शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी : भाजपाची फिल्डिंग, रात्री उशिरा घेतली काँग्रेस नेत्यांची भेट

By admin | Updated: June 24, 2017 07:03 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपाने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 -  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपाने राज्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीची समस्या सोडविण्यासाठी स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी लागू कराव्यात. अशी मागणी कांग्रेसनं भाजपाकडे केली आहे. कर्जमाफीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशीरा भाजपा आणि काँग्रस नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. माध्यमांच्या वृत्तानुसार, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न तात्काळ सोडवण्याचा आदेश राज्यातील भाजपा नेत्यांना दिला आहे. त्यामुळे भाजपा नेते सतत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहे. शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेबरोबरच राष्टपती पदाच्या मतासाठीही प्रयत्न सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन कर्जमाफीबाबत चर्चा केली यावेळी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नसीम खान उपस्थित होते. यावेळी काँग्रेसने शेतकरी कर्जमाफी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेस पक्षा तर्फे शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यांचे निवेदन भाजपा नेत्यांना दिले. 

यामध्ये त्यांनी बरेच महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशीवर राज्य सरकारने विचार करावा हा आहे. त्याचप्रमाणे, जमीन क्षेत्राची अट ठेवू नका तसेच १ लाखाची मर्यादा न घालता जून 2017 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतक-यांना तातडीने बेबाकी प्रमाणपत्र द्यावेत आणि शेतक-यांचा सातबारा कोरा करावा. तसेच शेतीमालाला भाव नव्हता त्यामुळे नुकसान झालेल्या पण थकबाकीदार नसलेल्या शेतक-यांनाही भरपाई द्यावी.

10 हजार रूपये मदत देण्याच्या जीआर मधील जाचक अटी रद्द कराव्यात,आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या कुटुबांचे पुर्नवसन करावे. शेतक-यांना उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के भाव देण्याबाबत ठोस कारवाई करावी. अंदोलनादरम्यान झालेले शेतक-यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, असेही ते म्हणाले. नियमीत कर्ज फेडणा-यांना वेगळं पॅकेज द्यावे. कर्जमाफी संदर्भात सरकारने तात्काळ मंत्रीमंडळ बैठक घेऊन निर्णय घ्यावा आणि त्याचा जीआर काढावा. सरकारने राज्य कृषीमूल्य आयोगाची स्थापना केली मात्र दोन वर्ष त्याला अध्यक्ष नसल्याने आत्महत्या वाढल्याचेही त्यांनी आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री - शरद पवार यांची दिल्लीत भेटराज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चर्चा करायला आणि सल्ला घ्यायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रामनाथ कोविंद यांना मदत करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पवार यांना केल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस व पवार यांच्यात बंद खोलीत कोविंद यांना राष्ट्रवादीची मते मिळावीत यासाठी चर्चा झाल्याचे कळते. राष्ट्रपती-पदाच्या निवडणुकीत व्हिप काढला जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची मते कोविंद यांच्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

अटी, शर्थींशिवाय सरसकट कर्जमाफी : सदाभाऊ खोतकोणत्याही अर्टी, शर्थींशिवाय व एकरांचे बंधन रद्द करून कर्जमाफी दिली जाणार आहे. त्याबाबत आदेश होऊन ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी दिली. २00८ मध्ये झालेली कर्जमाफी आणि आताच्या कर्जमाफीच्या निर्णयात खूप फरक आहे. त्यावेळची पाच एकराच्या आतील ३६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९00 कोटीची कर्जमाफी दिली होती. आता जवळपास त्यात तिप्पट वाढ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आम्ही या योजनेत सामावून घेतले आहे.