शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

हज यात्रेसाठी जाणाऱ्यांच्या प्रमाणात घट

By admin | Updated: August 31, 2015 01:36 IST

देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या जनगणनेच्या अहवालात स्पष्ट झाले असले तरी भारतातून हज कमिटी

मुंबई : देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या जनगणनेच्या अहवालात स्पष्ट झाले असले तरी भारतातून हज कमिटी आॅफ इंडियाकडून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये मात्र तब्बल २१ टक्क्यांनी घट झाली आहे. सौदी अरेबियाकडून भारताच्या कोट्यात कपात करण्यात आल्याने त्याचे प्रमाण कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी ९९ हजार ९१५ जण हज यात्रेला गेले होते. त्यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश होता.मुस्लीम धर्मातील प्रमुख मूलतत्त्वांपैकी हज हे एक आहे. भारतातून या यात्रेसाठी जाणाऱ्यांचे नियोजन केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हज कमिटी आॅफ इंडियाकडून केले जाते. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हज यात्रेच्या अनुषंगाने विविध माहिती विचारली होती. त्यानुसार कमिटीचे जन माहिती अधिकारी अब्दुल शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ ते २०१४ या ४ वर्षांतील आकडेवारीची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशातील आहे. २००९मध्ये एकूण ९९,९१४पैकी २४,६२२ यूपीतील होते. त्याखालोखाल पश्चिम बंगालचा क्रमांक असून, तेथून ९,३५८ इतके जण हजला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्र (८,४९०), जम्मू आणि काश्मीर ( ६,९८४), केरला (६,५१७), बिहार ६,२२४), आंध्र प्रदेश (५,७७५), कर्नाटक (५,३३७), राजस्थान (३,९४२) आणि गुजरात (३,७७९) अशी आकडेवारी आहे. विशेष म्हणजे सरकारी कोटा ५०० असून, ४६८ लोकांनी त्याचा लाभ घेतला होता. वर्ष २०११, २०१२ व २०१३च्या तुलनेत वर्ष २०१४मध्ये २५ हजारांची लक्षणीय घट झाली आहे. वर्ष २०११मध्ये ३ लाख २ हजार ६१६ नागरिकांनी अर्ज केला होता. त्यासाठी असलेल्या सव्वा लाख कोट्यातून १ लाख २४ हजार ९०१ लोक हज यात्रेवर जाऊ शकले. २०१२मध्ये कोट्यात फक्त ११०ची वाढ झाली होती. त्या वर्षी ३ लाख ७ हजार ३०९ अर्ज आले असून, १ लाख २५ हजार ६४ यात्रेकरू गेले होते. २०१३मध्ये कोट्यात कपात होऊन १ लाख २१ हजार ४२० करण्यात आली, त्यासाठी २ लाख ९८ हजार ३२५ अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख २१ हजार ३३८ जण हजला गेले. गेल्या वर्षी केवळ १ लाख १०४ जणांचा कोटा मंजूर होता. त्यामुळे केवळ ९९ हजार ९१४ जणांना यात्रेला जाता आले. २०११च्या तुलनेत २०१४मध्ये २१ टक्क्यांनी घट झालीे. त्यामुळे केंद्र सरकारने सौदी प्रशासनाशी बोलणी करून हा कोटा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.