शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या कमतरतेने इथेनॉल उत्पादन घटले

By admin | Updated: March 2, 2017 01:21 IST

यंदा उसाची कमतरता, तरीदेखील काही कारखान्यांनी धाडस करून गळीत हंगाम सुरू केला.

महेंद्र कांबळे,बारामती- यंदा उसाची कमतरता, तरीदेखील काही कारखान्यांनी धाडस करून गळीत हंगाम सुरू केला. परंतु, इथेनॉलनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मोलॅसिसचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे इथेनॉलनिर्मितीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. त्यातच केंद्र सरकारने अबकारी कर पुन्हा लागू केल्यामुळे आता इथेनॉल पुरवठ्यासाठी ३९ रुपये दर निश्चित केला आहे. तो कारखान्यांना न परवडणारा असल्याचे सांगण्यात येते. देशात सर्वाधिक इथेनॉल प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. सरकारने इथेनॉल खरेदीचा निर्णय हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी घेतला. त्याचा फटकादेखील कारखान्यांना बसला आहे. त्याचबरोबर इथेनॉलनिर्मितीलादेखील अडचणी आल्या. या संदर्भात साखर उद्योगातील तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी सांगितले, की यंदा उसाचे उत्पादन कमी होते. त्यामुळे अनेक कारखाने लवकर बंद झाले. परिणामी, मोलॅसिसचे उत्पादनदेखील कमी झाले. इथेनॉलनिर्मितीसाठी मोलॅसिसची आवश्यकता असते. पूर्वी मोलॅसिस म्हणजे एक टाकाऊ पदार्थ, असेच म्हटले जायचे. त्याचा वापर पूर्वी औषधे, रंगनिर्मिती, अल्कोहोल तयार करणे यासाठी केला जाई. दरदेखील कमी होते. आता इथेनॉलची निर्मिती होत असल्यामुळे यालादेखील मागणी वाढली. अनेक कारखान्यांनी इथेनॉलची नोंदणी केली; परंतु गाळप घटल्याने इथेनॉलचे उत्पादनच करता आले नाही. कारखान्यांना आणि पेट्रोलियम कंपन्यांना परवडेल, असा दुवा साधण्यासाठी सरकारने धरसोड वृत्ती बंद केली पाहिजे. तरच, इथेनॉलनिर्मितीचा उद्देश सफल होईल, असे त्यांनी सांगितले. तर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले, की इथेनॉल खरेदीचा निर्णय उशिरा झाला. कारखाने सुरू असतानाच तो निर्णय झाल्यास फरक पडतो. कारखाने सुरू असताना उपलब्ध होणारी वाफ इथेनॉलनिर्मितीसाठी उपयुक्त ठरते. मोलॅसिसच्या दरातदेखील वाढ झाल्याने इथेनॉलनिर्मितीवर मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनात घट होण्याची शक्यता... भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर डिसेंबर २०१४मध्ये इथेनॉलखरेदी सुरू केली होती. त्याआधी २००६ पासून ही खरेदी बंद होती. इथेनॉलखरेदीची किंमत कर आणि वाहतूक खर्चासह ४८.५० रुपये ते ४९.५० रुपयांदरम्यान राहील, असे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे इथेनॉलचा पुरवठा वाढला. २०१४-१५मध्ये इथेनॉल पुरवठा ६७.४ कोटी लिटरनी वाढला. २०१५-१६च्या इथेनॉल वर्षासाठी १२० कोटी लिटरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यंदा मात्र उत्पादन घटले आहे. त्यातच अबकारी कर कारखान्यांकडून वसूल केला जाणार आहे. >युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत मागेच... अबकारी कर कारखान्यांच्या माथी...पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून वाढणाऱ्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना होत आहेत; परंतु पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेला दर इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना परवडत नाही. युरोपीय राष्ट्रांप्रमाणेच भारतात २५ टक्के इथेनॉल पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये मिश्रण करण्याची मागणी आहे; परंतु सध्या १० टक्केदेखील मिश्रण केले जात नाही. पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये इथेनॉलचे मागणीप्रमाणे मिश्रण केल्यास क्रूड आॅईलच्या आयातीवर होणाऱ्या खर्चात कपात होईल. परंतु, इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या ब्राझील, स्वीडन यासारख्या देशांच्या स्पर्धेत भारत मागे आहे. ब्राझीलमध्ये तर ४० टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरले जाते. मात्र, भारतात त्याचे प्रमाण कमी आहे. विशेष म्हणजे, देशात सर्वाधिक इथेनॉलनिर्मिती करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. वास्तविक, इथेनॉल पेट्रोलियमजन्य पदार्थामध्ये दर वर्षी ५ टक्के प्रमाणे मिश्रण करावे, असा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. आजअखेर २५ टक्क्यांपर्यंत हा निर्णय झाला असता. त्यामुळे क्रूड तेल आयातीवरील खर्च कमी झाला असता. सध्या सतत वाढत असलेल्या पेट्रोलियम पदार्थांचे दर आटोक्यात ठेवण्यात यश आले असते. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशांतर्गत इथेनॉलचे दर कमी आहेत. ३९ रुपये प्रमाणे पेट्रोलियम कंपन्या इथेनॉल खरेदी करतात. पूर्वी हा दर ४५ रुपये होता. वरचा ५ रुपये अबकारी कर शासन सहन करीत होते. आता अबकारी कर कारखान्यांनीच भरायचा आहे.