची किंमत वेगळी असते. त्यामुळे ही अनुदानाची रक्कम एक लाख करावी अशी मागणी त्यांनी केली. योजनेसाठी प्राप्त प्रस्तावावर लवकर निर्णय होत नसल्याने बरेच दिवस प्रलंबित रहात असल्याचे शंभूराजे देसाई यांनी सांगितले. मंत्री रावळ यांनी ५१ हजाराचे उद्दीष्ट असताना दीड लाख अर्ज प्राप्त झाले, त्यामुळे योजनेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला असल्याचा दावा केला. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील यांनी ही योजना मागेल त्याला शेततळे असे नाव असेल तर लक्षांश कसा ठरविला, अशी विचारणा केली. प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त डोंगरी भागाचा योजनेत समावेश करावा अशी मागणी केली. (प्रतिनिधी)मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत मौनवारंवार मागणी करुनही मंत्री रावळ त्याला बगल देतअसल्याचे निदर्शनास येताच त्यांना अध्यक्ष बागडे यांनी अनुदानाची रक्कम वाढविणार की नाही हे सांगा अशा शब्दात त्यांना खडसावले. त्यानंतर रावळ यांनी पुढील वर्षापासून अनुदानाची रक्कम वाढवून देण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगून चर्चेवर पडदा टाकला.