शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

कायदेशीर बाजू तपासूनच मुस्लिम आरक्षणाचा निर्णय - मुख्यमंत्री

By admin | Updated: December 24, 2014 17:52 IST

राज्य सरकारने मुस्लिम आरक्षण बासनात गुंडाळले नसून तज्ज्ञांचे मत जाणून घेतल्यावरच यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. २४ - भाजपा सरकारने मुस्लिम आरक्षण नाकारल्याची टीका विरोधकांकडून सुरु असतानाच राज्य सरकारने मुस्लिम आरक्षण बासनात गुंडाळले नसून तज्ज्ञांचे मत जाणून घेतल्यावरच यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ असे स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

बुधवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन कामकाजाचा लेखाजोखा मांडला. मुस्लिम आरक्षणावर विरोधकांकडून सुरु असलेल्या टीकेवर फडणवीस म्हणाले, मुस्लिम आरक्षणावरुन संवैधानिक पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात आम्ही अॅडव्होकेट जनरल यांचे मत मागवले असून त्यांचे मत जाणून घेतल्यावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. आम्ही दोन्ही सभागृहात याविषयीची सखोल माहिती देऊनही विरोधक आमच्यावर टीका करत आहे असे फडणवीस यांनी सांगितले. आघाडी सरकारने दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाच वर्षांमध्ये सुमारे आठ हजार कोटींचे पॅकेज दिले. तर आम्ही एका वर्षांतच सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले असा दावाही फडणवीस यांनी केला. 

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

> मुंबईसंदर्भात अद्याप कोणतीही समिती नेमलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांना चुकीची माहिती दिल्याने पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले. 

> पोलिसांच्या घरांसाठी विशेष योजना. 

> नगरविकास खात्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय, नगरविकास खात्याचे विकेंद्रीकरण करण्याचा प्रयत्न.