शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

पाण्याअभावी भक्तनिवास पन्नास टक्के बंद ठेवण्याचा साईसंस्थानचा निर्णय

By admin | Updated: June 10, 2016 16:13 IST

दुष्काळाच्या झळा साईनगरीलाही बसत आहेत. पाणी टंचाई मुळे संस्थानने नाईलाजास्तव आजपासून आपल्या भक्तनिवासच्या पन्नास टक्के रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १० - दुष्काळाच्या झळा साईनगरीलाही बसत आहेत. पाणी टंचाई मुळे संस्थानने नाईलाजास्तव आजपासून आपल्या भक्तनिवासच्या पन्नास टक्के रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थानचा साठवण तलाव कोरडा पडल्याने गेले काही दिवस संस्थान टँकरने पाणी घेत आहे. मात्र त्यात गोड्या पाण्याचे उदभव कमी झाल्याने पिण्यायोग्य पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी सांगितले.
संस्थान सध्या रोज टँकरने तेरा ते सतरा लाख लिटर पाणी विकत घेत आहे. मात्र यात गोडे कमी व खारे पाणी अधिक आहे. या खाऱ्या पाण्याचा टीडीएस 1400 पर्यंत असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. संस्थान प्रति लिटर अकरा ते तेरा पैसे प्रमाणे हे पाणी खरेदी करत आहे. चांगल्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी असूनही पाणी उपलब्ध होत नसल्याने भाविकांचे आरोग्य व संस्थान प्रति असलेला विश्वास जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
सध्या संस्थानच्या अडीच हजारावर रुम आहेत, पहिल्या टप्यात पन्नास टक्के रुम बंद ठेवण्यात येणार आहे. ऑनलाइन वगळता फारच थोड्या भाविकांना रुम मिळणार असल्याने भाविकांना खासगी लॉज मध्ये उतरावे लागणार आहे. 
संस्थानला पाणी पुरवठा करणारे दारणा धरण कोरडे पडल्याने 5 जून ला येणारे आवर्तन रद्द झाल्याने तसेच संस्थानच्या तीन तलावात प्लास्टिक कागद अंथरणे सुरु असल्याने ही परिस्थिती उद्भवली. एक तलावात अगदी थोडे पाणी असून ते भोजनगृहा साठी वापरण्यात येत आहे.
नगरपंचायत तळेही शेवटच्या टप्प्यात असून शहराला दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.