शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

पाण्याअभावी भक्तनिवास पन्नास टक्के बंद ठेवण्याचा साईसंस्थानचा निर्णय

By admin | Updated: June 10, 2016 16:13 IST

दुष्काळाच्या झळा साईनगरीलाही बसत आहेत. पाणी टंचाई मुळे संस्थानने नाईलाजास्तव आजपासून आपल्या भक्तनिवासच्या पन्नास टक्के रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १० - दुष्काळाच्या झळा साईनगरीलाही बसत आहेत. पाणी टंचाई मुळे संस्थानने नाईलाजास्तव आजपासून आपल्या भक्तनिवासच्या पन्नास टक्के रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थानचा साठवण तलाव कोरडा पडल्याने गेले काही दिवस संस्थान टँकरने पाणी घेत आहे. मात्र त्यात गोड्या पाण्याचे उदभव कमी झाल्याने पिण्यायोग्य पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सांगितले.
संस्थान सध्या रोज टँकरने तेरा ते सतरा लाख लिटर पाणी विकत घेत आहे. मात्र यात गोडे कमी व खारे पाणी अधिक आहे. या खाऱ्या पाण्याचा टीडीएस 1400 पर्यंत असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. संस्थान प्रति लिटर अकरा ते तेरा पैसे प्रमाणे हे पाणी खरेदी करत आहे. चांगल्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी असूनही पाणी उपलब्ध होत नसल्याने भाविकांचे आरोग्य व संस्थान प्रति असलेला विश्वास जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
सध्या संस्थानच्या अडीच हजारावर रुम आहेत, पहिल्या टप्यात पन्नास टक्के रुम बंद ठेवण्यात येणार आहे. ऑनलाइन वगळता फारच थोड्या भाविकांना रुम मिळणार असल्याने भाविकांना खासगी लॉज मध्ये उतरावे लागणार आहे. 
संस्थानला पाणी पुरवठा करणारे दारणा धरण कोरडे पडल्याने 5 जून ला येणारे आवर्तन रद्द झाल्याने तसेच संस्थानच्या तीन तलावात प्लास्टिक कागद अंथरणे सुरु असल्याने ही परिस्थिती उद्भवली. एक तलावात अगदी थोडे पाणी असून ते भोजनगृहा साठी वापरण्यात येत आहे.
नगरपंचायत तळेही शेवटच्या टप्प्यात असून शहराला दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.