शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेसाठी जाणाऱ्यांच्या प्रमाणात घट

By admin | Updated: August 31, 2015 01:36 IST

देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या जनगणनेच्या अहवालात स्पष्ट झाले असले तरी भारतातून हज कमिटी

मुंबई : देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या जनगणनेच्या अहवालात स्पष्ट झाले असले तरी भारतातून हज कमिटी आॅफ इंडियाकडून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये मात्र तब्बल २१ टक्क्यांनी घट झाली आहे. सौदी अरेबियाकडून भारताच्या कोट्यात कपात करण्यात आल्याने त्याचे प्रमाण कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी ९९ हजार ९१५ जण हज यात्रेला गेले होते. त्यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशातील नागरिकांचा समावेश होता.मुस्लीम धर्मातील प्रमुख मूलतत्त्वांपैकी हज हे एक आहे. भारतातून या यात्रेसाठी जाणाऱ्यांचे नियोजन केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हज कमिटी आॅफ इंडियाकडून केले जाते. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हज यात्रेच्या अनुषंगाने विविध माहिती विचारली होती. त्यानुसार कमिटीचे जन माहिती अधिकारी अब्दुल शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ ते २०१४ या ४ वर्षांतील आकडेवारीची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशातील आहे. २००९मध्ये एकूण ९९,९१४पैकी २४,६२२ यूपीतील होते. त्याखालोखाल पश्चिम बंगालचा क्रमांक असून, तेथून ९,३५८ इतके जण हजला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्र (८,४९०), जम्मू आणि काश्मीर ( ६,९८४), केरला (६,५१७), बिहार ६,२२४), आंध्र प्रदेश (५,७७५), कर्नाटक (५,३३७), राजस्थान (३,९४२) आणि गुजरात (३,७७९) अशी आकडेवारी आहे. विशेष म्हणजे सरकारी कोटा ५०० असून, ४६८ लोकांनी त्याचा लाभ घेतला होता. वर्ष २०११, २०१२ व २०१३च्या तुलनेत वर्ष २०१४मध्ये २५ हजारांची लक्षणीय घट झाली आहे. वर्ष २०११मध्ये ३ लाख २ हजार ६१६ नागरिकांनी अर्ज केला होता. त्यासाठी असलेल्या सव्वा लाख कोट्यातून १ लाख २४ हजार ९०१ लोक हज यात्रेवर जाऊ शकले. २०१२मध्ये कोट्यात फक्त ११०ची वाढ झाली होती. त्या वर्षी ३ लाख ७ हजार ३०९ अर्ज आले असून, १ लाख २५ हजार ६४ यात्रेकरू गेले होते. २०१३मध्ये कोट्यात कपात होऊन १ लाख २१ हजार ४२० करण्यात आली, त्यासाठी २ लाख ९८ हजार ३२५ अर्ज आले होते. त्यापैकी १ लाख २१ हजार ३३८ जण हजला गेले. गेल्या वर्षी केवळ १ लाख १०४ जणांचा कोटा मंजूर होता. त्यामुळे केवळ ९९ हजार ९१४ जणांना यात्रेला जाता आले. २०११च्या तुलनेत २०१४मध्ये २१ टक्क्यांनी घट झालीे. त्यामुळे केंद्र सरकारने सौदी प्रशासनाशी बोलणी करून हा कोटा वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.