शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

उसाच्या कमतरतेने इथेनॉल उत्पादन घटले

By admin | Updated: March 2, 2017 01:21 IST

यंदा उसाची कमतरता, तरीदेखील काही कारखान्यांनी धाडस करून गळीत हंगाम सुरू केला.

महेंद्र कांबळे,बारामती- यंदा उसाची कमतरता, तरीदेखील काही कारखान्यांनी धाडस करून गळीत हंगाम सुरू केला. परंतु, इथेनॉलनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मोलॅसिसचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे इथेनॉलनिर्मितीवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. त्यातच केंद्र सरकारने अबकारी कर पुन्हा लागू केल्यामुळे आता इथेनॉल पुरवठ्यासाठी ३९ रुपये दर निश्चित केला आहे. तो कारखान्यांना न परवडणारा असल्याचे सांगण्यात येते. देशात सर्वाधिक इथेनॉल प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. सरकारने इथेनॉल खरेदीचा निर्णय हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी घेतला. त्याचा फटकादेखील कारखान्यांना बसला आहे. त्याचबरोबर इथेनॉलनिर्मितीलादेखील अडचणी आल्या. या संदर्भात साखर उद्योगातील तज्ज्ञ चंद्रराव तावरे यांनी सांगितले, की यंदा उसाचे उत्पादन कमी होते. त्यामुळे अनेक कारखाने लवकर बंद झाले. परिणामी, मोलॅसिसचे उत्पादनदेखील कमी झाले. इथेनॉलनिर्मितीसाठी मोलॅसिसची आवश्यकता असते. पूर्वी मोलॅसिस म्हणजे एक टाकाऊ पदार्थ, असेच म्हटले जायचे. त्याचा वापर पूर्वी औषधे, रंगनिर्मिती, अल्कोहोल तयार करणे यासाठी केला जाई. दरदेखील कमी होते. आता इथेनॉलची निर्मिती होत असल्यामुळे यालादेखील मागणी वाढली. अनेक कारखान्यांनी इथेनॉलची नोंदणी केली; परंतु गाळप घटल्याने इथेनॉलचे उत्पादनच करता आले नाही. कारखान्यांना आणि पेट्रोलियम कंपन्यांना परवडेल, असा दुवा साधण्यासाठी सरकारने धरसोड वृत्ती बंद केली पाहिजे. तरच, इथेनॉलनिर्मितीचा उद्देश सफल होईल, असे त्यांनी सांगितले. तर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले, की इथेनॉल खरेदीचा निर्णय उशिरा झाला. कारखाने सुरू असतानाच तो निर्णय झाल्यास फरक पडतो. कारखाने सुरू असताना उपलब्ध होणारी वाफ इथेनॉलनिर्मितीसाठी उपयुक्त ठरते. मोलॅसिसच्या दरातदेखील वाढ झाल्याने इथेनॉलनिर्मितीवर मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनात घट होण्याची शक्यता... भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर डिसेंबर २०१४मध्ये इथेनॉलखरेदी सुरू केली होती. त्याआधी २००६ पासून ही खरेदी बंद होती. इथेनॉलखरेदीची किंमत कर आणि वाहतूक खर्चासह ४८.५० रुपये ते ४९.५० रुपयांदरम्यान राहील, असे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे इथेनॉलचा पुरवठा वाढला. २०१४-१५मध्ये इथेनॉल पुरवठा ६७.४ कोटी लिटरनी वाढला. २०१५-१६च्या इथेनॉल वर्षासाठी १२० कोटी लिटरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यंदा मात्र उत्पादन घटले आहे. त्यातच अबकारी कर कारखान्यांकडून वसूल केला जाणार आहे. >युरोपीय राष्ट्रांच्या तुलनेत मागेच... अबकारी कर कारखान्यांच्या माथी...पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून वाढणाऱ्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना होत आहेत; परंतु पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेला दर इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना परवडत नाही. युरोपीय राष्ट्रांप्रमाणेच भारतात २५ टक्के इथेनॉल पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये मिश्रण करण्याची मागणी आहे; परंतु सध्या १० टक्केदेखील मिश्रण केले जात नाही. पेट्रोलजन्य पदार्थांमध्ये इथेनॉलचे मागणीप्रमाणे मिश्रण केल्यास क्रूड आॅईलच्या आयातीवर होणाऱ्या खर्चात कपात होईल. परंतु, इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या ब्राझील, स्वीडन यासारख्या देशांच्या स्पर्धेत भारत मागे आहे. ब्राझीलमध्ये तर ४० टक्क्यांपर्यंत इथेनॉल वापरले जाते. मात्र, भारतात त्याचे प्रमाण कमी आहे. विशेष म्हणजे, देशात सर्वाधिक इथेनॉलनिर्मिती करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. वास्तविक, इथेनॉल पेट्रोलियमजन्य पदार्थामध्ये दर वर्षी ५ टक्के प्रमाणे मिश्रण करावे, असा निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. आजअखेर २५ टक्क्यांपर्यंत हा निर्णय झाला असता. त्यामुळे क्रूड तेल आयातीवरील खर्च कमी झाला असता. सध्या सतत वाढत असलेल्या पेट्रोलियम पदार्थांचे दर आटोक्यात ठेवण्यात यश आले असते. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशांतर्गत इथेनॉलचे दर कमी आहेत. ३९ रुपये प्रमाणे पेट्रोलियम कंपन्या इथेनॉल खरेदी करतात. पूर्वी हा दर ४५ रुपये होता. वरचा ५ रुपये अबकारी कर शासन सहन करीत होते. आता अबकारी कर कारखान्यांनीच भरायचा आहे.