शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

शहरात गतवर्षीच्या तुलनेत आजारांत घट

By admin | Updated: August 3, 2016 05:42 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजारांचे प्रमाण कमीच असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले

मुंबई : पावसाळ्यात शहरात आजार वाढले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा आजारांचे प्रमाण कमीच असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात विषाणूजन्य तापाचे रुग्ण वाढतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत २३७ने घट झालेली आहे. जुलै २०१६मध्ये मलेरियाचे ५८३ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. महिन्याभरात ६३ रुग्ण आढळून आले आहेत. दोन वर्षांपूर्वी मुंबईत स्वाईन फ्लूने डोके वर काढले होते. स्वाईन फ्लूची साथ गेल्या वर्षीही मुंबईत होती. पण यंदा एकच रुग्ण आढळला आहे. काविळीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, जुलैमध्ये १३५ रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी) >एडिस डासाची वैशिष्ट्ये : डेंग्यूची लागण ही एडिस डासाच्या मादीमुळे होते. या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात म्हणून या डासांना ‘टायगर मॉस्क्युटो’ असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो. त्यामुळे या डासाचा धोका फक्त घरातच नाही, तर शाळा, कॉलेज, कार्यालय, हॉटेल्स, मॉल, स्टेशन अशा सर्व ठिकाणी आहे. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामध्ये पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास, अळ्या असलेली भांंडी घासून-पुसून स्वच्छ ठेवावीत. त्यामुळे भांड्यांच्या पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील. >अशी घ्या काळजी पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो, त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.अति जोखमीच्या व्यक्तींनी (उदा : शेतात काम करणारे, जनावरांची देखभाल करणारे, सफाई कामगार) काळजी घेणे आवश्यक आहे. पायाला जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे. किंवा गमबुटांचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालत आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावेत. उंदीर-घुशींचा नायनाट करावा.उंदीर नियंत्रणासाठी स्वच्छता, उंदराचे सापळे रचणे, त्याला विष घालणे इत्यादी मार्ग वापरात आणावेत. घरात आणि आजूबाजूला कचरा साठणार नाही याची दक्षता घ्यावी, कचऱ्याची विल्हेवाट लावावी. ट्रेकिंग टाळावे.