शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवरून कोंडी कायम

By admin | Updated: March 16, 2017 00:25 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कामकाज नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी घेत प्रचंड गदारोळ घातल्याने विधानसभा अािण विधान परिषदेचे कामकाज

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कामकाज नाही, असा पवित्रा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी घेत प्रचंड गदारोळ घातल्याने विधानसभा अािण विधान परिषदेचे कामकाज आज प्रत्येकी तीन वेळा तहकूब झाल्यानंतर दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले. कर्जमाफीवरून झालेली कोंडी कायम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या या संदर्भात विधानसभेत निवेदन करण्याची शक्यता आहे. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीची जोरदार मागणी केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे कर्जमाफीच्या मागणीसाठी पुण्यात उपोषणाला बसले होते तेव्हा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सरकार कर्जमाफीची घोषणा मार्च २०१७ पूर्वी करेल, असे आश्वासन देऊन त्यांनी आढाव यांचे उपोषण सोडविले होते याची आठवण विखे पाटील यांनी करून दिली. त्याचवेळी सदस्यांची घोषणाबाजी सुरु होती. कर्जमाफीच्या मागण्यांचे फलकही त्यांनी फडकविले.या गदारोळात तीनवेळा तहकूब झाले आणि नंतर गोंधळातच ते उरकण्यात आले. (विशेष प्रतिनिधी) शिवसेनेची समंजस भूमिकाकर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळ ठप्प झाल्यानंतर सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मंत्री ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यानंतर ते मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’वर गेले. दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीवरून उद्या सभागृहात निवेदन करावे. सभागृहाचे कामकाज चालावे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणीही मान्य व्हावी अशी आमची भूमिका आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, अशी मागणीही आम्ही त्यांच्याकडे आज केली. कर्नाटकच्या धर्तीवर प्रस्ताव पाठवू कर्जमाफीसारखा मोठा निर्णय तडकाफडकी घेता येणार नाही. हा निर्णय घेतल्यास त्यात राज्याचा हिस्सा किती, केंद्राकडे किती निधी मागायचा हे ठरवावे लागेल. कर्नाटकने अलीकडेच कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव पाठवायला हवा, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत व्यक्त केले.कर्जमाफीचा केंद्र पातळीवर निर्णय!उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह काही राज्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकते अशीही चर्चा आहे.