शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

नोटा हद्दपारीचा निर्णय आत्मघातकी - अभ्यंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 06:00 IST

केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधात लढा उभारण्याच्या नावाखाली पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बंद करून आत्मघातकी निर्णय घेतला आहे

नाशिक : केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधात लढा उभारण्याच्या नावाखाली पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा बंद करून आत्मघातकी निर्णय घेतला आहे. एकीकडे या नोटा बंद करून दोन हजारांची नोट काढून काळा पैसानिर्मितीला पुनर्चालना दिल्याची टीका ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी केली.बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईजतर्फे नाशिक विभागातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शाखांच्या कर्मचाऱ्यांचे सोमवारी दहावे द्वैवार्षिक अधिवेशन झाले. भारतातील बहुतांश संपत्ती मोजक्या धनाढ्य लोकांच्या हाती असून, सर्वसामान्य माणूस या निर्णयाने भरडला जात असल्याने नोटा बंदीच्या निर्णयाचे मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे मत अभ्यंकर यांनी व्यक्त केले. नोट बंदीच्या निर्णयानंतर रात्रभर सोन्याची दुकाने उघडी असताना आयकर खात्याकडून मुंबई, दिल्लीसह मोठ्या शहरांत कोठेही छापे टाकून काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई झाली नाही. मॉरिशससह परदेशात बहुतांश उद्योजकांनी काळ्या पैशांची गुंतवणूक केली आहे. सरकार या देशांना शून्य टक्के कर या निर्णयानुसार गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देते. त्यामुळे आपल्याच देशातील पैसा बाहेरच्या देशात जाऊन पुन्हा पांढरा करण्याचा घाट घातला जात असल्याचेही अभ्यंकर यांनी सांगितले.सरकारने राबविलेली योजना चांगली असली, तरी त्यात मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. आयकर खात्यात सुमारे ३० हजार पदे रिक्त असताना हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र सोन्याच्या काळ्या बाजारावर कारवाई करण्याचे आदेश आयकर विभागाला का दिले नाही, असा सवालही अभ्यंकर यांनी केला. (प्रतिनिधी)