शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी भक्तनिवास पन्नास टक्के बंद ठेवण्याचा साईसंस्थानचा निर्णय

By admin | Updated: June 10, 2016 16:13 IST

दुष्काळाच्या झळा साईनगरीलाही बसत आहेत. पाणी टंचाई मुळे संस्थानने नाईलाजास्तव आजपासून आपल्या भक्तनिवासच्या पन्नास टक्के रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १० - दुष्काळाच्या झळा साईनगरीलाही बसत आहेत. पाणी टंचाई मुळे संस्थानने नाईलाजास्तव आजपासून आपल्या भक्तनिवासच्या पन्नास टक्के रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थानचा साठवण तलाव कोरडा पडल्याने गेले काही दिवस संस्थान टँकरने पाणी घेत आहे. मात्र त्यात गोड्या पाण्याचे उदभव कमी झाल्याने पिण्यायोग्य पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सांगितले.
संस्थान सध्या रोज टँकरने तेरा ते सतरा लाख लिटर पाणी विकत घेत आहे. मात्र यात गोडे कमी व खारे पाणी अधिक आहे. या खाऱ्या पाण्याचा टीडीएस 1400 पर्यंत असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. संस्थान प्रति लिटर अकरा ते तेरा पैसे प्रमाणे हे पाणी खरेदी करत आहे. चांगल्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी असूनही पाणी उपलब्ध होत नसल्याने भाविकांचे आरोग्य व संस्थान प्रति असलेला विश्वास जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
सध्या संस्थानच्या अडीच हजारावर रुम आहेत, पहिल्या टप्यात पन्नास टक्के रुम बंद ठेवण्यात येणार आहे. ऑनलाइन वगळता फारच थोड्या भाविकांना रुम मिळणार असल्याने भाविकांना खासगी लॉज मध्ये उतरावे लागणार आहे. 
संस्थानला पाणी पुरवठा करणारे दारणा धरण कोरडे पडल्याने 5 जून ला येणारे आवर्तन रद्द झाल्याने तसेच संस्थानच्या तीन तलावात प्लास्टिक कागद अंथरणे सुरु असल्याने ही परिस्थिती उद्भवली. एक तलावात अगदी थोडे पाणी असून ते भोजनगृहा साठी वापरण्यात येत आहे.
नगरपंचायत तळेही शेवटच्या टप्प्यात असून शहराला दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.