शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कर्जमाफीवरून कोंडी कायम

By admin | Updated: March 16, 2017 00:25 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कामकाज नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी घेत प्रचंड गदारोळ घातल्याने विधानसभा अािण विधान परिषदेचे कामकाज

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कामकाज नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी घेत प्रचंड गदारोळ घातल्याने विधानसभा अािण विधान परिषदेचे कामकाज आज प्रत्येकी तीन वेळा तहकूब झाल्यानंतर दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले. कर्जमाफीवरून झालेली कोंडी कायम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या या संदर्भात विधानसभेत निवेदन करण्याची शक्यता आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीची जोरदार मागणी केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे कर्जमाफीच्या मागणीसाठी पुण्यात उपोषणाला बसले होते तेव्हा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सरकार कर्जमाफीची घोषणा मार्च २०१७ पूर्वी करेल, असे आश्वासन देऊन त्यांनी आढाव यांचे उपोषण सोडविले होते याची आठवण विखे पाटील यांनी करून दिली. त्याचवेळी सदस्यांची घोषणाबाजी सुरु होती. कर्जमाफीच्या मागण्यांचे फलकही त्यांनी फडकविले.या गदारोळात तीनवेळा तहकूब झाले आणि नंतर गोंधळातच ते उरकण्यात आले. (विशेष प्रतिनिधी) शिवसेनेची समंजस भूमिकाकर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळ ठप्प झाल्यानंतर सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मंत्री ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यानंतर ते मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’वर गेले. दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीवरून उद्या सभागृहात निवेदन करावे. सभागृहाचे कामकाज चालावे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणीही मान्य व्हावी अशी आमची भूमिका आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, अशी मागणीही आम्ही त्यांच्याकडे आज केली. कर्नाटकच्या धर्तीवर प्रस्ताव पाठवू कर्जमाफीसारखा मोठा निर्णय तडकाफडकी घेता येणार नाही. हा निर्णय घेतल्यास त्यात राज्याचा हिस्सा किती, केंद्राकडे किती निधी मागायचा हे ठरवावे लागेल. कर्नाटकने अलीकडेच कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव पाठवायला हवा, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत व्यक्त केले.कर्जमाफीचा केंद्र पातळीवर निर्णय!उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह काही राज्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकते अशीही चर्चा आहे.